AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

150 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप, महाराष्ट्राचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार अडचणीत येणार?

महाराष्ट्राचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर तब्बल 150 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप करण्यात आला आहे. अब्दुल सत्तार यांच्यावर नुकतंच कृषी बिभागाने अकोल्यात टाकलेल्या धाडीवरुन टीका करण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांच्यावर तब्बल 150 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप करण्यात आला आहे.

150 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप, महाराष्ट्राचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार अडचणीत येणार?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 15, 2023 | 5:46 PM
Share

मुंबई : ठाकरे गटाचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर आणखी एका घोटाळ्याचा आरोप करण्यात आला आहे. कृषी उद्योग विकास महामंडळात 150 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. कीटकनाशक खरेदीच्या टेंडरमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप ‘सामना’तून करण्यात आला आहे. विशेष म्हणजे अब्दुल सत्तार यांच्यावर नुकतंच अकोल्यातील कृषी विभागाने टाकलेल्या धाडीवरुन टीका करण्यात येत होती. ज्या पथकाने बनावट खत असल्याचा आरोप केला होता त्या पथकात खाजगी लोकांचा समावेश असल्याचादेखील आरोप करण्यात आला होता. तसेच या पथकाकडून पैशांची मागणी करण्यात आली होती, असा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणावर पडदा पडत नाही तोच आता ‘सामना’तून सत्तार यांच्यावर 150 कोटींच्या घोटाळ्यांचा आरोप करण्यात आला आहे.

नेमका आरोप काय?

कृषी उद्योग विकास महामंडळात 150 कोटींचा घोटाळा झाल्याची माहिती मिळतेय. ऑरगॅनिक कीटकनाशक खरेदीसाठी काढलेल्या टेंडरमध्ये 150 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आलाय. एकच संचालक असलेल्या दोन संस्था मॅनेज करुन टेंडर दिल्याचा आरोप ‘सामना’तून करण्यात आलाय.

के. बी. बायो ऑरगॅनिक प्रा. ली आणि न्यूएज एॅग्रो एनोव्हेशन कंपन्यांकडून घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आलाय. दोन्ही कंपन्यांचा संचालक एकच असून संबंधित व्यक्ती अब्दुल सत्तार यांच्या जवळचा असल्याची माहिती आहे, असं ‘सामना’त म्हटलं आहे. अटी आणि शर्थीचा भंग करुन मर्जीतील कंपनीला टेंडर दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

अंबादास दानवे यांची अब्दुल सत्तारांवर टीका

दरम्यान, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर टीका केली आहे. “कृषी खात्याचे मंत्री आणि अधिकारी दलालीचं काम करत आहेत. महाराष्ट्रात कृषी विभाग भ्रष्टाचाराचा मोठा अड्डा बनलेला आहे. शेतकऱ्यांना न्याय देणाऱ्या या खात्यात आज फक्त भ्रष्टाचार आणि दलाली केली जात आहे. काही अधिकारी सुद्धा या खात्यात एजंटगिरीचं काम करतात. मी अतिशय जबाबदारीने बोलतोय”, असं अंबादास दानवे म्हणाले.

“एक बट्टळ नावाचा खाजगी व्यक्ती असतो. त्याच्यावर गुन्हा दाखल करा म्हणून सगळे अकोल्याचे लोक मागणी करत आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अब्दुल सत्तार यांच्या भ्रष्टाचाराला किंवा या वृत्तीला पाठिंबा आहे का? हा माझा प्रश्न आहे”, असं दानवे म्हणाले.

अब्दुल सत्तार काय म्हणाले?

दरम्यान, या आरोपांवर अब्दुल सत्तार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “दीडशे कोटींच्या घोटाळ्याचा आरोप खोटा आहे. तसं कोणतंही टेंडर झालेलं नाही. एकाच कंत्राटदाराला टेंडर दिलेलं नाही”, असं अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केलं आहे.

Follow Us
अशोक खरात प्रकरणातून सुटण्यासाठी बडे नेत चक्क...
अशोक खरात प्रकरणातून सुटण्यासाठी बडे नेत चक्क....
मोठी बातमी! निदा खानला आसरा देणाऱ्या मतीनच्या घरावर बुलडोझर? घरासह...
मोठी बातमी! निदा खानला आसरा देणाऱ्या मतीनच्या घरावर बुलडोझर? घरासह....
चाकणकरांनी माझ्यावर दबाव टाकला... अशोक खरातचा भांडाफोड करणाऱ्याने सगळं
चाकणकरांनी माझ्यावर दबाव टाकला... अशोक खरातचा भांडाफोड करणाऱ्याने सगळं.
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची 2 तासांपासून चौकशी सुरु, शिवनिका
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची 2 तासांपासून चौकशी सुरु, शिवनिका.
शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर, 175 कोटी खर्च
शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर, 175 कोटी खर्च.
मुख्यमंत्री होताच विजय यांचा मास्टरस्ट्रोक; काही तासांतच घेतला सर्वात
मुख्यमंत्री होताच विजय यांचा मास्टरस्ट्रोक; काही तासांतच घेतला सर्वात.
रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष कशा झाल्या? दमानियांनी मांडले मह
रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष कशा झाल्या? दमानियांनी मांडले मह.
मोठी बातमी! SIT चौकशीला सामोर जाण्याआधी चाकणकर थेट दिवंगत नेते रवींद्र
मोठी बातमी! SIT चौकशीला सामोर जाण्याआधी चाकणकर थेट दिवंगत नेते रवींद्र.
सुप्रिया सुळेंच्या अपघाताच्या बातमीनंतर सुनील मानेंनी व्यक्त केली शंका
सुप्रिया सुळेंच्या अपघाताच्या बातमीनंतर सुनील मानेंनी व्यक्त केली शंका.
थलपती विजय यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, विजयशिवाय मंत्रीपद मिळा
थलपती विजय यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, विजयशिवाय मंत्रीपद मिळा.