AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: जलयुक्त शिवारमुळे महापूर आला असं म्हणणं हस्यास्पद; चंद्रकांत पाटील यांचा दावा

जलयुक्त शिवारामुळे राज्यात महापूर येत असल्याचं मत पर्यावरतज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांनी व्यक्त केलं होतं. त्यावरून सत्ताधाऱ्यांनी भाजपला घेरलेलं असतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यावर प्रत्युत्तर दिलं आहे. (chandrakant patil)

VIDEO: जलयुक्त शिवारमुळे महापूर आला असं म्हणणं हस्यास्पद; चंद्रकांत पाटील यांचा दावा
चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप
| Edited By: | Updated on: Sep 30, 2021 | 5:31 PM
Share

मुंबई: जलयुक्त शिवारामुळे राज्यात महापूर येत असल्याचं मत पर्यावरतज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांनी व्यक्त केलं होतं. त्यावरून सत्ताधाऱ्यांनी भाजपला घेरलेलं असतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यावर प्रत्युत्तर दिलं आहे. जलयुक्त शिवारच्या तांत्रिक अडचणीमुळे पूर आलेला नाही. महापुरामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं असलं तरी या पावसाच्या निमित्ताने जलयुक्त शिवारची झालेली कामे उपयुक्त आहेत. या पाण्यामुळे शेतकऱ्यांना फायदाच झाला आहे. जलयुक्त शिवारामुळे महापूर आला असं म्हणणं हे हस्यास्पद आहे, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा केला आहे. नदीपात्रातील कामांचा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रात झाला आहे. कोल्हापुरात धरणाचं पाणी सोडल्यावर नदीचा फ्लो वाढतो आणि पाणी दुसरीकडे जाते. नद्यांना भिंती बांधून मराठवाड्याला पाणी वळवण्याचा विषय आला आहे. तसेच पाईपलाईन करून मराठवाड्यात पाणी नेण्याचा विचार आहे. त्याचप्रमाणे मराठवाड्यात पुराचं कारण काय? त्याचा मराठवाडा आणि नांदेड विद्यापीठाने अभ्यास केला पाहिजे. नदीपात्रातीली बांधकामं हा कॉमन विषय आहे, असं सांगतानाच जलयुक्त शिवारावर खूप दुषणं देऊन पाहिली. समित्या नेमल्या. पण लोक आनंदी आहेत. जलयुक्तमुळे पाणी साठा वाढला, असं त्यांनी सांगितलं.

फडणवीस पूरग्रस्त भागांची पाहणी करणार

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस येत्या 2 ऑक्टोबरपासून पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ते विदर्भातील पूरस्थितीची पाहणी करतील. त्यानंतर मराठवाड्यातील परिस्थितीची पाहणी करतील, असं पाटील म्हणाले. पूरग्रस्तांना मदत करण्याचा विषय आल्यावर प्रत्येक वेळी राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवत असते. गुजरातला जसे 1000 कोटी मिळाले तसे महाराष्ट्राला 700 कोटी मिळालेलं आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

देगलूरसाठी भाजपची फिल्डिंग

येत्या 30 ऑक्टोबर रोजी देगलूर विधानसभेची पोटनिवडणूक होणार आहे. देगलूरची निवडणूक व्यवस्थित लढवली जाईल. आम्ही त्याची व्यूवहरचना आखली आहे. येत्या 4 ऑक्टोबर रोजी आम्ही देगलूरमध्ये मोठी सभा घेऊन संबोधित करणार आहोत. मी, आशिष शेलार, गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत देगलूरला जाणार आहोत. 7 ऑक्टोबर रोजी आम्ही निवडणूक अर्ज भरू. आमचा सर्व्हे झाला आहे. निवडणूक लढवण्यासाठी 12 जणांची नावं पुढे आली आहेत. त्यात लिंगायत समाजाच्या स्वामींचंही नाव आहे. मात्र, स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा करून 4 तारखेलाच आम्ही उमेदवाराचं नाव जाहीर करू, असं त्यांनी सांगितलं. आम्ही सत्तेत नसतानाही तिकीटसाठी आमच्याकडील इच्छुकांची संख्या वाढली आहे, हे चांगले संकेत आहेत, असंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

भाजीपाला विकणारे भुजबळ 25 वर्षात 25 हजार कोटींचे मालक कसे?, पालकमंत्रीपद काढून घ्या; कांदेंचा घणाघात

Maharashtra College Reopen: शैक्षणिक वर्ष 1 नोव्हेंबरला तर कॉलेज दिवाळीनंतर सुरु, उदय सामंतांची माहिती

उशीरा पेरणी झालेले सोयाबीन पडेल पदरात, काढणीची अशी घ्या काळजी

(chandrakant patil reaction on experts claim of Jalyukta Shivar scheme responsible for Marathwada floods)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.