AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: तेव्हा कुठे गेला होता तुझा राधासुता धर्म?, तर दोन हात करण्याची तयारी ठेवावी लागेल; भास्कर जाधव कडाडले

शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी नितेश राणे प्रकरणावरून भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. अंगविक्षेप केला की माफी मागायला लावता.

VIDEO: तेव्हा कुठे गेला होता तुझा राधासुता धर्म?, तर दोन हात करण्याची तयारी ठेवावी लागेल; भास्कर जाधव कडाडले
bhaskar jadhav
| Edited By: | Updated on: Dec 28, 2021 | 11:21 AM
Share

मुंबई: शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी नितेश राणे प्रकरणावरून भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. अंगविक्षेप केला की माफी मागायला लावता. मात्र तुमचे सद्सय असं वागतात तेव्हा कुठे गेला होता राजा सुता तुझा धर्म, असा सवाल भास्कर जाधव यांनी शिवसेनेला केला आहे. तसेच संविधानानुसार जर राज्यपाल वागत नसतील तर आघाडी सरकारने दोन हात करण्याची तयारी ठेवली पाहिजे, असंही भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.

भास्कर जाधव यांनी मीडियाशी संवाद साधताना भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. सभागृहातील एक सदस्य सातत्याने टीका टिप्पणी करत असल्याचं मी विधानसभेच्या निदर्शनास आणून दिलं होतं. याबाबाबत आवाज उठवला होता. त्यांना समज देऊन देखील ते वारंवार टीका करत आहेत हे मी निदर्शनास आणून दिलं. तालिका अध्यक्ष म्हणून मी भाजपच्या 12 आमदारांना निलंबित केलं होतं. त्यामुळे माझ्यावर टीका सुरू होती, असं भास्कर जाधव म्हणाले.

माझा साधा प्रश्न होता

अध्यक्षांचा आदेश मानून आम्ही सभागृहातून बाहेर गेलो. 5 जुलैला मी भाजपच्या 12 आमदारांना निलंबित केलं होतं. त्यावेळी भाजपच्या नितेश राणेंनी माझ्याबद्दल अवमानकारक विधान केलं होतं. नितेश राणे यांनी भास्कर जाधव यांना बिस्कीट देऊन 12 आमदारांचं निलंबन करायला लावलं असल्याचं म्हटलं होतं. त्यावरुनचं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या वेळी हरिभाऊ बागडे यांच्यासदर्भात काय बोलले असते, असा सवाल मी केला होता. साधा प्रश्न होता, अंगविक्षेप केला की माफी मागायला लावता. मात्र, तुमचे सदस्य असं वागतात तेव्हा कुठे गेला होता राजा सुता तुझा धर्म, असा सवाल त्यांनी केला.

कोकणात निवडणुकीत राडा होतोच

कोकणातील गेल्या 25 वर्षातील राजकारण पाहिलं तर लक्षात येतं की प्रत्येक वर्षी कुणाला तरी मारहाण किंवा जीव गमवावा लागतो. हे सातत्याने होत आहे. आताही तेच सुरू आहे, असंही ते म्हणाले.

राज्यपाल केंद्राचे किंवा राज्याचे नोकर नाहीत

राज्यपाल हे केंद्राचे किंवा राज्याचे नोकर नाहीत. राज्यघटनेच्या कलम 178 नुसार त्यांनी संविधानिक शपथ घेतलेली आहे. भारतीय संविधान सांगतं त्या प्रमाण राज्यपाल ऐकत नसतील तर महाराष्ट्र राज्य सरकारनं दोन दोन हात करायची तयारी ठेवावी लागेल, असं माझं वैयक्तिक मत आहे, असं सांगतानाच विधानसभा अध्यक्ष पदाबाबत सत्ताधारी पक्षाच्या गटनेत्यांनी एकत्र येऊन सामना करायचा आहे, असं ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

Maharashtra Assembly Speaker Election: महाविकास आघाडीपाठोपाठ भाजपचा आमदारांना व्हीप; विधानसभा अध्यक्षाची निवडणूक होणार?

Maharashtra Assembly: शेवटच्या दिवशी तरी मुख्यमंत्री येणार का? राऊत म्हणतात, मुख्यमंत्री जिथून आहेत तिथून नियंत्रण!

Maharashtra Assembly Speaker Election: अभ्यास आणि विद्वतेचं अजीर्ण होऊ नये, मुख्यमंत्र्यांच्या लेटर बॉम्बनंतर संजय राऊतांचं राज्यपालांवर शरसंधान

Follow Us
लोकलचा खोळंबा! मध्ये रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्ये रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक
माणसं प्रेमाने जिंकता येतात!; सुळेंच्या आव्हानावर फडणवीसांचा पलटवार
Devendra Fadnavis | माणसं प्रेमाने जिंकता येतात!; सुप्रिया सुळेंच्या आव्हानावर फडणवीसांचा पलटवार
अरे... ऐ मला हे चालणार नाही... बैठकीत एकाऐकी मुख्यमंत्री कंत्राटदार...
Video | अरे... ऐ मला हे चालणार नाही... बैठकीत एकाऐकी मुख्यमंत्री कंत्राटदारांवर भडकलेच, पाहा व्हिडीओ
1 एकर शेतीमधून 100 कोटींचं वांग्याचं उत्पन्न कसं निघतं?
1 एकर शेतीमधून 100 कोटींचं वांग्याचं उत्पन्न कसं निघतं?; सुप्रिया सुळेंच्या आरोपांवर ज्योती वाघमारेंचा पलटवार
महाराष्ट्रतील देवस्थान जमिनीबाबत सरकारचं मोठं पाऊल, तो निर्णय स्थगित,
Maharashtra Devasthan | महाराष्ट्रतील देवस्थान जमिनीबाबत सरकारचं मोठं पाऊल, तो निर्णय स्थगित, नेमकं प्रकरण काय?
भाजपला मोठा धक्का; महिला शहराध्यक्षांसह संपूर्ण कार्यकारिणीचा राजीनामा
भाजपला मोठा धक्का; महिला शहराध्यक्षांसह संपूर्ण कार्यकारिणीचा थेट राजीनामा, पक्षांतर्गत वाद अचानक उफाळला