AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घाईगडबडीत रिक्षातून उतरले, 5 लाखाचे हिरे रिक्षातच विसरले! कशी शोधली पोलिसांनी बॅग?

Mira Road Rikshaw : आता काय करावं, अशा विचारात असतातना राहुल यांनी पोलिस स्टेशन गाठलं. आपली बॅग रिक्षात राहिल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आणून दिलं. बॅगमध्ये हिऱ्यांसोबत महत्त्वाची कागदपत्रही होती.

घाईगडबडीत रिक्षातून उतरले, 5 लाखाचे हिरे रिक्षातच विसरले! कशी शोधली पोलिसांनी बॅग?
विसरलेली बॅग पुन्हा सुपूर्द करताना पोलीस
| Edited By: सिद्धेश सावंत | Updated on: Feb 06, 2022 | 8:12 PM
Share

मीरा रोड : मुंबईत रिक्षावाल्यांचा (Auto Rikshaw in Mumbai) प्रामाणिकपणाची अनेक उदाहरणं तुम्ही ऐकली असतील. प्रवासी चुकून कधी एखादी गोष्ट विसरला, तर रिक्षा चालक त्याला ती आठवणीनं दिल्याच्या अनेक घटना मुंबईत रिक्षाने प्रवास करणाऱ्यांच्या बाबतीत घडलेल्या असतील. अशीच एक घटना आता पुन्हा एकदा समोर आली आहे. एका रिक्षात प्रवासी (Rikshaw passenger) चक्क पाच लाख रुपयांचे हिरे घाईगडबडीत रिक्षातून उतरताना विसरला. रिक्षातून उतरल्यानंतर बॅग रिक्षातच राहिल्याचं त्याला लक्षात आलं. प्रचंड कासावीस झालेल्या या प्रवाशानं आता करायचं काय, असा प्रश्न पडला. अखेर शेवटचा पर्याय म्हणून या प्रवाशानं पोलिस स्टेशन (Police Station) गाठलं आणि मदत घेण्याचा प्रयत्न केला. अखेर पोलिसांनी परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत लगेचच सीसीटीव्ही फुटेज तपासून घेतलं. त्यामुळे या प्रवाशाच्या जीवात जीव आलाय.

नेमकं कुठे घडला प्रकार? झालं काय?

34 वर्षांचे राहुल लुनावत हे पत्नी आणि लहान मुलीसोबत गुरुवारी कांदिवली ते भाईंदर असा प्रवास रिक्षातून करत होते. रिक्षाच्या मागील बाजूला त्यांनी एक बॅग ठेवली होती. भाईंदरमध्ये उतरताना त्यांची घाईगडबड झाली. या घाईगडबडीत रिक्षात मागे ठेवलेली बॅग ते तिथंच विसरले. यानंतर रिक्षा निघून गेल्यावर रिक्षातील बॅगमध्ये पाच लाखाचे हिरे ठेवले असल्याचं त्यांच्या लक्षात आलं.

कशी मिळली बॅग परत?

आता काय करावं, अशा विचारात असतातना राहुल यांनी पोलिस स्टेशन गाठलं. आपली बॅग रिक्षात राहिल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आणून दिलं. बॅगमध्ये हिऱ्यांसोबत महत्त्वाची कागदपत्रही होती. ही बाब लक्षात येताच पोलिस निरीक्षक मुगूट पाटील यांनी आपल्या टीमला कामाला लावलं. उपनिरीक्षक किरीण कदम, गजानन चव्हाण, नितीन बोरसे यांच्या पथकाला शोध मोहिमेवर पाठवलं. पोलिसांनी तत्काळ सीसीटीव्ही फुटेजची मदत घेतली.

पाच ते सहा ठिकाणचं फुटेज तपासल्यानंतर पोलिसांना अखेर नेमकी रिक्षा सापडली. यानंतर वाहतूक पोलिसांच्या मदतीनं पोलिसांनी रिक्षा मालकाचा पत्ता मिळवला. मग कांदिवलीतील ठाकूर विलेज भागात जाऊन शोध घेत पहिल्या मालकाकडून दुसऱ्या मालकाची माहिती मिळाली. अशाप्रकारे पोलिसांना अखेर तो रिक्षावाला सापडलाच. मग पोलिसांनी रिक्षात विसरलेली बॅग आपल्या ताब्यात घेऊन ती नंतर राहुल यांना सुपूर्द केली.

रिक्षाचालकाचा माहीतच नव्हतं!

दरम्यान, मीरा रोडला प्रवाशांना सोडून परतल्यानंतर रिक्षा चालकानं बॅग कुणीतरी विसरलं आहे, याची पुसटीशी कल्पना नव्हती. पण पोलिसांनी विचारल्यानंतर अखेर रिक्षाच्या मागे एक बॅग आढळली. यानंतर ती बॅग सुरक्षित राहिल्याचं रिक्षावाल्यालाही आश्चर्य वाटलंय. मात्र ही बॅग सुखरुप पुन्हा राहुल यांना मिलाल्यामुले त्यांना मोठा दिलासा मिळालाय.

संबंधित बातम्या :

सोलापुरात हॉटेल कर्मचाऱ्याचा प्रामाणिकपणा, हरवलेली एक तोळ्याची सोन्याची अंगठी ग्राहकाच्या स्वाधीन

दिल्लीतून पळाली, पालघरात मिळाली! सजग रिक्षाचालकामुळं लेक सापडली

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली