AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक दिवसासाठी डायरेक्टर बनलात, तर कोणता पहिला सीन शूट कराल? फडणवीसांच्या उत्तराने जिंकली मनं

'फिक्की'च्या कार्यक्रमात अभिनेता अक्षय कुमारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्याने फडणवीसांना विविध प्रश्न विचारले. त्यापैकीच एक प्रश्न होता की, तुम्ही एका दिवसासाठी दिग्दर्शक बनलात आणि महाराष्ट्र असं चित्रपटाचं नाव असेल तर पहिला सीन कोणता असेल?

एक दिवसासाठी डायरेक्टर बनलात, तर कोणता पहिला सीन शूट कराल? फडणवीसांच्या उत्तराने जिंकली मनं
Devendra Fadnavis and Akshay KumarImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 07, 2025 | 12:23 PM
Share

‘फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री’च्या (FICCI) कार्यक्रमात अभिनेता अक्षय कुमारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्याने मुख्यमंत्र्यांना विविध प्रश्न विचारले. त्यापैकी एक प्रश्न होता, “जर तुम्ही एका दिवसासाठी चित्रपटाचे दिग्दर्शक बनलात आणि त्या चित्रपटाचं नाव ‘महाराष्ट्र’ असेल, तर पहिला सीन तुम्ही कोणता चित्रित कराल?” या प्रश्नावर फडणवीसांनी दिलेल्या उत्तराने सर्वांचं लक्ष वेधलं.

काय म्हणाले फडणवीस?

“महाराष्ट्रावर चित्रपट बनत असेल तर त्यातील पहिला सीन हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा असेल. ते राज्याभिषेकासाठी बसलेले असतील आणि इतक्या वर्षांच्या गुलामीनंतर पुन्हा एकदा स्वराज्याचं निर्माण.. हाच तो सीन असेल,” असं उत्तर फडणवीसांनी दिलं. त्यानंतर अक्षयने त्यांना राजकारणातील खरे हिरो कोण वाटतात, असा प्रश्न विचारला. त्यावर फडणवीसांनी ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी’ असं उत्तर देत त्यामागील कारणसुद्धा सविस्तर सांगितलं.

मराठी चित्रपटांबद्दल काय म्हणाले?

“मी मराठी चित्रपटांचा खूप मोठा चाहता आहे. मराठी चित्रपटांचा स्क्रीनप्ले, पटकथा आणि जे मुद्दे त्यात मांडले जातात.. ते इतर ठिकाणी पहायला मिळत नाहीत. जेन झी वर्गापर्यंत मराठी चित्रपट पोहोचावेत, यासाठी तुमचा काही प्लॅन आहे का”, असा प्रश्न अक्षयने विचारला. त्यावर फडणवीस म्हणाले, “मराठी रंगभूमीने मराठी चित्रपटांना ताकदवान बनवून ठेवलंय. कल्पकता आणि अभिव्यक्तीचं उत्तम उदाहरण मराठी नाटकांनी सादर केलंय. महाराष्ट्रात आजसुद्धा इतके मराठी नाटक बनतात आणि ते नाटक पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करतात. काहींनी तर दहा हजार शोजचा विश्वविक्रम केला आहे. नटरंग असो, दशावतार असो, सखाराम बाईंडर नाटक असो.. यांनाही जेन झीकडून पसंती मिळतेय. जेन झी प्रेक्षकवर्ग आता मराठी चित्रपटांशी जोडला जातोय”, असं उत्तर त्यांनी दिलं.

“एकेकाळी मराठी चित्रपटांना थिएटर मिळणं कठीण असायचं. एखादा ब्लॉकबस्टर चित्रपट आला, तर मराठी चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकलावं लागायचं. परंतु आज एकाच दिवशी दोन मराठी चित्रपट प्रदर्शित होतात आणि दोन्ही ब्लॉकबस्टर होतात. सरकार म्हणून आम्हीसुद्धा मराठी चित्रपटसृष्टीला मदत करतोय. त्यासाठी काही योजनासुद्धा आहेत. परंतु जेन झी वर्ग मराठी चित्रपटांसाठी अधिक कसा जोडला जाईल, यासाठी आम्ही नक्की काम करू”, असं आश्वासन त्यांनी दिलं.

Follow Us
बोगस SRA फॉर्म भरणं हाच मोदींनी दिलेला रोजगार! ठाकरेंचा भाजपवर घणाघात
Uddhav Thackeray | बोगस SRA फॉर्म भरणं हाच मोदींनी दिलेला रोजगार! उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात
दिशा सालियन प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही! ठाकरेंचं मोठं वक्तव्य
Aaditya Thackeray | दिशा सालियन प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही! आदित्य ठाकरेंचं मोठं वक्तव्य; राम कदमांचा थेट सवाल
मारहाणीची कबुली देणारा हिंदुत्ववादी कार्यकर्ता मोकाट कसा? CJP आक्रमक
Delhi | मारहाणीची कबुली देणारा हिंदुत्ववादी कार्यकर्ता मोकाट कसा? CJP आक्रमक; दिल्लीच्या संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर मोठं आंदोलन
हल्ल्यानंतर विद्यानंद बापट आक्रमक; DJ बंदीच्या मागणीवर म्हणाले...
Vidyanand Bapat | भावना म्हणजे हात-पाय दुखण्यासारख्या नाहीत! हल्ल्यानंतर विद्यानंद बापट आक्रमक; DJ बंदीच्या मागणीवर म्हणाले...
मीरा भाईंदरमध्ये मांस विक्री बंदीवरून राजकीय रणकंदन! 8 दिवस बंदी
मीरा भाईंदरमध्ये मांस विक्री बंदीवरून राजकीय रणकंदन! भाजपच्या नगरसेवकांची 8 दिवस बंदीची मागणी; मनसेचा तीव्र विरोध
जरांगे पाटील आणि सरकारची बोलणी पुन्हा फिस्कटली? 58 लाख कुणबी...
Manoj Jarange Patil | जरांगे पाटील आणि सरकारची बोलणी पुन्हा फिस्कटली? 58 लाख कुणबी प्रमाणपत्रांवर ठाम; GR झाल्याशिवाय माघार नाहीच
फडणवीस दिल्लीत जाणार; राऊतांचा मोठा दावा; भाजपच्या अंतर्गत घडामोडींवर
Sanjay Raut | फडणवीस दिल्लीत जाणार; संजय राऊतांचा मोठा दावा; भाजपच्या अंतर्गत घडामोडींवर सूचक विधान
मत व्यक्त केलं म्हणून हल्ला? बापटांवरील हल्ल्यावर पवारांचा संताप
Sharad Pawar | मत व्यक्त केलं म्हणून हल्ला? विद्यानंद बापटांवरील हल्ल्यावर शरद पवारांचा संताप; हा लोकशाही आणि मूलभूत अधिकारांवर हल्ला
मुंबईसाठी फडणवीसांचा मोठा प्लॅन! पुढील 10 वर्षांत मुंबई...
CM Fadnavis | मुंबईसाठी फडणवीसांचा मोठा प्लॅन! पुढील 10 वर्षांत मुंबई झोपडपट्टीमुक्त करणार; तिसऱ्या मुंबईचेही संकेत
जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange Hunger Strike | जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?