AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दोन दिवसांपासून यशवंत जाधव यांच्या घरी छापेमारी सुरू, कारवाईत काय हाती लागलं हे मात्र गुलदस्त्यात

वाब मलिक यांना अटक केल्यापासून राज्यात महाविकास आघाडी आणि भाजपा यांच्यात राजकीय युद्ध सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. कारण महाविकास आघाडीने केंद्र सरकार चुकीच्या पद्धतीने राष्ट्रीय यंत्रणांचा वापर करीत असल्याचा आरोप केला आहे.

दोन दिवसांपासून यशवंत जाधव यांच्या घरी छापेमारी सुरू, कारवाईत काय हाती लागलं हे मात्र गुलदस्त्यात
यशवंत जाधव यांचं घर Image Credit source: tv9
| Edited By: महेश घोलप | Updated on: Feb 27, 2022 | 7:07 AM
Share

मुंबई – शिवसेना (shivsena) नेते व मुंबई (mumbai) मनपा स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव (yashwant jadhav) यांच्या घरी दोन दिवसांपासून छापेमारी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. ही छापेमारी अद्याप सुरू असल्याने अनेकांच्या भुवय्या नक्कीचं उंचावल्या असणार कारण तिथं काय सापडलं हे अद्याप आयकर विभागाकडून जाहीर करण्यात आलेलं नाही. काही अधिकारी तिथून निघून गेले आहेत. तर काही अधिकारी अजून त्यांच्या घरीचं असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे त्यांच्या घरासमोर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तिथले स्थानिक शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे तिथला पोलिस बंदोबस्त अजून वाढवण्यात आला आहे. सध्याच्या घडीला तिथं अजून शिवसैनिक असल्याची माहिती आहे. पोलिसांनी तिथल्या अनेक शिवसैनिकांची समजूत देखील काढली आहे.

आयकर विभगाला नेमकं काय सापडलं ?

यशवंत जाधव यांनी भ्रष्टाचार करून कमावलेला सगळा पैसा त्यांच्या कुटुंबियांच्या नावाने दुबईत ठेवल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्यावर आयकर विभागाने छापे मारी करायला सुरूवात केली आहे. दोन दिवसांपासून आयकर विभाग घरात नेमकं काय करतंय हे अद्याप कोणालाही समजू शकलेलं नाही. तसेच त्यांनी आत्तापर्यंत कोणतीही माहिती सांगितलेली नाही. माझगाव येथील यशवंत जाधव यांच्या घरी दोन दिवसांपासून काही अधिकारी तपास करीत आहेत. तर काही अधिकारी तिथून निघून गेल्याचे समजते आहे. त्यामुळे नेमकं काय सापडलं हे मात्र गुलदस्त्यात आहे.

राज्यातलं राजकीय वातावरण गरमं

नवाब मलिक यांना अटक केल्यापासून राज्यात महाविकास आघाडी आणि भाजपा यांच्यात राजकीय युद्ध सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. कारण महाविकास आघाडीने केंद्र सरकार चुकीच्या पद्धतीने राष्ट्रीय यंत्रणांचा वापर करीत असल्याचा आरोप केला आहे. तर नवाब मलिकांनी गुन्हा केल्याने त्यांना अटक करण्यात आली असल्याचे भाजपाचे म्हणणे आहे. कालपासून आझाद मैदानावर खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी देखील मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतल्याने महाविकास आघाडी समोर मोठा पेच निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. उपोषणाला महाराष्ट्रातील अनेकांनी समर्थन दर्शविलं आहे. तसेच महाराष्ट्रातील अनेक मराठी बांधव उपोषणाला समर्थन दर्शविण्यासाठी आझाद मैदान परिसरात आले आहेत.

Maratha Reservation : संभाजीराजेंच्या उपोषणाला भाजपचा पाठिंबा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फडणवीसांचं महत्वाचं आवाहन

IND vs SL: इशान किशन रुग्णालयात दाखलं, डोक्याचं सीटी स्कॅन करण्यात आलं, मैदानावर काय घडलं, पहा VIDEO

IND vs SL T-20: रवींद्र जाडेजाच्या पहिल्या तीन चेंडूंवर 6,4,6 त्यानंतर पुढच्या चेंडूवर असा केला पलटवार

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली