AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट | भास्कर जाधव नाराज, विधान भवनाच्या पायऱ्यांवर नतमस्तक होत म्हणाले, ‘आता इच्छा नाही’

विधिमंडळाचं सध्या अधिवेशन सुरु आहे. पण पायऱ्यांवर नतमस्तक होऊन, आता येणार नाही, असं ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव म्हणाले आहेत. भास्कर जाधव असं का म्हणालेत? हा मुद्दा देखील महत्त्वाचा आहे.

Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट | भास्कर जाधव नाराज, विधान भवनाच्या पायऱ्यांवर नतमस्तक होत म्हणाले, 'आता इच्छा नाही'
| Updated on: Mar 21, 2023 | 11:59 PM
Share

मुंबई : ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधवांनी (Bhaskar Jadhav) विधिमंडळाच्या पाया पडत, पुन्हा येण्याची इच्छा नाही, असं म्हटलंय. अर्थसंकल्पीय अधिवेशन 24 मार्च पर्यंत आहे. पण आता येणार नाही, असं म्हणत भास्कर जाधव विधिमंडळातून निघाले. त्याआधी जाधव पायऱ्यांवर नतमस्तक झाले. गुढीपाडव्याच्या सुट्टीनंतर आणखी 3 दिवस अधिवेशन आहे. पण आपल्याला अधिवेशनात बोलू दिलं जात नाही. 2 लक्षवेधी होत्या. त्यापैकी एकही लक्षवेधी लागली नाही. त्यामुळं पुढचे 3 दिवस कामकाजात सहभागी होणार नाही, असं भास्कर जाधव म्हणाले आहेत.

अर्थात भास्कर जाधवांनी उर्वरित 3 दिवसच अधिवेशनात येणार नसल्याचं म्हटलंय. पण कोकणातले त्यांचे प्रतिस्पर्धी रामदास कदमांनी, 2 दिवसांआधीच भास्कर जाधवांना राजकारणातून हद्दपार करण्याचा इशारा दिलाय. रामदास कदम भास्कर जाधवांवर का चिडले? हा प्रश्न देखील तितकाच महत्त्वाचा आहे.

2009मध्ये गुहागरमध्ये जाधवांकडून पराभव झाला. त्यावेळी भास्कर जाधव राष्ट्रवादीत होते. 2009 मध्ये राष्ट्रवादीच्या भास्कर जाधवांना 53 हजार 108 मतं मिळाली. तर शिवसेनेच्या रामदास कदमांना 40 हजार 32 मतं मिळाली. जवळपास 13 हजारांच्या फरकानं रामदास कदम पराभूत झाले. मात्र यामागे उद्धव ठाकरेंचाच हात असल्याचा आरोप, खेडच्या सभेतून रामदास कदमांनी केलाय.

कोकणातलं राजकारण सध्या तापलंय. राणे विरुद्ध ठाकरे हा सामना आपण पाहिलाय. पण रामदास कदम विरुद्ध भास्कर जाधव हाही सामना तीव्र होणार आहे.

दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं
दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं.
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं.
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद.
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!.
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल.
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर.
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही...
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही....
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात.
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ.
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल.