AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई महापालिका शाळांच्या इंग्रजी नामकरणाला भाजपाचा विरोध

शाळेचे नाव इंग्रजी करून शैक्षणिक दर्जोन्नती होणार आहे काय? | BMC schools in Mumbai

मुंबई महापालिका शाळांच्या इंग्रजी नामकरणाला भाजपाचा विरोध
| Updated on: Feb 25, 2021 | 4:19 PM
Share

मुंबई: महापालिकेच्या शाळांचे (BMC Schools) मुंबई पब्लिक स्कूल असे नामांतर करून नवीन लोगोसह M.P.S. असे संबोधले जाईल, असे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी यावर्षीच्या अर्थसंकल्पीय भाषणात नमूद केले आहे. मातृभाषेतील मराठी शाळांची नावे इंग्रजीत रूपांतर करण्याच्या आयुक्तांच्या या निर्णयाला भारतीय जनता पक्षाने तीव्र विरोध केला. (BJP oppose giving english name to BMC schools in Mumbai)

स्थायी समितीत अर्थसंकल्पीय भाषणात नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी असे प्रतिपादन केले की, “नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अभ्यासक्रमात मातृभाषेला प्राधान्य देते. याउलट महापालिका आयुक्तांनी शाळांना मुंबई पब्लिक स्कूल असे संबोधण्याचा निर्णय घेतला आहे. आयुक्त महोदय, प्राथमिक शाळेपासुनच बालमनावर मराठीच्या गळचेपीचे कुसंस्कार करू नका. आपण मातृभाषेतल्या शाळेच्या नावाला मात्र इंग्रजीमध्ये रुपांतरीत करीत आहात! केवढा विरोधाभास ?” Mr. Commissioner This is neighther British India, nor Old India …This Is Modiji’s New India … implementing New Education Policy. त्यामुळे ही असली थेरं, आम्ही चालू देणार नाही, असे भालचंद्र शिरसाट यांनी सांगितले.

‘हेच काय मराठी भाषेचं संवर्धन?’

मी, स्वत: कर्मवीर दादासाहेब गायकवाड नगर महापालिका प्राथमिक शाळा, सरदार नगर, शीव – कोळीवाडा या शाळेचा माजी विद्यार्थी आहे. आता इंग्रजी नामकरणानंतर या शाळेचं बारसं होणार आहे असे आयुक्तांनी नमूद केले आहे. मुंबई पब्लिक स्कूल ? हेच काय मराठी भाषेचं संवर्धन ? हेच काय मराठी भाषेचे जतन? आम्ही मायमराठीची अवहेलना आणि उपेक्षा सहन करणार नाही. नाईटलाईफ नेतृत्वाचाच संकल्प असल्याने याबाबत महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना मूग गिळून गप्प आहे. मराठीबहुल भागातील अनेक शाळा बंद पडत आहेत. सत्ताधाऱ्यांना त्याचे काहीही सोयरसुतक नसून त्यांना केवळ इंग्रजी नामांतरात रस आहे.

मागील पन्नास वर्ष शिवसेना मुंबईत मराठी अस्मितेचा मुद्दा घेऊन राजकारण करत आहे, तर याच शिवसेनेची मागील २५ वर्ष मुंबईत सत्ता आहे. मात्र, राज्याची राजधानी असलेल्या मुंबईतील मराठीकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. गेली अनेक वर्ष महापालिकेमध्ये मराठी भाषा विभाग सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, ढिम्म प्रशासन आणि मराठीबाबत उदासीन सत्ताधारी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत.

शाळेचे नाव इंग्रजी करून शैक्षणिक दर्जोन्नती होणार आहे काय?” मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला माय मराठीला डावलून इंग्रजीच्या उदात्तीकरणाचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष हाणून पाडेल असा इशारा भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांनी दिला आहे.

संबंधित बातम्या:

महापालिकेच्या शाळा खासगी संस्थांना देण्याचा डाव सुभाष देसाईंनी हाणून पाडला

राज ठाकरेंना शिवसेनेचा धक्का; मुंबई महापालिकेने ‘तो’ प्रस्ताव नाकारला

(BJP oppose giving english name to BMC schools in Mumbai)

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.