AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

YMCA ची 150 वर्षे पूर्ण, शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्धापन दिन थाटामाटात साजरा होणार

बॉम्बे वायएमसीए आपला १५० वा वर्धापन दिन २५ एप्रिल २०२५ रोजी साजरा करत आहे. १८७५ पासून समाजसेवा, क्रीडा आणि शिक्षण या क्षेत्रात संस्थेने मोलाचे योगदान दिले आहे. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन आणि वायएमसीएच्या जागतिक अध्यक्षांची उपस्थिती या कार्यक्रमाची शोभा वाढवेल.

YMCA ची 150 वर्षे पूर्ण, शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्धापन दिन थाटामाटात साजरा होणार
Bombay YMCA
| Edited By: | Updated on: Apr 24, 2025 | 8:51 PM
Share

बॉम्बे यंग मेन्स ख्रिश्चन असोसिएशन (वायएमसीए) या प्रतिष्ठित संस्थेने समाजाचे सक्षमीकरण, जीवनात सकारात्मक बदल घडवणे तसेच सेवा, क्रीडा आणि सामाजिक विकास यांसारख्या क्षेत्रांमध्ये १८७५ पासून अविरतपणे कार्य केले आहे. आता ही संस्था आपल्या स्थापनेची १५० वर्षे पूर्ण करत आहे. या ऐतिहासिक क्षणाचे औचित्य साधून, संस्थेचा शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्धापन दिन शुक्रवार, दिनांक २५ एप्रिल, २०२५ रोजी नरिमन पॉइंट येथील एनसीपीएच्या जमशेद भाभा थिएटरमध्ये मोठ्या थाटामाटात साजरा केला जाणार आहे.

या विशेष कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, तर वायएमसीएच्या जागतिक अध्यक्षा सोहेला हायेक या सन्माननीय अतिथी म्हणून कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहेत. याव्यतिरिक्त, जागतिक वायएमसीए चळवळीतील अनेक मान्यवर, राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित व्यक्ती, संस्थेचे हितचिंतक आणि शुभेच्छुक या सोहळ्याला उपस्थित राहतील, अशी माहिती बॉम्बे वायएमसीएचे अध्यक्ष नोएल अमन्ना यांनी दिली.

मुंबईकरांच्या जडणघडणीतही संस्थेने मोलाची भूमिका बजावली

या महत्त्वपूर्ण प्रसंगी बोलताना नोएल अमन्ना म्हणाले, “मुंबईसारख्या धावपळीच्या शहरात सामाजिक बांधिलकी जपत दीडशे वर्षे अविरत सेवाकार्य करणे हे बॉम्बे वायएमसीएसाठी अभिमानास्पद आहे. क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यापासून ते युवकांसाठी वसतिगृहांची स्थापना करण्यापर्यंत आणि सर्वसमावेशक जागा, निवारे व शैक्षणिक उपक्रम चालवण्यापर्यंत संस्थेने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. केवळ कठीण परिस्थितीतच नव्हे, तर अनेक पिढ्यांच्या मुंबईकरांच्या जडणघडणीतही संस्थेने मोलाची भूमिका बजावली आहे.”

बॉम्बे वायएमसीएचे सरचिटणीस ऑलिन कोटियन यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेताना सांगितले, “बॉम्बे वायएमसीएची स्थापना २५ एप्रिल, १८७५ रोजी धोबी तलाव येथील फ्रामजी कावसजी हॉलमध्ये झाली. आधुनिक युगाच्या उंबरठ्यावर असलेल्या वसाहती शहरातील तरुणांच्या आध्यात्मिक आणि सांसारिक गरजा पूर्ण करणे हा संस्थेचा मुख्य उद्देश होता. केवळ १८८ सदस्यांच्या एका लहान गटाने या संस्थेची सुरुवात केली, ज्यात २० भारतीयांचा समावेश होता. अगदी सुरुवातीपासूनच सर्वसमावेशकता आणि श्रद्धेच्या मूल्यांचे प्रतिबिंब संस्थेच्या कार्यात दिसून येते.”

बास्केटबॉलच्या विकासात वायएमसीएचे योगदान

भारतीय बास्केटबॉलच्या विकासात वायएमसीएचे योगदान अतुलनीय आहे, हे सर्वज्ञात आहे. वायएमसीएचे मार्गदर्शक जेम्स नॅस्मिथ यांनी अमेरिकेत या खेळाचा शोध लावला आणि मुंबईत संस्थेने या खेळाची मशाल सतत तेवत ठेवली. कालांतराने फुटबॉल, टेबल टेनिस, जिम्नॅस्टिक्स आणि त्यानंतर जलतरण व बिलियर्ड्स यांसारख्या क्रीडा प्रकारांनाही संस्थेने प्रोत्साहन दिले.

