AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cabinet Meeting पूर्वीच शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता; पीक नुकसानीसाठी 2,215 कोटींची मदत जाहीर, कुणाला फायदा होणार?

Cabinet Meeting : महाराष्ट्रात अतिवृष्टीने 70 लाख एकरवरील पीक हातचं गेलं आहे. तर अनेक गावात पूरस्थिती आहे. शाळा, घराचं मोठं नुकसान झालं आहे. सध्या कॅबिनेट बैठक सुरू आहे. पण त्यापूर्वीच एक मोठी वार्ता येऊन ठेपली आहे. पीक नुकसानीसाठी 2,215 कोटींची मदत जाहीर झाली आहे.

Cabinet Meeting पूर्वीच शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता; पीक नुकसानीसाठी 2,215 कोटींची मदत जाहीर, कुणाला फायदा होणार?
खरीप 2025
| Updated on: Sep 23, 2025 | 1:27 PM
Share

महाराष्ट्रात अतिवृष्टीने 70 लाख एकरवरील पीक हातचं गेलं आहे. तर अनेक गावात पूरस्थिती आहे. शाळा, घराचं मोठं नुकसान झालं आहे. सध्या कॅबिनेट बैठक (Cabinet Meeting) सुरू आहे. पण त्यापूर्वीच एक मोठी वार्ता येऊन ठेपली आहे. पीक नुकसानीसाठी 2,215 कोटींची मदत जाहीर झाली आहे. पीक नुकसानीसाठी मदत म्हणून 31.64 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होईल. मदत व पूनर्वसन विभागाने याविषयीचा शासन निर्णय जाहीर केला. खरीप 2025 (Kharip 2025) साठी ही मदत जाहीर करण्यात आली आहे.

2,215 कोटींच्या मदतीला मंजूरी

राज्यात विदर्भ, मराठवाड्यात पावसाने हाहाकार घातला आहे. पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक गावांना पावसाने तडाखा दिला आहे. त्याचा आढावा सरकार सातत्याने घेत होतं. यापूर्वी विदर्भात पावसाने धुमाकूळ घातला. तर आता विदर्भासह मराठवाड्याला पावसाने झोडपून काढले आहे. यापूर्वीच्या नुकसानीचे आणि आताचे पंचनामे हे युद्धपातळीवर करण्यात येत आहे. आतापर्यंत जी आकडेवारी प्राप्त झाली आहे. त्यानुसार 32 लाख शेतकऱ्यांचं मोठं नुकसान राज्यात झाले आहे.

त्यासाठी 2,215 कोटींच्या मदतीला मंजूरी देण्यात आली आहे. हा निधी आजच शेतकऱ्यांच्या खात्यात वळता करता येईल. यामध्ये विदर्भातील काही जिल्ह्यांचा आणि मराठवाड्यातील धाराशिवसह नांदेड आणि बीडमध्ये मुसळधार पावसाने नुकसान झालेल्या पट्ट्याचा समावेश आहे. तर आता पावसामुळे जे नुकसान झाले आहे. त्याचा आढावा सुद्धा घेतला जात आहे. ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी वारंवार विरोधी पक्ष करत आहेत. तर विदर्भ आणि मराठवाड्यातील नुकसानग्रस्त गावांची, जिल्ह्यांची विभागवार आकडेवारी तयार करण्यात आली आहे. युद्धपातळीवर ही मदत आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. अनेक भागात अद्यापही पाणी आहे, त्यामुळे तिथे पंचनामे झालेले नाहीत. पाणी ओसरल्यावर याठिकाणचे पंचनामे करण्याचे कामही करण्यात येणार आहे.

1,339 कोटींची मदत जाहीर

दरम्यान सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठी मदत जाहीर करण्यात आली आहे. जून 2025 ते ऑगस्ट 2025 या दरम्यान नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली आहे. नुकसानग्रस्तांना राज्य सरकार 1 हाजर 339 कोटींची मदत देणार आहे. अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांसाठी ही मदत जाहीर करण्यात आली आहे. जून ते ऑगस्ट 2025 या काळात जे पंचनामे केले, त्याआधारे ही मदतीची घोषणा करण्यात आली आहे. तर बीड, धाराशिवसह काही जिल्ह्यात रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहेत. हेलिकॉप्टरच्या मदतीने पूरात अडकलेल्या गावातील नागरिकांची सुटका करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.