AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आपण एकत्र यायला पाहिजे… संजय राऊत यांचे चंद्रकांत पाटील यांना उद्देशून वक्तव्य…राऊतांच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण

राज्यात २०१९ ची विधानसभा निवडणूक भाजप आणि शिवसेनेने एकत्र लढवली होती. या युतीला जनतेने बहुमत दिले. परंतु निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्री पदावरुन दोन्ही पक्षांमध्ये वाद सुरु झाला. त्यानंतर दोन्ही पक्षांनी वेगळी भूमिका घेतली आणि युती तुटली.

आपण एकत्र यायला पाहिजे... संजय राऊत यांचे चंद्रकांत पाटील यांना उद्देशून वक्तव्य...राऊतांच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण
sanjay raut chandrakant patil
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jul 12, 2024 | 3:15 PM
Share

राज्यातील विधान परिषद निवडणुकीकडे तमाम राजकारण्याचे लक्ष लागले आहे. ११ जागांसाठी १२ उमेदवार विधान परिषदेच्या निवडणूक रिंगणात आहे. त्यामुळे कोणाची विकेट पडणार? हे आज संध्याकाळी स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीनिमित्त कधीकाळी एकत्र असलेले अनेक जुने सहकारी एकमेकांना भेटले. या निवडणुकीसाठी शिवसेना उबाठा नेते आणि खासदार संजय राऊत विधिमंडळ परिसरात आले होते. त्यावेळी त्यांची आणि भाजप नेते चंद्राकांत पाटील यांची भेट झाली. या भेटीवेळी आपण एकत्र यायला पाहिजे, असे संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना उद्देशून म्हटले. त्यानंतर राज्यातील राजकारणात पुन्हा नव्या समीकरणांची चर्चा सुरु झाली. राऊत यांच्या वक्तव्यानंतर दोन जुने मित्रपक्ष पुन्हा एकत्र येणार की काय? या चर्चेला उधान आले आहे.

अशी बदलत गेली परिस्थिती

राज्यात २०१९ ची विधानसभा निवडणूक भाजप आणि शिवसेनेने एकत्र लढवली होती. या युतीला जनतेने बहुमत दिले. परंतु निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्री पदावरुन दोन्ही पक्षांमध्ये वाद सुरु झाला. त्यानंतर दोन्ही पक्षांनी वेगळी भूमिका घेतली आणि युती तुटली. त्यानंतर भाजपने अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा प्रयत्न केला. परंतु ते सरकार काही तासांमध्ये पडले. शेवटी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत शिवसेना गेली. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले.

शिवसेनेत बंड अन् भाजप-शिवसेना उबाठात हल्ले-प्रतिहल्ले

महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्रीपद उद्धव ठाकरे यांना मिळाले. जून २०२२ मध्ये राज्यातील राजकारणात आणखी एक भूकंप झाला. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील ४० आमदारांना सोबत घेऊन आपला वेगळा गट स्थापन केला. ते भाजपसोबत गेले. त्यामुळे शिवसेना दोन गट तयार झाले.

एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी शिवसेना असल्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला. उद्धव ठाकरे यांना शिवसेना उबाठा असे नाव घ्यावे लागले. त्यानंतर भाजप आणि शिवसेना उबाठा एकमेकांवर टीकेची एकही संधी सोडत नाही. खासदार संजय राऊत नियमित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ले करत आहेत. त्या विधान परिषद निवडणूक निमित्ताने संजय राऊत आणि चंद्रकांत पाटील यांची भेट झाली. त्या भेटीत आपण एकत्र यायला पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हटल्यामुळे राज्यातील राजकारण पुन्हा बदलणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

Follow Us
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच,बंड करण्याआधी
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच, बंड करण्याआधीच...ऑपरेशन लोटसबाबत मोठी माहिती समोर!
राजकीय हालचालींना वेग! ठकारेंचे चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं
राजकीय हालचालींना वेग! ठकारे सेनेतील चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं घडणार?
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला...
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला... नागपूरमध्ये डोकं चक्रावणारा प्रकार
काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर... गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकद
Chandrapur | काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर...  गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकदा चिघळणार
महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
Chandrashekhar Bawankule | महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळं; संशयाचा काटा
Sanchita Ugle Case | तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळलं; संशयाचा काटा नेमका कुणावार
एकही मत फुटता कामा नये; महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
एकही मत फुटता कामा नये; विधान परिषद निवडणुकीत महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
मोठी बातमी! पांढऱ्या कोटामागचा काळा चेहरा? उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केल
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केला अन्...त्या कृतीची सगळीकडे चर्चा!
मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप..
Manda Mhatre | मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप, भाजपाचे दोन्ही नेत्यांमध्ये मोठा वाद!