AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sarpanch: राज्यातील सरपंचांना मोठी लॉटरी; मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर सरपंच आता प्रशासक, सरकारचा मोठा निर्णय

Sarpanch Administrator of Grampanchayat: मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर सरपंच आता प्रशासक असतील. याविषयीचा निर्णय राज्य सरकारने दिला आहे. सरपंचच नाही तर उपसरपंच आणि सदस्यांनाही लॉटरी लागणार आहे. काय आहे अपडेट?

Sarpanch: राज्यातील सरपंचांना मोठी लॉटरी; मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर सरपंच आता प्रशासक, सरकारचा मोठा निर्णय
सरपंचच प्रशासकImage Credit source: गुगल
| Updated on: Feb 22, 2026 | 9:25 AM
Share

Sarpanch Administrator of Grampanchayat: फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अथवा महिन्याअखेरीस मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर आता सरकारी अधिकाऱ्यांना आयोजित थेट ग्रामपंचायतचे सरपंच हेच प्रशासक म्हणून नियुक्त करण्याची अधिसूचना ग्रामविकास विभागाने काढले आहे. ग्रामपंचायतच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे त्यामुळे सहा महिन्यांपर्यंत सरपंच हेच प्रशासक असतील तसेच विद्यमान उपसरपंच आणि सदस्यांचे प्रशासकीय समिती नेमण्याचे अधिकार जिल्हा परिषदेला देण्यात आले आहेत.

राज्यात फेब्रुवारी 2026 अखेरपर्यंत 14 हजार 234 ग्रामपंचायतीची मुदत संपत आहे. यापूर्वी ग्रामपंचायतीची मुदत संपल्यावर पुढील निवडणूक होईपर्यंत संबंधित अधिकारी हा प्रशासक म्हणून काम पाहत होता. पण ग्रामविकास विभागाने पहिल्यांदाच वेगळा प्रयोग राबवला आहे. पुढील निवडणुका होईपर्यंत म्हणजे सहा महिन्यांपर्यंत सरपंच हेच प्रशासक असतील. विद्यमान उपसरपंच अथवा ग्रामपंचायत सदस्य यांची प्रशासकीय समिती नेमण्यात येईल. याविषयीचा अधिकार हे जिल्हा परिषदेकडे दिले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी याविषयीचा निर्णय घेतील.

सहा महिन्यांची मुदतवाढ

राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतीची मुदत या महिन्याच्या अखेरीस संपत आहे. या ग्रामपंचायतींना राज्य सरकारने सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. त्यानंतर पुढील निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल. तोपर्यंत याठिकाणचे विद्यमान सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांचा समावेश असलेले प्रशासक मंडळ हे गावा गाडा हाकतील. ग्राम विकास विभागाने याविषयीचे आदेश नुकतेच दिले. त्यामुळे ग्रामविकासाच्या आणि सध्या सुरू असलेल्या कामांना खीळ बसणार नाही असे सांगितले जात आहे.

सरपंच परिषदेच्या मागणीला यश

सरपंच परिषदेने याप्रकरणी राज्य सरकारने मागणी केली होती. त्यांच्या मागणीला यश आले आहे. तर काही जणांनी उच्च न्यायालयातही धाव घेतली होती. ग्रामविकास विभागाने सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांची प्रशासकीय समिती नियुक्तीचे आदेश दिल्याने सरपंच परिषदेच्या मागणीस यश आले आहे. आता गावचे जुनेच कारभारी प्रशासक म्हणून गावगाडा हाकतील. यामुळे सध्या सुरू असलेल्या विकास गामांना आणि पंचायत राज अभियानास नव्याने गती मिळेल असे मानले जात आहे.

Follow Us
अमरावती रुग्णालय आग प्रकरण; चौकशी प्रमुखांवर सुषमा अंधारेंचा संताप
अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या आग प्रकरणावरून सुषमा अंधारेंनी संजय काटकरांना खडसावले
लासलगाव कांदा एक्स्प्रेसला 28 तासांचा विलंब, 500 टन कांदा दिल्ली...
लासलगाव कांदा एक्स्प्रेसला 28 तासांचा विलंब, 500 टन कांदा दिल्ली...
"बॅनर A-1, पण रस्ता स्पेस टेक्नॉलॉजीचा"; ठाकरेंचा भरत गोगावलेंन टोला
आदित्य ठाकरेंचा सवाल:
सुटे तेल बंदीवरून वाद, मुख्यमंत्री फडणवीसांकडून नव्या एसओपीच्या सूचना
सुटे तेल बंदी: आठवडी बाजारांना फटका, मुख्यमंत्री फडणवीसांकडून नव्या एसओपीच्या सूचना
इंधनानंतर आता साखरेसाठीही रांगा? महाराष्ट्रात साखरेचा तुटवडा...
इंधनानंतर आता साखरेसाठीही रांगा? महाराष्ट्रात साखरेचा तुटवडा आणि वाढते दर चिंतेचा विषय
थकीत बिलांमुळे कंत्राटदाराचा बळी, वडेट्टीवारांनी सरकारवर साधल निशाणा
गजानन देवकते प्रकरण: थकलेल्या बिलांमुळे कंत्राटदाराचा बळी, विजय वडेट्टीवारांनी सरकारवर साधला निशाणा.
प्रवाशांचा जीव धोक्यात! कसारा घाटात भरधाव एसटी बसचा चालक मोबाईलवर...
प्रवाशांचा जीव धोक्यात! कसारा घाटात भरधाव एसटी बसचा चालक मोबाईलवर व्यस्त
MPSC FDA पेपरफुटी: अभिमन्यू पवारांची उच्चस्तरीय चौकशीची मागणी
औषध निरीक्षक परीक्षा रद्द: पेपरफुटीमागे कोण?
एका प्रियकरामुळे हजारो विद्यार्थ्यांना फटका
MPSC FDA पेपरफुटी प्रकरणात लव्ह स्टोरीचा धक्कादायक अँगल
मुंबईतील वडापाव विक्रेत्यांनी घेतली तुकाराम मुंढेंची धास्ती,
मुंबईतील वडापाव विक्रेत्यांनी घेतली तुकाराम मुंढेंची धास्ती, असं काही केलं की...