AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bandra Bharatnagar : ‘पोलीस कमी पडतील’, वांद्रयात अदानीच्या एका प्रोजेक्टवरुन राड्याची स्थिती

Bandra Bharatnagar : "अदानी ग्रुप हा केवळ पैशाने विकत घेऊ शकतो. लोकांना विकत घेऊ शकत नाही. मी थांबलो, तर गर्दी वाढत जाईल, पोलीस कमी पडतील. असं कृपया करु नका. मी कळकळीची विनंती करतो"

Bandra Bharatnagar : 'पोलीस कमी पडतील', वांद्रयात अदानीच्या एका प्रोजेक्टवरुन राड्याची स्थिती
Bandra Bharatnagar
| Updated on: Jan 09, 2025 | 12:49 PM
Share

वांद्र्याच्या भारत नगरमध्ये SRA कडून अनधिकृत बांधकाम पाडलं जाणार आहे. त्यावरुन मोठा तणाव निर्माण झाला आहे. एसआरएचे अधिकारी JCB सह दाखल झाले आहेत. पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे. हे बांधकाम पाडण्याविरोधात ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. वांद्रे पूर्वचे आमदार वरुण सरदेसाई इथे दाखल झाले असून एसआरएच्या तोडक कारवाईला त्यांचा विरोध आहे. घरांवर जेसीबी चालणार म्हणून सर्वसामान्य नागरिक आक्रमक झाले आहेत. प्रशासन आणि नागरिकांमध्ये राड्याची स्थिती निर्माण झालीय.

“वांद्रेपूर्वेला आधी एचडीआयएल दीवाण बिल्डरचा प्रकल्प सुरु आहे. 97-98 साली सुरुवात झालेली. आज 25-26 वर्ष होऊनही लोकांना घर मिळालेलं नाही. दीवाण जेलमध्ये गेल्यानंतर अदानी आला. आज अदानीची इथे गुंडागर्दी सुरु आहे. कुठलाही करार न होता थेट नोटीस येते. आम्ही ही तोडकारवाई होऊ देणार नाही” अशी भूमिका स्थानिकांनी घेतली आहे. “आमची तिसरी पिढी इथे राहतेय. पैसा देत नाही, दुसरं घर देत नाही, थेट नोटीस. आम्ही कधीच अशा तोडककारवाईला परवानगी देणार नाही” असं एक महिलेने सांगितलं.

ग्राऊंड प्लस फाय अशा पद्धतीने इथे झोपड्या

स्थानिक आणि त्यांचे वकील एसआरए, महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सुप्रीम कोर्टाची कागदपत्र दाखवण्याचा प्रयत्न करतायत. पण एसआरएचे अधिकारी काहीही ऐकून घेण्याच्या स्थितीत नाहीत. कारण ग्राऊंड प्लस फाय अशा पद्धतीने इथे झोपड्या बांधण्यात आल्या आहेत. एसआरए, महापालिका कधीच अशी परवानगी देत नाही. नागरिकांकडे पुरावे नाहीत, असं एसआरएसच म्हणणं आहे.

‘पोलीस कमी पडतील’

“परवा मी अख्खा दिवस एसआरएच्या ऑफिसमध्ये होतो. मी सांगत होतो, हे करु नका. लोकांच्या रोषाला सामोर जावं लागले. लोकांचा रोष तुम्ही पाहू शकता, लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला, त्याला मी तडा जाऊ देणार नाही. ही माझी जबाबदारी आहे. अदानी ग्रुप हा केवळ पैशाने विकत घेऊ शकतो. लोकांना विकत घेऊ शकत नाही. मी थांबलो, तर गर्दी वाढत जाईल, पोलीस कमी पडतील. असं कृपया करु नका. मी कळकळीची विनंती करतो” असं स्थानिक आमदार वरुण सरदेसाई म्हणाले.

‘तुम्ही मानवतेला धरुन हे काम करत नाहीयत’

“मी मुख्यमंत्री आणि अन्य मंत्र्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण फक्त आश्वासन मिळाली. दीडशे-दोनशे पोलीस घेऊन येऊ नका. विकास करण्याआधी लोकांना विचारा. त्यांना विश्वासात घ्या. तोडणाऱ्या 180 घरांसोबत कुठलाही करार झालेला नाही. तुम्ही मानवतेला धरुन हे काम करत नाहीयत” असं वरुण सरदेसाई म्हणाले.

विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण.