कोरोना काळात मृत्यू झालेल्या मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना मदतीचा हात, आर्थिक मदतीसह वारसांना नोकरी मिळणार

मुंबईत कोरोना रोखण्यासाठी दिवस रात्र मेहनत करणाऱ्या पालिकेच्या तब्बल 228 कर्मचाऱ्यांना कोविडमुळे जीव गमवावा लागला होता. या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना मुंबई महापालिकेतर्फे मदतीचा हात दिला जाणार आहे.

कोरोना काळात मृत्यू झालेल्या मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना मदतीचा हात, आर्थिक मदतीसह वारसांना नोकरी मिळणार
मुंबईकरांना तिसऱ्या लाटेचा धोका? इमारत सील होणार, कुणालाही प्रवेश नाही, वाचा पालिका आयुक्तांचे निर्देश
Follow us
| Updated on: Jul 05, 2021 | 8:20 AM

मुंबई : राज्यात गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. मुंबईत कोरोना रोखण्यासाठी दिवस रात्र मेहनत करणाऱ्या पालिकेच्या तब्बल 228 कर्मचाऱ्यांना कोविडमुळे जीव गमवावा लागला होता. या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना मुंबई महापालिकेतर्फे मदतीचा हात दिला जाणार आहे. यातील 91 जणांच्या कुटुंबांना 50 लाखांची आर्थिक मदत तर 90 जणांच्या वारसांना नोकरी दिली जाणार आहे. मुंबई महापालिकेने नुकतंच याबाबतचे परिपत्रक जारी केले आहे. (BMC Provide financial Help to the families who died during Corona period)

मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, गेल्यावर्षी मार्चमध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर काही दिवसांतच रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढू लागली. मुंबई महापालिकेच्या 6766 कर्मचाऱ्यांना दीड वर्षात कोरोनाची लागण झाली. यातील तब्बल 5803 कर्मचारी कोरोनाला हरवून पुन्हा आपल्या कर्तव्यावर हजर झाले आहेत.

केंद्राकडून 50 लाखांची मदत

मात्र तब्बल 228 कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोविड डय़ुटी करताना मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारकडूनही आर्थिक मदत करण्यात येते. या पार्श्वभूमीवर पालिकेने आर्थिक मदतीसाठी 200 प्रस्ताव केंद्राकडेही पाठवले होते. मात्र यातील केवळ 19 प्रकरणांत केंद्राने 50 लाखांची मदत दिली आहे.

तर उर्वरित कुटुंबांना आधार देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यानुसार 91 जणांच्या कुटुंबांना 50 लाखांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. तर 90 जणांच्या वारसांना नोकरीही दिली जाईल, असे यात स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, पालिकेचे 967 कर्मचारी अजूनही कोरोनाबाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही पालिका मदत करणार

कोविड कामासाठी अनेक कंत्राटी कर्मचाऱयांची भरती करण्यात आली. शिवाय पालिकेचे शेकडो कंत्राटी कर्मचारीही आहेत. यामध्ये कोविड डय़ुटी करताना 9 कंत्राटी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होऊन मृत्यू झाला आहे. यामध्ये कंत्राटी कामगार मृत्यू झालेले 3 प्रस्तावही केंद्राने मंजूर केले आहेत. तर उर्वरित सहा कर्मचाऱ्यांना पालिका आर्थिक मदत देणार आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

(BMC Provide financial Help to the families who died during Corona period)

संबंधित बातम्या :

प्रसिद्धी मोहिमेवर ठाकरे सरकारकडून 155 कोटी खर्च, सोशल मीडियावर 6 कोटींचा खर्च

पूर्व उत्तर मुंबईत 5 हजार झाडं लावली जाणार, भाजप खासदार गोपाळ शेट्टींचा संकल्प

हिंदमाताजवळ पाणी साचण्याची समस्या कायमची दूर होणार, आदित्य ठाकरेंकडून कामाची पाहणी

Non Stop LIVE Update
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.
जाहीरपणे धमक्या? ही भाषा तुम्हाला शोभते का? राऊतांचा दादांवर घणाघात
जाहीरपणे धमक्या? ही भाषा तुम्हाला शोभते का? राऊतांचा दादांवर घणाघात.
48 तासात उत्तर द्या, अन्यथा... निवडणूक अधिकाऱ्याकडून पुन्हा नोटीस
48 तासात उत्तर द्या, अन्यथा... निवडणूक अधिकाऱ्याकडून पुन्हा नोटीस.
भांडूपमध्ये मध्यरात्री कोट्यवधींची रोकड सापडली, भरारी पथकाची कारवाई
भांडूपमध्ये मध्यरात्री कोट्यवधींची रोकड सापडली, भरारी पथकाची कारवाई.
मला शरम वाटली असती, असे म्हणत अजितदादांकडून सुप्रिया सुळेंची मिमिक्री
मला शरम वाटली असती, असे म्हणत अजितदादांकडून सुप्रिया सुळेंची मिमिक्री.
उत्तर मध्य मुंबईत भाजपनं उमेदवार बदलला, पूनम महाजनांचा पत्ता कट
उत्तर मध्य मुंबईत भाजपनं उमेदवार बदलला, पूनम महाजनांचा पत्ता कट.
गडी आपल्यात आला पाहिजे, नाहीतर घाबरून...,सदाभाऊंचं ईडीसंदर्भातील विधान
गडी आपल्यात आला पाहिजे, नाहीतर घाबरून...,सदाभाऊंचं ईडीसंदर्भातील विधान.