AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘महायुतीच्या शिलेदारांना बाळासाहेबांचा खरा वारसदार मिळाला’, राज ठाकरे यांच्या मोठ्या घोषणेनंतर भाजप नेत्याची प्रतिक्रिया

"महायुतीला बाळासाहेब ठाकरे यांच्या शिलेदारांचा आशीर्वाद मिळालाच होता. पण आता राज ठाकरेंच्या रुपाने बाळासाहेबांचा खरा वारसदारही मिळाला आहे. राज ठाकरेंच्या माध्यमातून महायुतीला बाळासाहेबांच्या खऱ्या वारसदाराचा आशीर्वाद मिळेल आणि महायुती भक्कम होईल", अशी प्रतिक्रिया भाजप नेते प्रसाद लाड यांनी दिली आहे.

'महायुतीच्या शिलेदारांना बाळासाहेबांचा खरा वारसदार मिळाला', राज ठाकरे यांच्या मोठ्या घोषणेनंतर भाजप नेत्याची प्रतिक्रिया
मनसे अध्यक्ष राज ठाकरे
| Updated on: Apr 09, 2024 | 10:05 PM
Share

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे. केवळ नरेंद्र मोदी यांच्यासाठीच आपण पाठिंबा देत असल्याची घोषणा राज ठाकरे यांनी केली आहे. त्यांच्या या भूमिकेचं आता भाजपकडून स्वागत करण्यात येत आहे. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी व्हिडीओ जारी करत भूमिका मांडली आहे. राज ठाकरे यांचं मनापासून महायुतीत स्वागत, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. तसेच महायुतीच्या शिलेदाराला बाळासाहेबांचा खरा वारसादर मिळाला, असं प्रसाद लाड म्हणाले आहेत.

“राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या विचाराला पुढे घेऊन जाण्यासाठी महायुतीत आता मनसे एकत्र येणार आहे. महायुतीचा समन्वय म्हणून मी राज ठाकरे यांचं महायुतीत स्वागत करतो. महायुतीला बाळासाहेब ठाकरे यांच्या शिलेदारांचा आशीर्वाद मिळालाच होता. पण आता राज ठाकरेंच्या रुपाने बाळासाहेबांचा खरा वारसदारही मिळाला आहे. राज ठाकरेंच्या माध्यमातून महायुतीला बाळासाहेबांच्या खऱ्या वारसदाराचा आशीर्वाद मिळेल आणि महायुती भक्कम होईल, याची मला खात्री आहे”, अशी भूमिका प्रसाद लाड यांनी मांडली.

प्रविण दरेकर यांच्याकडून ठाकरेंची स्तुती

“राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जो बिनशर्त पाठिंबा दिला आहे, त्याचं निश्चितच स्वागत आहे. कारण शेवटी जागांपेक्षा काही मिळतं यापेक्षा माझा देश महत्त्वाचा आहे, तरुण पिढीचं भविष्य महत्त्वाचं आहे, महाराष्ट्र आणि मराठी माणूस महत्त्वाचा आहे, अशा व्यापक विचारातून राज ठाकरेंनी घेतलेला निर्णय हा भाजपच्या दृष्टीने निश्चितच स्वागतार्ह आहे. महाराष्ट्रातील मराठी माणूस असेल, महाराष्ट्रातील जनता असेल, राज ठाकरेंच्या या निर्णयाने त्यांना निश्चितच आनंद आणि समाधान मिळणार आहे. कारण राज ठाकरे यांना मानणारा एक वर्ग आहे. त्यांच्या वक्तृत्वाची भुरड जनमाणसांना पडते. त्यामुळे मोदींना महाराष्ट्रातून जे समर्थन मिळणार आहे त्याची मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे”, असं प्रविण दरेकर म्हणाले.

“एका बाजूला उद्धव ठाकरे जे सत्तेमुळे लाचार होऊन त्यांनी बाळासाहेबांचा विचार सोडला. मराठी माणसाचा विचार सोडला आणि काँग्रेसच्या बाजूला जाऊन बसले. दुसरीकडे जागावाटप महत्त्वाची नाही, राज्यसभा, विधान परिषद महत्त्वाची नाही. तडजोडीपेक्षा देश महत्त्वाचा आहे, अशा प्रकारचा व्यापक विचार करणारा नेता, त्याचं मोठपण त्यांच्या समर्थनातून दिसून आलं”, अशी भूमिका प्रविण दरेकर यांनी मांडली.

Follow Us
अशोक खरात प्रकरणातून सुटण्यासाठी बडे नेत चक्क...
अशोक खरात प्रकरणातून सुटण्यासाठी बडे नेत चक्क....
मोठी बातमी! निदा खानला आसरा देणाऱ्या मतीनच्या घरावर बुलडोझर? घरासह...
मोठी बातमी! निदा खानला आसरा देणाऱ्या मतीनच्या घरावर बुलडोझर? घरासह....
चाकणकरांनी माझ्यावर दबाव टाकला... अशोक खरातचा भांडाफोड करणाऱ्याने सगळं
चाकणकरांनी माझ्यावर दबाव टाकला... अशोक खरातचा भांडाफोड करणाऱ्याने सगळं.
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची 2 तासांपासून चौकशी सुरु, शिवनिका
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची 2 तासांपासून चौकशी सुरु, शिवनिका.
शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर, 175 कोटी खर्च
शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर, 175 कोटी खर्च.
मुख्यमंत्री होताच विजय यांचा मास्टरस्ट्रोक; काही तासांतच घेतला सर्वात
मुख्यमंत्री होताच विजय यांचा मास्टरस्ट्रोक; काही तासांतच घेतला सर्वात.
रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष कशा झाल्या? दमानियांनी मांडले मह
रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष कशा झाल्या? दमानियांनी मांडले मह.
मोठी बातमी! SIT चौकशीला सामोर जाण्याआधी चाकणकर थेट दिवंगत नेते रवींद्र
मोठी बातमी! SIT चौकशीला सामोर जाण्याआधी चाकणकर थेट दिवंगत नेते रवींद्र.
सुप्रिया सुळेंच्या अपघाताच्या बातमीनंतर सुनील मानेंनी व्यक्त केली शंका
सुप्रिया सुळेंच्या अपघाताच्या बातमीनंतर सुनील मानेंनी व्यक्त केली शंका.
थलपती विजय यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, विजयशिवाय मंत्रीपद मिळा
थलपती विजय यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, विजयशिवाय मंत्रीपद मिळा.