मुंबई : सध्या मुंबईत पावसाने विश्रांती घेतली असली तरी ठाणे, कल्याण, बदलापूर, डोंबिवली, अबंरनाथ नवी मुंबई या ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. काल संध्याकाळपासून नवी मुंबई परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. यामुळे बदलापूर स्टेशनच्या रेल्वे रुळावर पाणी भरले आहे. यामुळे बदलापूर-अंबरनाथ रेल्वे स्थानकात पाणी फलाटापर्यंत पोहोचले आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.