AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bandra Gareeb Nagar : गरीब नगरमध्ये ज्यांनी पोलिसांवर दगड मारण्यासाठी हात उचलले त्यांच्यावर थेट..मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

Bandra Gareeb Nagar : काल वांद्र्यात गरीबनगर झोपडपट्टीत अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू असताना पोलिसांवर जमावाने दगडफेक केली होती. त्यांना पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे.

Bandra Gareeb Nagar : गरीब नगरमध्ये ज्यांनी पोलिसांवर दगड मारण्यासाठी हात उचलले त्यांच्यावर थेट..मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
Bandra Gareeb Nagar
| Updated on: May 21, 2026 | 12:13 PM
Share

वांद्रे पूर्वेतील गरीब नगरमध्ये रेल्वेच्या कारवाईचा आज सलग तिसरा दिवस आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सुरू झालेली ही मोहीम निर्णायक टप्प्यात पोहोचलीय. काल 60 टक्के पाडकाम पूर्ण झालं. पण संध्याकाळी अतिक्रमण हटवण्याच्या निषेधार्थ संतप्त स्थानिकांनी पोलिसांवर दगडफेक केली. बुलडोझर पुन्हा एकदा उरलेल्या झोपड्यांवर चालवले जात आहेत. रेल्वेने आज सलग तिसऱ्या दिवशी येथील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केलीय. कालच्या दगडफेकीच्या घटनेनंतर आजही कडक पोलीस बंदोबस्त तैनात आहे. ज्यामध्ये मुंबई पोलीस, RPF, GRP सह रॅपिड अॅक्शन फोर्सच्या तुकड्या तैनात आहेत.

कालच्या दगडफेकी प्रकरणी पोलिसांनी कलम 109 नुसार हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. एकूण 100-150 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी 16 लोकांना अटक करण्यात आली आहे. एफआयआरमध्ये 10 जणांची नावं आहेत. काल झालेल्या दगडफेकीत पाच पोलीस जखमी झाले होते.

किती जणांना अटक?

पोलिसांवर केलेल्या दगडफेक प्रकरणात 16 जणांना अटक झाली आहे. आज कोर्टात सर्व आरोपीना हजर करण्यात येईल. काल वांद्र्यात गरीबनगर झोपडपट्टीत अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू असताना पोलिसांवर जमावाने दगडफेक केली होती. दगडफेक करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. आतापर्यंत 16 जणांची ओळख पटवून अटक करण्यात आली आहे. आज इथे पहाटेपासून रेल्वे प्रशासन आणि पोलीस दल पुन्हा सज्ज आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एकूण 500 बेकायदेशीर अतिक्रमणं हटवली जाणार आहेत.

अतिक्रमणं हटवण्याचं किती टक्के काम बाकी?

आज तिसऱ्या दिवशीही अतिक्रमणाविरोधात कारवाई सुरू झाली आहे. अतिक्रमणं हटवण्याचे सुमारे 85 टक्के काम पूर्ण झाले आहे. कालच्या घटनेनंतर, अतिक्रमणे हटवणे सोपे व्हावे, यासाठी आज यंत्रसामग्री वाढवण्यात आली आहे. 1200 सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत, विविध विभागांतील लोक तेथे आहेत. येथे राहणाऱ्या लोकांना रेल्वेतर्फे पाणी आणि अन्नही पुरवले जात आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिली. काल अतिक्रमणं हटवताना पोलिसांना लाठीचार्ज करावा लागलेला. ही जागा रिकामी केल्यामुळे वांद्रे टर्मिनसचा विस्तार होईल. 5वी-6वी लाईन टाकण्यासाठी जागा उपलब्ध होईल. यामुळे लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांची संख्या वाढेल. वाहतूक कोंडी कमी होईल.

Follow Us
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला