AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमिताभ ते संजय दत्त, बाळासाहेबांच्या मित्र यादीत कोण-कोण?

मुंबई: शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती. शिवसेनाप्रमुखांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या स्मारकाला वंदन करण्यासाठी राज्यभरातील शिवसैनिक शिवतीर्थावर येत असतात. बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनपट ठाकरे सिनेमाच्या निमित्ताने 25 जानेवारीला मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी बाळासाहेबांची भूमिका साकारत आहे. या सिनेमाची निर्मिती शिवसेना खासदार संजय राऊत तर दिग्दर्शन मनसे नेते अभिजीत पानसे यांनी केलं. बाळासाहेब […]

अमिताभ ते संजय दत्त, बाळासाहेबांच्या मित्र यादीत कोण-कोण?
| Updated on: Jul 05, 2019 | 4:35 PM
Share

मुंबई: शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती. शिवसेनाप्रमुखांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या स्मारकाला वंदन करण्यासाठी राज्यभरातील शिवसैनिक शिवतीर्थावर येत असतात. बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनपट ठाकरे सिनेमाच्या निमित्ताने 25 जानेवारीला मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी बाळासाहेबांची भूमिका साकारत आहे. या सिनेमाची निर्मिती शिवसेना खासदार संजय राऊत तर दिग्दर्शन मनसे नेते अभिजीत पानसे यांनी केलं. बाळासाहेब ठाकरे यांची सर्वक्षेत्रातील दिग्गजांशी मैत्रीपूर्ण संबंध होते. राजकारणात कट्टर विरोधकांचीही राजकारणापलिकडची मैत्री त्यांनी जपली होती. साहित्य, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रात बाळासाहेबांचा वावर होता. बॉलिवूडशी तर बाळासाहेबांचं वेगळं नातं होतं. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचं ‘मातोश्री’वर येणंजाणं होतं.

1) दिलीप कुमार आणि बाळासाहेबांची मैत्री

अभिनेते दिलीप कुमार आणि बाळासाहेब ठाकरे यांची मैत्री जगजाहीर होती. दोघेही अनेकवेळा गप्पांच्या निमित्ताने मातोश्रीवर भेटत. दिलीप कुमार, सुनील दत्त आणि जितेंद्र यांच्यासोबत बाळासाहेब तासनतास गप्पा मारत. दिलीप कुमार हे बाळासाहेबांचे आवडते अभिनेते होते. बाळासाहेबांच्या निधनानंतर दिलीप कुमार खूपच अस्वस्थ होते. या दोघांची मैत्री जरी असली तरी त्यांच्यात खडाखडीही होत असे. दिलीप कुमार यांना पाकिस्तानने सर्वोच्च नागरी सन्मान निशान-ए-इम्तियाज पुरस्कार दिला होता. त्यावेळी बाळासाहेबांनी तो परत करण्यास बजावलं होतं.

2) अमिताभ बच्चन

बाळासाहेब ठाकरे आणि अमिताभ बच्चन यांचं खास नातं होतं. 1983 मध्ये जेव्हा कुली सिनेमाच्या सेटवर बिग बी जखमी झाले होते, तेव्हा बाळासाहेब स्वत: त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयात गेले होते.

3) बाळासाहेबांनी बॉलिवूडच्या अनेक कलाकारांना मदतीचा हात पुढे केला आहे. अभिनेता संजय दत्त, सलमान खान, रीना रॉय यांना हवी ती मदत केली. संजय दत्तवर टाडा अंतर्गत आरोप झाले, त्यावेळी बाळासाहेबांनी त्याला जाहीर पाठिंबा दिला.

4) गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यासाठीही बाळासाहेब ठाकरे हे वडिलांसमान होते.

5) किंग खान शाहरुखचेही बाळासाहेबांशी चांगले संबंध होते. मात्र राजकीय मंचावरुन बाळासाहेबांनी शाहरुख खानवर नेहमीच टीका केली. शाहरुखने आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडूंना घेतल्यामुळे बाळासाहेब भडकले होते.

6) दिग्दर्शक राम गोपाल वर्माचेही बाळासाहेब ठाकरेंसोबत चांगले संबंध होते. राम गोपाल वर्मा बाळासाहेबांना रियल सरकार संबोधत होते

Follow Us
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.