AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोना काळात मृत्यू झालेल्या मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना मदतीचा हात, आर्थिक मदतीसह वारसांना नोकरी मिळणार

मुंबईत कोरोना रोखण्यासाठी दिवस रात्र मेहनत करणाऱ्या पालिकेच्या तब्बल 228 कर्मचाऱ्यांना कोविडमुळे जीव गमवावा लागला होता. या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना मुंबई महापालिकेतर्फे मदतीचा हात दिला जाणार आहे.

कोरोना काळात मृत्यू झालेल्या मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना मदतीचा हात, आर्थिक मदतीसह वारसांना नोकरी मिळणार
मुंबईकरांना तिसऱ्या लाटेचा धोका? इमारत सील होणार, कुणालाही प्रवेश नाही, वाचा पालिका आयुक्तांचे निर्देश
| Edited By: | Updated on: Jul 05, 2021 | 8:20 AM
Share

मुंबई : राज्यात गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. मुंबईत कोरोना रोखण्यासाठी दिवस रात्र मेहनत करणाऱ्या पालिकेच्या तब्बल 228 कर्मचाऱ्यांना कोविडमुळे जीव गमवावा लागला होता. या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना मुंबई महापालिकेतर्फे मदतीचा हात दिला जाणार आहे. यातील 91 जणांच्या कुटुंबांना 50 लाखांची आर्थिक मदत तर 90 जणांच्या वारसांना नोकरी दिली जाणार आहे. मुंबई महापालिकेने नुकतंच याबाबतचे परिपत्रक जारी केले आहे. (BMC Provide financial Help to the families who died during Corona period)

मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, गेल्यावर्षी मार्चमध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर काही दिवसांतच रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढू लागली. मुंबई महापालिकेच्या 6766 कर्मचाऱ्यांना दीड वर्षात कोरोनाची लागण झाली. यातील तब्बल 5803 कर्मचारी कोरोनाला हरवून पुन्हा आपल्या कर्तव्यावर हजर झाले आहेत.

केंद्राकडून 50 लाखांची मदत

मात्र तब्बल 228 कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोविड डय़ुटी करताना मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारकडूनही आर्थिक मदत करण्यात येते. या पार्श्वभूमीवर पालिकेने आर्थिक मदतीसाठी 200 प्रस्ताव केंद्राकडेही पाठवले होते. मात्र यातील केवळ 19 प्रकरणांत केंद्राने 50 लाखांची मदत दिली आहे.

तर उर्वरित कुटुंबांना आधार देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यानुसार 91 जणांच्या कुटुंबांना 50 लाखांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. तर 90 जणांच्या वारसांना नोकरीही दिली जाईल, असे यात स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, पालिकेचे 967 कर्मचारी अजूनही कोरोनाबाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही पालिका मदत करणार

कोविड कामासाठी अनेक कंत्राटी कर्मचाऱयांची भरती करण्यात आली. शिवाय पालिकेचे शेकडो कंत्राटी कर्मचारीही आहेत. यामध्ये कोविड डय़ुटी करताना 9 कंत्राटी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होऊन मृत्यू झाला आहे. यामध्ये कंत्राटी कामगार मृत्यू झालेले 3 प्रस्तावही केंद्राने मंजूर केले आहेत. तर उर्वरित सहा कर्मचाऱ्यांना पालिका आर्थिक मदत देणार आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

(BMC Provide financial Help to the families who died during Corona period)

संबंधित बातम्या :

प्रसिद्धी मोहिमेवर ठाकरे सरकारकडून 155 कोटी खर्च, सोशल मीडियावर 6 कोटींचा खर्च

पूर्व उत्तर मुंबईत 5 हजार झाडं लावली जाणार, भाजप खासदार गोपाळ शेट्टींचा संकल्प

हिंदमाताजवळ पाणी साचण्याची समस्या कायमची दूर होणार, आदित्य ठाकरेंकडून कामाची पाहणी

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली