AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! मुंबई महापालिकेची निवडणूक अद्याप का घेतली नाही? मुंबई हायकोर्टाचा निवडणूक आयोगाला सवाल

मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील 24 महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांसह पंचायत समितीच्या निवडणुका अद्याप का घेतल्या नाहीत? अशी विचारणा सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.

मोठी बातमी! मुंबई महापालिकेची निवडणूक अद्याप का घेतली नाही? मुंबई हायकोर्टाचा निवडणूक आयोगाला सवाल
Image Credit source: Google
| Edited By: | Updated on: Feb 27, 2023 | 11:58 PM
Share

मुंबई : मुंबई महानगरपालिकेसह (BMC) राज्यातील 24 महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांसह पंचायत समितीच्या निवडणुका अद्याप का घेतल्या नाहीत? अशी विचारणा सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. या संदर्भात प्रतिज्ञापत्रावर आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. दर पाच वर्षांनी निवडणुका घ्याव्यात. या घटनेनं घातलेल्या नियमाचं राज्य निवडणूक आयोगानं उल्लंघन केलं आहे. तसेच आयोगाची ही कृती देशद्रोही असल्यानं याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करत मुंबईतील रहिवासी रोहन पवारनं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठासमोर आज (27 फेब्रुवारी) या प्रकरणावर सुनावणी झाली. निवडणूक आयोगाचे अधिकार कोणीच हिरावून घेऊ शकत नाहीत, निवडणुका प्रक्रिया राबवण्याचा आयोगाचा अधिकार अबाधित आहे. तरीही निवडणूक आयोगाकडून निवडणुका का घेतल्या जात नाहीत? असा प्रश्न याचिकाकर्त्याच्यावतीनं त्यांचे वकील अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी युक्तिवाद करताना उपस्थित केला.

राज्यभरात लवकरच निवडणुकांचा धुराळा

दरम्यान, राज्यात पुढच्या काही दिवसांमध्ये निवडणुकांचा धुराळा उडणार आहे. कारण राज्यात पुढच्यावर्षी लोकसभा आणि राज्यसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. विशेष म्हणजे त्याआधी राज्यातील मोठमोठ्या शहरांमधील महापालिका निवडणुका प्रलंबित आहेत. त्यामुळे या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. या निवडणुकीसाठी सर्वच पक्ष चांगलेच तयारीला लागले आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

राज्यातील काही महापालिकांचा कार्यकाळ तर कोरोना काळातच संपलाय. पण कोरोना संकटामुळे निवडणूक होऊ शकली नाही. आता कोरोना संसर्गाच प्रमाण कमी झाल्यानंतरही निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत. त्यामुळे या निवडणुका नेमक्या कधी जाहीर होतील? याकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे. अर्थात निवडणुका जाहीर न करण्यामागे राज्य निवडणूक आयोगाकडेदेखील काही कायदेशीर कारणं असू शकतात. याच बाबतची माहिती आता हायकोर्टाच्या आदेशानंतर समजण्याची शक्यता आहे.

Follow Us
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.