AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिला सुरक्षिततेच्या मुद्द्यावर विशेष अधिवेशन बोलवा, भाजपच्या महिला शिष्टमंडळाची राज्यपालांकडे मागणी

मुंबई भाजपा अध्यक्ष आणि आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या महिला शिष्टमंडळाने आज (13 सप्टेंबर) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.

महिला सुरक्षिततेच्या मुद्द्यावर विशेष अधिवेशन बोलवा, भाजपच्या महिला शिष्टमंडळाची राज्यपालांकडे मागणी
bjp women
| Edited By: | Updated on: Sep 13, 2021 | 6:14 PM
Share

मुंबई : मुंबई भाजपा अध्यक्ष आणि आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या महिला शिष्टमंडळाने आज (13 सप्टेंबर) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाने साकीनाका बलात्कार प्रकरण तसेच राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यांवर राज्यपाल यांच्याकडे पत्राद्वारे अनेक मागण्या केल्या. (bjp women leaders visited governor bhagat singh koshyari demands strict implementation of women protection law in maharashtra state)

महिलांच्या सुरक्षाविषयक कायद्याची कडक अंमलबजावणी करावी

भाजपच्या महिला शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली. गेल्या काही दिवसामध्ये महिलांवर झालेल्या लैंगिक अत्याचारांविषयी या शिष्टमंडळाने कोश्यारी यांना माहिती दिली. तसेच सरकारने महिलांच्या सुरक्षाविषयक कायद्याची कडक अंमलबजावणी करावी आणि विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे अशी मागणीदेखील राज्यपालांकडे केली. तसेच महाराष्ट्रात शक्ती कायदा लागू केला जावा, अशा मागणीचे पत्रही भाजपच्या महिला शिष्टमंडळाने राज्यपाल कोश्यारी यांना दिले.

सामनाच्या अग्रलेखातून तालिबानी वृत्ती- चित्रा वाघ 

दरम्यान, शिवसेनेचे मुखपत्र सामना या वृत्तपत्रातील अग्रलेखावर टीका करत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना घेरलं. “सामनाच्या अग्रलेखातून जे मुद्दे मांडण्यात आले त्यातून तालिबानी वृत्ती दिसते. हाथरस किंवा कठूआ बलात्काराच्या घटनांचं कोणीही समर्थन करत नाही. पण महाराष्ट्रात महिलांच्या सुरक्षेविषयीच्या संवेदनशील मुद्द्यावरदेखील राजकरण केलं जात आह, असे चित्रा वाघ म्हणाल्या.

संजय राऊतांना कस कळलं की एकच आरोपी आहे ?

तसेच पुढे बोलताना संजय राऊत सध्या मुंबईचे पोलीस आयुक्त झाले आहेत, असं दिसतंय. राऊत म्हणतात एक आरोपी साकिनाका प्रकरणात अटक आहे. अजून तपास पूर्ण झाला नाही. संजय राउतांना कस कळलं की एकच आरोपी आहे ? असा सवाल चित्रा वाघ यांनी केला.

इतर बातम्या :

UP Assembly Election : उत्तर प्रदेशात काँग्रेस प्रियंका गांधींच्या नेतृत्वात लढणार, मुख्यमंत्रीपदाचा चेहराही त्याच ठरवणार!

Maharashtra ZP Election 2021: कोणत्या जिल्हा परिषदेत किती जागा, मिनी विधानसभा निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम

सांगलीच्या महिला व्यावसायिकाला लुबाडलं, दुबईतल्या कंपनीकडून दीड कोटींची फसवणूक, पोलीस आरोपींच्या मुसक्या कशा आवळणार?

(bjp women leaders visited governor bhagat singh koshyari demands strict implementation of women protection law in maharashtra state)

Follow Us
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....