AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजकीय ‘उद्योग’ बंद करा, हिंमत असेल तर चर्चेला या; रोहित पवार यांचं उदय सामंत यांना थेट चॅलेंज

चाकण MIDC मधील उद्योगांचे स्थलांतर व बंद पडणाऱ्या कंपन्यांवरून रोहित पवारांनी उद्योगमंत्री उदय सामंतांना थेट आव्हान दिले. २० कंपन्या बंद पडल्याने २ हजार कामगारांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. राज्य सरकार उद्योगांना पुरेसे इन्फ्रास्ट्रक्चर देत नसल्याने महाराष्ट्र उद्योगात पिछाडीवर पडत असल्याचा आरोप पवार यांनी केला.

राजकीय 'उद्योग' बंद करा, हिंमत असेल तर चर्चेला या; रोहित पवार यांचं उदय सामंत यांना थेट चॅलेंज
rohit pawarImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 14, 2026 | 1:15 PM
Share

उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आधी इतर राजकीय उद्योग बंद करावेत. मी तुम्हाला आव्हान देतो. माझ्यासोबत चर्चेला या. संयुक्त पत्रकार परिषद बोलावू. त्यात मी पुराव्यानिशी आकडेवारी सादर करतो. तुमच्यात धाडस असेल तर या समोर, असं आव्हानच शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांना दिलं आहे. पुण्याच्या चाकण एमआयडीसीतून उद्योगांचे स्थलांतर होत आहे. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन सामंत यांना चांगलंच घेरलं.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी चाकण एमआयडीसीचा मुद्दा उपस्थित केला होता. चाकण एमआयडीसीती कंपन्या सुविधांच्या अभावी स्थलांतर करण्याच्या मार्गावर आहेत. 20 कंपन्या टाळं लावणार आहेत. त्यामुळे सुमारे दोन हजार कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न उपस्थित होणार आहे. राज्यासाठी ही गोष्ट निश्चित चांगली नाही. त्यामुळे राज्यकर्त्यांनी त्यात लक्ष घालावे, असं आवाहन शरद पवार यांनी केलं होतं. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देत, ज्या कंपन्यांची नोंदणी आहे, पण त्या कधी सुरूच झाल्या नाहीत, त्या बंद होत असल्याचं म्हटलं होतं. या सर्व पार्श्वभूमीर रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकार आणि उद्योग मंत्र्यांवर हल्लाबोल केला.

तुम्ही आकडे सांगा. या सरकारमध्ये धमक आहे का? आमच्याशी चर्चा करायला. आम्ही खरे आकडे देऊ. सरकारकडून उत्तर द्यायला समोर या. उद्योगमंत्र्यांनी राजकीय उद्योग करणं बंद करावं आणि आमच्यासमोर येऊन आकडे सादर करा, असं रोहित पवार म्हणाले.

हे आमचं धाडस, बाकीच्यांचं…

भाजपच्या बोलणाऱ्या आमदारांना उद्योग आणि विकास काय हे माहीत नाही. वरून आदेश येतात त्यावर ते बोलतात. उचलली जीभ लावली टाळ्याला असा प्रकार सुरू आहे. कोण बोलतं ते महत्त्वाचं आहे. भाजपमधील काही लोक चांगले आहेत. पण दुर्देवाने ते बोलत नाहीत. पण इतरांना व्यवसाय कळत नाही. उदय सामंत हे उद्योग मंत्री आहेत. ते काय करतात? कसे करतात? माहीत आहे. आम्ही आव्हान देतो, त्यांच्यासोबत चर्चा करायला तयार आहोत. संयुक्तिक पत्रकार परिषद घ्यायला तयार आहे. त्यांनी समोर यावं आणि आकडे द्यावेत. टीका करण्यापेक्षा आमच्यासोबत पीसी घ्या. आम्ही पुराव्यासकट, आकड्यांसकट महाराष्ट्राची आर्थिक स्थिती सांगू. हे आमचं धाडस आहे. बाकीच्यांचं माहीत नाही, असं आव्हानच त्यांनी दिलं.

