AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरे यांचा भाजप आणि मनसेला सर्वात मोठा झटका, नेमकं काय घडलं?

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाने पनवेलमध्ये भाजप आणि मनसेला मोठा धक्का दिला आहे. पनवेलमधील भाजप आणि मनसेच्या काही दिग्गज पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत आज प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे यांना आगामी निवडणुकीत याचा फायदा होण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरे यांचा भाजप आणि मनसेला सर्वात मोठा झटका, नेमकं काय घडलं?
उद्धव ठाकरे
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Apr 15, 2024 | 6:46 PM
Share

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि मनसेला मोठा झटका दिला आहे. कारण पनवेलमध्ये भाजपच्या 4 माजी नगरसेवकांनी आणि मनसेच्या 4 पदाधिकाऱ्यांनी आज ठाकरे गटात प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सर्वांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. या पक्षप्रवेशानंतर उद्धव ठाकरेंनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन याबाबत घोषणा केली. उद्धव ठाकरेंनी यावेळी सिडकोकडून वसूल केल्या जाणाऱ्या मालमत्ता करावर भूमिका मांडली. “निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसे केंद्र सरकार बदलण्याच्या जिद्दीने मावळे येत आहेत. संख्या वाढत आहे. या सर्वांचं स्वागत आहे. ही टीम आली. ती पनवेलमधील आहे. संजोग वाघेरे यांच्या मावळ मतदारसंघातील आहे. यांचा प्रवेश होत असताना काही गोष्टी आवर्जून सांगायच्या आहेत. निवडणुकीच्या तोंडावर जाहीरनामे जाहीर करतात. अशक्यप्राय गोष्टी आम्ही करू सांगत असतात. ते सांगतात मूळचे प्रश्न दूर राहतात. शिवसेनेत आल्यानंतर त्यांच्या ज्या काही व्यथा आहेत, त्या त्यांच्या एकट्याच्या नाहीत. तिथले जे काही प्रश्न आहेत. त्यावर आंदोलन झाले आहेत. अजूनही सुरू आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“मालमत्ता कर हा प्रश्न आहे. मालमत्ता कर भरू नये असं नाही. पण डबल वसुली होत आहे. सिडकोकडून वसुली केली जात आहे. महापालिकेकडून कोणतीही सेवा न देता कर आकारली जात आहे. ही जुलूमशाही आहे. दोन लाख 80 हजार जनतेने त्याचा निषेध करत डबल कर भरण्यास नकार दिला आहे. कर जुलमी पद्धतीने वसूल केला जात आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

‘विषमतेविरोधात आवाज उठवला पाहिजे’

“पलवा सिटीला मात्र करमुक्ती केली आहे. ही विषमता आहे. त्याविरोधात आवाज उठवला जात आहे. मुंबई महापालिकेची २०१७ची निवडणूक लढवताना ५०० स्क्वेअरफूटापर्यंतच्या मालमत्ता कर रद्द करू, असं सांगितलं होतं ते केलं. राज्यात आणि केंद्रात आमचं सरकार आल्यावर आम्ही पनवेलमधील कर रद्द करू. कारण नसताना डबल कर भरण्यास आमचा विरोध आहे. वसुली सरकारचा हा विचित्र प्रकार आम्ही थांबवू”, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

‘पनवेलमधून आम्हाला नवीन ताकद’

“पनवेलमधून आम्हाला नवीन ताकद मिळाली आहे. आता पनवेलमध्ये आम्ही चार पावलं पुढे जाऊ”, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच “२०१४ आणि २०१९लाही भाजपने जाहीरनामे प्रसिद्ध केले होते. ते जाहीरनामे प्रसिद्ध करत राहतील. पण आता ते सत्तेत येणार नाही. त्यांना काहीही बोलण्याचा अधिकार आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Follow Us
स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास! पहिल्यांदाच...
स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास! पहिल्यांदाच... एकनाथ शिंदेंनी काय सांगितलं?
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण?
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण? अनिल पाटलांनी स्पष्टच सांगितलं!
हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! पवार संतापले
Rohit Pawar Tweet | हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या मृत्यूवर रोहित पवार संतापले
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं...
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं एका पाठोपाठ...
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल, म्हणाली, आम्ही फक्त...
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; सुषमा अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले;
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले; पंतप्रधानांच्या अगदी मागे उभा असलेल्या नेत्याला...
मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
Manoj Jarange | मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून ..
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून सवाल
वडापाव घ्यायला गेला अन्... पायाला धक्का लागल्याच्या वादातून मोठा घात,
मोठी खळबळ! वडापाव घ्यायला गेला अन् जीवाला मुकला... पुण्यात काय घडलं?