AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC Election: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीबाबत महत्त्वाची बातमी, 11 नोव्हेंबरला होणार सर्वात मोठी घोषणा

राज्यातील जनता आणि राजकीय पक्ष आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींकडे डोळे लावून बसले आहेत. यावेळीही बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीवर संपूर्ण देशाची नजर असणार आहे. या निवडणूकीबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

BMC Election: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीबाबत महत्त्वाची बातमी, 11 नोव्हेंबरला होणार सर्वात मोठी घोषणा
bmc election
| Updated on: Oct 29, 2025 | 10:12 PM
Share

BCM Election Reservation: राज्यातील जनता आणि राजकीय पक्ष आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींकडे डोळे लावून बसले आहेत. यावेळीही बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीवर संपूर्ण देशाची नजर असणार आहे. शिवसेना ठाकरे गट बीएमसी आपल्याकडे ठेवणार की भाजप आणि महायुती बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. अशातच आता या निवडणूकीबाबत सर्वात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आगामी बीएमसी निवडणूकीसाठी येत्या 11 नोव्हेंबर 2025 रोजी आरक्षण सोडत पार पडणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे इच्छूक उमेदवार आणि माजी नगरसेवकांमध्ये उत्सुकतेसह चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण कोणता वार्ड कोणत्या प्रवर्गासाठी राखीव असणार हे 11 तारखेला समजणार आहे. त्यामुळे काही इच्छुक उमेदवारांना याचा फटका बसू शकतो.

असा असेल आरक्षण सोडत कार्यक्रम

आरक्षित जागांची संख्या निश्चित करून त्यास राज्य निवडणूक आयोगाची मान्यता घेण्यासाठी 30 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या काळात प्रस्ताव सादर केला जाणार आहे. आरक्षण सोडतीची जाहीर सूचना 6 नोव्हेंबर रोजी वृत्तपत्रात प्रसिध्द केली जाणार आहे. त्यानंतर आरक्षणाची सोडत 11 नोव्हेंबर 2025 रोजी होणार आहे. सोडतीचा निकाल राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी 11 नोव्हेंबर रोजी सादर केला जाणार आहे.

त्यानंतर, 14 नोव्हेंबर रोजी प्रारुप आरक्षण, हरकती व सूचना मागविण्यासाठी नाटीस प्रसिध्द केली जाणार आहे. 20 नोव्हेंबर ही प्रारुप आरक्षण, हरकती व सूचना सादर करण्याची अंतिम तारीख असणार आहे. अंतिम आरक्षण विहित नमुन्यात 28 नोव्हेंबर रोजी शासन राजपत्रात प्रसिध्द केले जाणार आहे.

असे असेल आरक्षण

मुंबई महापालिकेत एकूण 227 जागा आहेत. यापैकी अनुसुचित जातींसाठी 15 जागा राखीव असणार आहेत. तसेच अनुसुचित जमातींसाठी 2 जागा आणि इतर मागासवर्गीयांसाठी 61 जागा आरक्षित असणार आहेत. उर्वरित जागा या खुल्या प्रवर्गासाठी असणार आहेत. तसेच एकूण 227 जागांपैकी 50 टक्के म्हणजेच 114 जागा या महिलांसाठी राखीव असणार आहेत. आता कोणती जागा कोणत्या प्रवर्गासाठी असणार हे 11 नोव्हेंबरला समोर येणार आहे.

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक