देशात पेशवाई आणण्याचा भाजपचा प्रयत्न, सरकारचा कडेलोट करणार, कोणत्या नेत्याना दिला इशारा

भाजप आणि त्यांच्या नेत्यांकडून वारंवार छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त बोलले जात असल्यामुळे आता सरकारचा कडेलोट करणारच अशा इशारा काँग्रेसकडून दिला आहे.

देशात पेशवाई आणण्याचा भाजपचा प्रयत्न, सरकारचा कडेलोट करणार, कोणत्या नेत्याना दिला इशारा
Follow us
| Updated on: Dec 04, 2022 | 3:35 PM

मुंबईः मागील काही दिवसांपासून राज्यपाल, भाजप आणि शिंदे गटातील काही आमदारांकडून सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केली जात आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एकदा नाही सरळ दोन वेळा ज्या व्यक्तींना महाराष्ट्रातच नाही तर देशातही ज्यांचं नाव आदराने घेतले जाते. अशा व्यक्तीबद्दल वादग्रस्त वक्तव्य करून राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून काढले होते.

त्यामुळे आता भाजपच्या विरोधी पक्षाकडून राज्यपालांसह आज प्रसाद लाड यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. त्यामुळे आज काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

त्यांनी भाजपवर टीका करताना, भाजपकडून देशात पेशवाई आणण्याचा प्रयत्न केला जात आहे, त्यामुळे सरकारचा कडेलोट करणारच अशा थेट इशाराच त्यांनी दिला आहे.

त्यामुळे आता भाजपच्या विरोधात काँग्रेससह शिवसेना आणि भाजपचे खासदार उदयनराजे भोसले हेही आक्रमक होत त्यांनी राज्यपाल भगतसिहं कोश्यारी यांची महाराष्ट्रातून हकालपट्टी करा अशी मागणी केली आहे.

तर कोल्हापूरचे माजी खासदार संभाजीराजे यांनी आक्रमक पवित्रा घेत राज्यपालांची राज्यातून हकालपट्टी केल्याशिवाय रस्त्यावरची लढाई थांबणार नाही असा इशारा त्यांच्याकडून देण्यात आला आहे.काँग्रेस

चे आमदार नाना पटोले यांनी थेट भाजपवर भाजप राज्यात पेशवाई आणण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळे या सरकारचा कडेलोच करणाच असा इशारा देण्यात आला आहे.

भाजपचे खासदार उदयनराजे यांनी मागील दोन ते तीन दिवसांपासून आक्रमक पवित्रा घेत त्यांनी भाजपसोबतच राज्यपाल कोश्यारींवर जोरदार टीका करण्यात येत आहे.

त्यावरून त्यांनीही वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांची मुंडकी छाटून टाकावी असं वाटतं असं वक्तव्य केले होते. भगतसिंह कोश्यारी यांची महाराष्ट्रातून हकालपट्टी कराच या मतावर आपण ठाम असल्याचेही त्यांनी सांगितले होते.

त्यानंतर आता काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत राज्यात पेशवाई आणण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे असा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

एकीकडे राज्यपाल कोश्यारी यांचा वाद चालू असतानाच दुसरीकडे भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मविषयी बोलून नवा वाद निर्माण केला आहे.

त्यामुळे सरकार विरोधात शिवप्रेमींच्या आणि विरोधकांच्या भूमिका आता आक्रमक झाल्या आहेत. त्यामुळेच सरकारचा कडेलोट करणार असा इशारा आमदार नाना पटोले यांनी दिला आहे तर माजी खासदार संभाजीराजे यांनी हकालपट्टी होत नाही तोपर्यंत रस्त्यावरची ही लढाई सुरूच राहणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.