AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट | भास्कर जाधव नाराज, विधान भवनाच्या पायऱ्यांवर नतमस्तक होत म्हणाले, ‘आता इच्छा नाही’

विधिमंडळाचं सध्या अधिवेशन सुरु आहे. पण पायऱ्यांवर नतमस्तक होऊन, आता येणार नाही, असं ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव म्हणाले आहेत. भास्कर जाधव असं का म्हणालेत? हा मुद्दा देखील महत्त्वाचा आहे.

Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट | भास्कर जाधव नाराज, विधान भवनाच्या पायऱ्यांवर नतमस्तक होत म्हणाले, 'आता इच्छा नाही'
| Updated on: Mar 21, 2023 | 11:59 PM
Share

मुंबई : ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधवांनी (Bhaskar Jadhav) विधिमंडळाच्या पाया पडत, पुन्हा येण्याची इच्छा नाही, असं म्हटलंय. अर्थसंकल्पीय अधिवेशन 24 मार्च पर्यंत आहे. पण आता येणार नाही, असं म्हणत भास्कर जाधव विधिमंडळातून निघाले. त्याआधी जाधव पायऱ्यांवर नतमस्तक झाले. गुढीपाडव्याच्या सुट्टीनंतर आणखी 3 दिवस अधिवेशन आहे. पण आपल्याला अधिवेशनात बोलू दिलं जात नाही. 2 लक्षवेधी होत्या. त्यापैकी एकही लक्षवेधी लागली नाही. त्यामुळं पुढचे 3 दिवस कामकाजात सहभागी होणार नाही, असं भास्कर जाधव म्हणाले आहेत.

अर्थात भास्कर जाधवांनी उर्वरित 3 दिवसच अधिवेशनात येणार नसल्याचं म्हटलंय. पण कोकणातले त्यांचे प्रतिस्पर्धी रामदास कदमांनी, 2 दिवसांआधीच भास्कर जाधवांना राजकारणातून हद्दपार करण्याचा इशारा दिलाय. रामदास कदम भास्कर जाधवांवर का चिडले? हा प्रश्न देखील तितकाच महत्त्वाचा आहे.

2009मध्ये गुहागरमध्ये जाधवांकडून पराभव झाला. त्यावेळी भास्कर जाधव राष्ट्रवादीत होते. 2009 मध्ये राष्ट्रवादीच्या भास्कर जाधवांना 53 हजार 108 मतं मिळाली. तर शिवसेनेच्या रामदास कदमांना 40 हजार 32 मतं मिळाली. जवळपास 13 हजारांच्या फरकानं रामदास कदम पराभूत झाले. मात्र यामागे उद्धव ठाकरेंचाच हात असल्याचा आरोप, खेडच्या सभेतून रामदास कदमांनी केलाय.

कोकणातलं राजकारण सध्या तापलंय. राणे विरुद्ध ठाकरे हा सामना आपण पाहिलाय. पण रामदास कदम विरुद्ध भास्कर जाधव हाही सामना तीव्र होणार आहे.

Follow Us
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.