सरकार सुविधाच देत नाही

एका खासदाराने केंद्राच्या मंत्र्याला प्रश्न विचारला. त्यावर केंद्रीय मंत्र्याने उत्तर दिलं. त्यातून राज्यात किती कंपन्या बंद पडल्या त्याची माहिती मिळाली. केंद्रात सरकार भाजपचं आहे. नीती आयोग पंतप्रधानाच्या अंतर्गत आहे. गव्हर्नमेंट पॉलिसीत महाराष्ट्र पाच नंबरला गेला, कधीकाळी एक नंबरला होतो, असं नीती आयोगच म्हणतंय. व्यावसायिक धंदा करायला तयार आहेत. पण सरकार इन्फ्रास्ट्रक्चर द्यायला कमी पडतं. हे मी सांगत नाही. हे नीती आयोग सांगत आहे, असा दावाही त्यांनी केला.

राजीनामा द्या, मग बोला

यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका करणारे राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरही टीका केली. याच विखे पाटलांना सांगायचंय तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाला. पेपर फुटला, असं मी म्हणत होतो. त्यावेळी हेच विखे म्हणत होते, रोहित पवार खोटं बोलत आहेत. रोहित पवारांवर एफआयआर दाखल करा. आता मॅटनेच भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध केलं आहे. त्यावर आधी राजीनामा द्या. त्यानंतर पवारांवर बोला, असा टोला त्यांनी लगावला.

Follow Us
राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना जन-झीशी संपर्क साधण्याचे दिले निर्देश
राज ठाकरे यांचे पदाधिकाऱ्यांना जन-झीशी संपर्क वाढवण्याचे निर्देश, पुण्यातील बैठकीत स्पष्टीकरण
पुण्यात भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार! दैवी शक्तीच्या नावाखाली...
Pune | पुण्यात भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार! दैवी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचं शोषण; आरोपी फरार
चाकण एमआयडीसीतून २० उद्योगांच्या स्थलांतरावर शरद पवारांचा सरकारला सवाल
चाकण एमआयडीसीतून २० उद्योगांच्या स्थलांतरावर शरद पवारांचा सरकारला सवाल, रोजगार टिकवण्यासाठी उपाययोजनांची मागणी
भाविकांची गर्दी वाढतेय, वाहतूक कोंडी कायम! दगडूशेठ गणपती मंदिराच्या...
Pune | भाविकांची गर्दी वाढतेय, वाहतूक कोंडी कायम! दगडूशेठ गणपती मंदिराच्या विस्तारावर हिंदू महासभेचे आनंद दवे आक्रमक
फडणवीसांचे उत्तर: चाकण MIDC मधील ७६% बंद कंपन्या ‘डिफंक्ट’ होत्या
चाकण एमआयडीसीतील कंपन्या बंद: फडणवीसांनी पवारांना दिले उत्तर
MNS शहराध्यक्षांच्या गाडीची तोडफोड: मनसेचा भाजपवर आरोप
अंबरनाथमधील भाजप-मनसे राड्यावरुन मनसे नेते आक्रमक, गाडी तोडफोड करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न
Sharad Pawar | चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न; शरद पवार यांचा दावा
आमदार अपात्रता निर्णयावर राहुल नार्वेकरांचं मोठं वक्तव्य...
Rahul Narwekar | आमदार अपात्रता निर्णयावर राहुल नार्वेकरांचं मोठं वक्तव्य; सुप्रीम कोर्टात निर्णय....
फडणवीसांच्या निर्देशाने महा-आयडी; नागरिकांना मिळणार एकच डिजिटल ओळख
मुख्यमंत्री फडणवीसांच्या निर्देशाने महा-आयडी; नागरिकांना मिळणार एकच डिजिटल ओळख
पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची पुन्हा भारताला धमकी
‘सिंधूचं पाणी आमची रेड लाईन’; पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी