AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रात्रीच्या कोरोनाबाबत प्रश्न विचारणाऱ्यांची कीव येते, शिवसेनेचा मनसेवर पलटवार

"रात्रीचाच कोरोना असतो का? अशाप्रकारचे प्रश्न विचारणाऱ्यांची मला कीव येते, अशी टीका अनिल परब यांनी केली (Anil Parab slams MNS).

रात्रीच्या कोरोनाबाबत प्रश्न विचारणाऱ्यांची कीव येते, शिवसेनेचा मनसेवर पलटवार
अनिल परब, परिवहन मंत्री
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Dec 24, 2020 | 3:02 PM
Share

मुंबई : ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोना विषाणूच्या नव्या प्रजातीच्या पार्श्वभूमीवर राज्यात नाईट कर्फ्यू (Night Curfew) लागू करण्यात आला आहे. मात्र, या नाईट कर्फ्यूवरुन मनसे नेते संदीप देशपांडे (MNS Sandeep Deshpande) यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारला रात्रीचाच कोरोना असतो का? असा सवाल केला होता. त्यांच्या या प्रश्नाला शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी उत्तर दिले. त्यांनी राज्यातील सध्याच्या घडामोडींवर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी मनसेवर सडकून टीका केली (Anil Parab slams MNS).

“रात्रीचाच कोरोना असतो का? अशाप्रकारचे प्रश्न विचारणाऱ्यांची मला कीव येते. मी तर असं म्हणतो, सगळ्यांनी मिळून जबाबदारी घ्यावी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहून द्यावं की कोरोनाचा फैलाव होणारच नाही. मग विचार करता येईल की, रात्री किंवा दिवसा काय करायचं ते. मुख्यमंत्री म्हणून त्यांची प्रत्येक पावलं लोकांच्या काळजीसाठी आणि लोकांच्या हिताची आहेत.”, असं अनिल परब म्हणाले.

“मनसेचं टीका करणं हेच काम आहे. दुसरं कोणतं काम त्यांच्याकडे राहिलेलं नाही. टीका करणाऱ्यांना टीकाच करायची आहे. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना संपूर्ण महाराष्ट्र राज्याची जबाबादारी सांभाळायची आहे. अर्थचक्र देखील व्यवस्थित चाललं पाहजे. येणारे काही दिवस जगासाठी धोक्याचे दिवस असण्याची शक्यता आहे. ब्रिटनहून येणारा कोरोना व्हायरस लक्षात घेऊन याबाबत उपययोजना केल्या जात आहेत. मुख्यमंत्री याबाबत काळजी घेत आहेत. त्याचबरोबर जे कामकाज सुरु झालं आहे ते थांबणार नाही, याचीदेखील काळजी घ्यावी लागत आहे”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

“वर्षअखेरीस ख्रिसमस किंवा नव्या वर्षानिमित्ताने रात्रीच्यावेळी फार मोठ्या प्रमाणात गर्दी होती. अशावेळी कोरोनाचा संक्रमण वाढू नये यासाठी रात्रीचा कर्फ्यू लावला आहे”, असं परब यांनी सांगितलं.

“औरंगाबादला संभाजीनगर म्हणावं ही भूमिका शिवसेनाप्रमुखांनी वेळोवेळी जाहीर केलेली आहे. आम्ही आजही त्याला संभाजीनगरच म्हणतो. या सर्व गोष्टी मनात असल्या पाहिजेत. आम्ही या सगळ्या गोष्टी कृतीतून दाखवल्या आहेत. आता निवडणुकीच्या तोंडावर हे सर्व विषय घेऊन येत आहेत. पण याची सुरुवात आम्ही कित्येक वर्षांपूर्वी केली आहे”, असं मत त्यांनी मांडलं.

“औरंगाबाद शहराचं नामकरण 26 जानेवारीपर्यंत करुन दाखवा नाहीतर असं आव्हान मनसेकडून देण्यात आलं आहे. पण त्यांचे असे बरेच नाहीतर आम्ही बघितले आहेत. अशा धमक्यांना भीक घालत नाही. संभाजी हे नाव आमच्या हृदयात आहे. त्यामुळे आम्ही पूर्वीपासून संभाजीनगर असंच म्हणतो. राजकारणासाठी हा विषय उकरुन काढणं हा वेगळा विषय आहे. पण पूर्वीपासून भूमिका शिवसेनेने घेतलेली आहे. आम्ही आमच्या भूमिकेवर कायम आहोत”, असं अनिल परब म्हणाले.

संबंधित बातमी :

मुख्यमंत्री, कोरोना काय फक्त रात्री फिरतो का? नाईट कर्फ्यूवर मनसे नेत्याची सडकून टीका

Follow Us
रावेरमध्ये गारपिटीचा कहर! वादळी वाऱ्याने केळीबागा जमीनदोस्त
Jalgaon Banana Loss | रावेरमध्ये गारपिटीचा कहर! वादळी वाऱ्याने केळीबागा जमीनदोस्त
महागाईच्या काळात रिक्षाचालकांना मोठा दिलासा! ऑटो LPG तब्बल एवढ्या.....
Chhatrapati Sambhajinagar | महागाईच्या काळात रिक्षाचालकांना मोठा दिलासा! ऑटो LPG तब्बल एवढ्या रुपयांनी स्वस्त, आकडा जाणून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा
कोकण ते पुणे... माघारीसाठी कोट्यवधींचे व्यवहार? राऊतांनी उघड केले.....
Sanjay Raut UNCUT | कोकण ते पुणे... माघारीसाठी कोट्यवधींचे व्यवहार? राऊतांनी उघड केले धक्कादायक दावे
तर मी राजकारणातून संन्यास घेईन; मानेंच्या वक्तव्याने ठाकरे गटात खळबळ
Bal Mane | तर मी राजकारणातून संन्यास घेईन; बाळ मानेंच्या वक्तव्याने ठाकरे गटात खळबळ
हिंदुत्ववादी म्हणवणारे काही लोक गद्दारीसाठी एकत्र आले.....
Sanjay Raut On Bal Mane | हिंदुत्ववादी म्हणवणारे काही लोक गद्दारीसाठी एकत्र आले; बाळ माने यांच्या माघारीनंतर संजय राऊतांचा घणाघात
नवनीत राणांना राज्यसभेची लॉटरी की झटका?; काय घडतंय पडद्यामागे?
Navneet Rana | नवनीत राणांना राज्यसभेची लॉटरी की झटका? राष्ट्रवादीच्या भूमिकेने... काय घडतंय पडद्यामागे?
ठाकरेंनी काढलं, मानेंनी दिलं उत्तर; म्हणाले Revenge.....
ठाकरेंनी काढलं, मानेंनी दिलं उत्तर; म्हणाले Revenge..... त्या एका पोस्टनं पेटलं राजकारण!
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...