बॉम्बे वायएमसीएने १९१४ मध्ये आपला शारीरिक शिक्षण विभाग सुरू केला आणि १९२४ च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचा पहिला ऑलिम्पिक चमू पाठवण्याच्या प्रयत्नात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. संस्थेने पहिले वसतिगृह १८९० मध्ये सुरू केले, ज्यामुळे तरुण नोकरदार पुरुषांना परवडणाऱ्या दरात सुरक्षित निवासस्थान उपलब्ध झाले. आज वायएमसीएच्या वसतिगृहांनी शहरातील विद्यार्थी, व्यावसायिक आणि नवोदित लोकांसाठी आश्रयस्थान म्हणून ओळख मिळवली आहे. १९७२ मध्ये बॉम्बे वायएमसीएचे मुख्यालय अपोलो बंदर येथून मुंबई सेंट्रल येथील वायएमसीए इंटरनॅशनल हाऊसमध्ये स्थलांतरित झाले. या मोठ्या जागेत निवास व्यवस्था, प्रशिक्षण केंद्र आणि सामुदायिक कार्यक्रमांसाठी सोय उपलब्ध झाली. त्यानंतर संस्थेने ‘शरण’ या नवीन उपक्रमाद्वारे मुंबई महानगरपालिकेच्या मदतीने अंधेरीतील साकीनाका परिसरात ३२ खाटांची तात्पुरती निवारा व्यवस्था उभारली. शहराच्या विकासाबरोबरच संस्थेने लोणावळ्याजवळ कान्हे येथे एक प्रेरणादायी ग्रामीण विकास प्रकल्पही चालवला आहे, जो आसपासच्या गावांतील तरुण आणि महिलांसाठी जीवनदायी ठरला आहे.

केवळ आमच्या भूतकाळाचा गौरव नाही, तर…

या ऐतिहासिक टप्प्यावर बोलताना अध्यक्ष नोएल अमन्ना यांनी संस्थेच्या भविष्यातील वाटचालीवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, “बॉम्बे वायएमसीएची दीडशे वर्षांची ही यात्रा प्रार्थना, श्रद्धेची शक्ती, समर्पण, सेवा आणि समुदायाच्या योगदानाचा जिवंत दाखला आहे. १८७५ मध्ये स्थापनेपासून, आम्ही युवकांचा सर्वांगीण विकास, कुटुंबांचे सक्षमीकरण, सामाजिक बदल घडवणे आणि अधिक समावेशक व समान समाज निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहोत. या ऐतिहासिक सोहळ्याच्या निमित्ताने, आम्ही आमच्या ध्येयांशी नव्याने बांधिलकी व्यक्त करतो आणि एक सशक्त व्यक्ती, कुटुंब आणि समुदाय घडवण्यासाठी कार्यरत राहण्याचा निर्धार करतो. हे वर्ष केवळ आमच्या भूतकाळाचा गौरव नाही, तर वर्तमानकाळातील आमची निष्ठा आणि भविष्यातील आश्वासक वचन आहे.”

सरचिटणीस ऑलिन कोटियन यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. ते म्हणाले, “आमचे उपक्रम बौद्धिक, शारीरिक आणि आध्यात्मिक विकासाबरोबरच क्रीडा, शिक्षण, आपत्ती निवारण आणि समुदाय कल्याणावर आधारित आहेत. आमच्या सामुदायिक प्रकल्पांमध्ये बालवाडी, रात्र अभ्यास केंद्र, मुले आणि महिलांसाठी निवारा, शिष्यवृत्ती आणि कुटुंब सेवांचा समावेश आहे. व्यक्ती, समुदाय आणि समाजाचे जीवनमान उंचावणे हाच आमचा प्रमुख उद्देश आहे.”

लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल

उपाध्यक्ष मायकेल मॅन्युअल राज यांनी संस्थेच्या मूल्यांवर आणि कार्यावर जोर दिला. ते म्हणाले, “स्वयंसेवक-आधारित आणि मूल्यांवर आधारित ही संस्था ‘टू गॉड अलोन’ म्हणजेच ‘फक्त देवासाठी’ या विचारानुसार कार्यरत आहे. क्रीडा विकासाला प्रोत्साहन आणि वसतिगृह सुविधा पुरवण्यापासून ते शिक्षण, बालवाडी, मुलांसाठी निवारा आणि महिला सक्षमीकरणाला पाठिंबा देण्यापर्यंत आमच्या योगदानाने सर्व धर्म, वर्ग आणि पिढ्यांमधील लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवले आहेत.”

अशा प्रकारे, बॉम्बे वायएमसीएने समाजसेवा आणि क्रीडा क्षेत्रात १५० वर्षांची यशस्वी आणि प्रेरणादायी वाटचाल पूर्ण केली आहे. ही संस्था आजही एका दीपस्तंभाप्रमाणे कार्यरत असून, व्यक्ती आणि समाजाला सक्षम बनवून उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन करत आहे.

निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.