AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आपण एकत्र यायला पाहिजे… संजय राऊत यांचे चंद्रकांत पाटील यांना उद्देशून वक्तव्य…राऊतांच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण

राज्यात २०१९ ची विधानसभा निवडणूक भाजप आणि शिवसेनेने एकत्र लढवली होती. या युतीला जनतेने बहुमत दिले. परंतु निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्री पदावरुन दोन्ही पक्षांमध्ये वाद सुरु झाला. त्यानंतर दोन्ही पक्षांनी वेगळी भूमिका घेतली आणि युती तुटली.

आपण एकत्र यायला पाहिजे... संजय राऊत यांचे चंद्रकांत पाटील यांना उद्देशून वक्तव्य...राऊतांच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण
sanjay raut chandrakant patil
| Updated on: Jul 12, 2024 | 3:15 PM
Share

राज्यातील विधान परिषद निवडणुकीकडे तमाम राजकारण्याचे लक्ष लागले आहे. ११ जागांसाठी १२ उमेदवार विधान परिषदेच्या निवडणूक रिंगणात आहे. त्यामुळे कोणाची विकेट पडणार? हे आज संध्याकाळी स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीनिमित्त कधीकाळी एकत्र असलेले अनेक जुने सहकारी एकमेकांना भेटले. या निवडणुकीसाठी शिवसेना उबाठा नेते आणि खासदार संजय राऊत विधिमंडळ परिसरात आले होते. त्यावेळी त्यांची आणि भाजप नेते चंद्राकांत पाटील यांची भेट झाली. या भेटीवेळी आपण एकत्र यायला पाहिजे, असे संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना उद्देशून म्हटले. त्यानंतर राज्यातील राजकारणात पुन्हा नव्या समीकरणांची चर्चा सुरु झाली. राऊत यांच्या वक्तव्यानंतर दोन जुने मित्रपक्ष पुन्हा एकत्र येणार की काय? या चर्चेला उधान आले आहे.

अशी बदलत गेली परिस्थिती

राज्यात २०१९ ची विधानसभा निवडणूक भाजप आणि शिवसेनेने एकत्र लढवली होती. या युतीला जनतेने बहुमत दिले. परंतु निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्री पदावरुन दोन्ही पक्षांमध्ये वाद सुरु झाला. त्यानंतर दोन्ही पक्षांनी वेगळी भूमिका घेतली आणि युती तुटली. त्यानंतर भाजपने अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा प्रयत्न केला. परंतु ते सरकार काही तासांमध्ये पडले. शेवटी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत शिवसेना गेली. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले.

शिवसेनेत बंड अन् भाजप-शिवसेना उबाठात हल्ले-प्रतिहल्ले

महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्रीपद उद्धव ठाकरे यांना मिळाले. जून २०२२ मध्ये राज्यातील राजकारणात आणखी एक भूकंप झाला. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील ४० आमदारांना सोबत घेऊन आपला वेगळा गट स्थापन केला. ते भाजपसोबत गेले. त्यामुळे शिवसेना दोन गट तयार झाले.

एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी शिवसेना असल्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला. उद्धव ठाकरे यांना शिवसेना उबाठा असे नाव घ्यावे लागले. त्यानंतर भाजप आणि शिवसेना उबाठा एकमेकांवर टीकेची एकही संधी सोडत नाही. खासदार संजय राऊत नियमित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ले करत आहेत. त्या विधान परिषद निवडणूक निमित्ताने संजय राऊत आणि चंद्रकांत पाटील यांची भेट झाली. त्या भेटीत आपण एकत्र यायला पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हटल्यामुळे राज्यातील राजकारण पुन्हा बदलणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

Follow Us
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर.
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले.
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले.
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची..
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची...
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा.
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल.
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना....
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना.....
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या...
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या....
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना.
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ.