AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांच्या बुरखा वाटपाच्या कार्यक्रमावर भाजपचा आक्षेप

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्या यामिनी जाधव यांच्याकडून आज भायखळ्यात बुरखा वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमावर भाजपकडून आक्षेप घेण्यात आला. "आम्हाला हे मान्य नाही", अशी स्पष्ट भूमिका आशिष शेलार यांनी मांडली आहे.

शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांच्या बुरखा वाटपाच्या कार्यक्रमावर भाजपचा आक्षेप
शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांच्या बुरखा वाटपाच्या कार्यक्रमावर भाजपचा आक्षेप
| Updated on: Sep 12, 2024 | 6:44 PM
Share

महाराष्ट्रात पुढच्या दोन महिन्यांनी विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाकडून जोरदार तयारी केली जात आहे. प्रत्येक पक्ष कामाला लागला आहे. प्रत्येक पक्षाचे नेते आणि संभाव्य उमेदवार हे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती आखत आहेत. या रणनीतीचा भाग म्हणून कुणी सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचत आहेत, कुणी वेगवेगळ्या आश्वासनं देत आहेत, तर कुणी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी मदत करत आहेत. मुंबईच्या भायखळ्यात शिंदे गटाच्या नेत्या यामिनी जाधव यांच्याकडून मुस्लिम समाजाच्या महिलांसाठी बुरखा वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचा बॅनरही चर्चेचा कारण ठरला होता. या कार्यक्रमावर भाजपने आक्षेप घेतला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्या यामिनी जाधव यांच्याकडून बुरखा वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुंबईतील भायखळामध्ये यामिनी जाधव यांच्याकडून बुरखा वाटप करण्यात आलं. यामिनी जाधव यांना लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाकडून भायखळातून उमेदवारी देण्यात आली होती. पण त्यांचा पराभव झाला होता. यानंतर त्यांच्याकडून बुरखा वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यांच्या या कार्यक्रमाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. पण यामिनी जाधव यांच्या बुरखा वाटपाच्या कार्यक्रमावर भाजपने आक्षेप नोंदवला आहे. अशा पद्धतीने बुरखा वाटपावर भाजप सहमत नाही, अशी प्रतिक्रिया भाजप नेते आशिष शेलार यांनी दिली आहे.

आशिष शेलार नेमकं काय म्हणाले?

“आम्हाला हे मान्य नाही. मला या विषयी पूर्ण माहिती नाही तरीपण अशा पद्धतीच्या बुरखा वाटपाच्या कार्यक्रमाशी भाजप सहमत नाही. त्यांची भूमिका, त्यांच्या पक्षाची भूमिका, त्यांच्या मतदारसंघाची आवश्यकता यावर त्यांनी मत प्रदर्शित करावं. भारतीय जनता पक्षाला अशा पद्धतीचे कार्यक्रम आयोजित करणं हे मान्य नाही”, अशी भूमिका आशिष शेलार यांनी मांडली.

किशोरी पेडणेकर यांचा निशाणा

यामिनी जाधव यांनी आयोजित केलेल्या बुरखा वाटपाच्या कार्यक्रमानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. लोकसभेला 46 हजारांचा फटका बसल्यावर कळालं, असा टोला किशोरी पेडणेकर यांनी लगावला. “सोयीनुसार आपल्या भूमिका बदलत आहेत, ज्यावेळेला लोकसभेला फटला बसला, 46 हजार मतांनी मागे पडल्यानंतर समजलं. यामिनी जाधव यांनी इथून फुटतानादेखील सांगितलं होतं की आम्ही कट्टर हिंदुत्ववादी आहोत. ठाकरे गट हिंदुत्वला न मानणाऱ्या लोकांबरोबर गेले. फक्त चांगले शब्द वापरायचे, त्याला चांगल्या शब्दांता मुलामा द्यायचा आणि अर्थ बदलायचा. भूमिका बदलली ते लोकांना कळतंय. लोकांनी लोकसभेत बरोबर दाखवून दिलं आहे”, अशी टीका किशोरी पेडणेकर यांनी केली.

Follow Us
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी.
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला.
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?.
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?.
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप.
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?.
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले.
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा.