मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत (mumbai) सर्वाधिक श्रीमंत लोक राहत असले तरी याच शहरात हजारो लोकांना भुकेलं झोपावं लागतं. नेमकी हीच गंभीर बाब ध्यानात घेऊन ‘अक्षय चैतन्य’ (akshay chaitanya) या सेवाभावी संस्थेनं भायखळ्यात महास्वयंपाकघर उभारले आहे. या महास्वयंपाक घरात दररोज तब्बल 25 हजार गरजू लोकांसाठी मोफत जेवण बनवले जाणार आहे. त्यामुळे या मायानगरीत आता कुणीही उपाशी झोपणार नाही. कोणत्याही दिवशी तब्बल 25 हजार लोकांना जेवण देऊ शकेल अशा क्षमतेच्या या संस्थेच्या केंद्रीय स्वयंपाकघराचे (सेंट्रलाइज्ड किचन) उद्घाटन राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांच्या हस्ते होणार आहे. येत्या 4 मार्च रोजी हा कार्यक्रम पार पडणार आहे. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.