AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरेगाव भीमाला जाणार, प्रसंगी न्यायालयात जाऊ: चंद्रशेखर आझाद

महाराष्ट्र आंबेडकरी चळवळीची जननी आहे, असं भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद म्हणाले, ( Chandrashekhar Azad Koregaon Bhima)

कोरेगाव भीमाला जाणार, प्रसंगी न्यायालयात जाऊ: चंद्रशेखर आझाद
चंद्रशेखर आझाद
| Updated on: Dec 31, 2020 | 3:29 PM
Share

मुबंई : भीम आर्मीचे प्रमख चंद्रशेखर आझाद तीन दिवसांच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत. कोरेगाव भीमा येथे अभिवादन करण्यासाठी जायचे आहे, मात्र सरकारने परवानगी दिली नाही, असं चंद्रशेखर आझाद म्हणाले. कोरेगाव भीमा येथे जाण्यासाठी न्यायलयात जाण्याची गरज लागली तर न्यायालयात जावू, असा इशारा आझाद यांनी दिला. चंद्रशेखर आझादटीव्ही 9 मराठीशी बोलत होते. ( Chandrashekhar Azad said he will go to Koregoan Bhima)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना माननारे लोक कोरेगाव भीमा शौर्य दिवस साजरा करतात. महाराष्ट्र आंबेडकरी चळवळीची मातृभूमी आहे. महाराष्ट्राकडून जास्त अपेक्षा आहे, येत्या काळात येथे आंबेडकरीचळवळ वेगानं वाढेल, असा विश्वास चंद्रशेखर आझाद म्हणाले. महाराष्ट्रात सरकार बदललं आहे. मात्र, जादा फरक झालेला नाही. मागील सरकारच्या तुलनेत हे सरकार बरे आहे, असंही चंद्रशेखर आझाद म्हणाले. दरवर्षी कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येण्याचा निर्धार केला होता. मात्र, गेल्या वर्षी तुरुंगात असल्यामुळे येता आले नाही. मात्र, यावर्षी कोणत्याही परिस्थिती कोरेगावा भीमाला जाणार असल्याचे चंद्रशेखर आझाद म्हणाले.

सरकारनं शेतकऱ्यांची बाजू ऐकायला हवी होती

दिल्लीतील शेतकरी आंदोलनावरुन चंद्रशेखर आझाद यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. महिनाभर शेतकरी आंदोलन करत आहेत पण सरकार त्यांची बाजू ऐकून घेत नाही. सरकार ज्यावेळी बोलवेल त्यावेळी शेतकरी चर्चेसाठी जातात, पण सरकार त्यांचं म्हणनं ऐकून घेत नाही, असं आझाद म्हणाले. केंद्र सरकार हुकुमशाही पद्धतीनं वागत आहे. सरकारनं आंदोलनस्थळी जाऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली पाहिजे होती. काही उद्योगपतींच्या फायद्यासाठी सरकार काम करतेय.देशातील शेतकरी जर सुखी असेल तर देश सुस्थितीत राहील. सरकारविरोधात कोणी बोललं तर त्यांच्या विरोधात ईडी, सीबीआय आणि केंद्रीय यंत्रणा लावतात. शेतकरी आंदोलनाला पूर्ण पाठिंबा आहे. शेतकऱ्यांची जमीन हिरावून घेण्याचा केंद्राचा प्रयत्न आहे, असं भीम आर्मीचे प्रमुख आझाद म्हणाले.

चंद्रशेखर आझाद तीन दिवस महाराष्ट्रात

भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद सध्या तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृहला भेट दिली. दादरच्या चैत्यभूमीला, पुण्यात भिडे वाडा येथे भेट देणार आहे, असंही चंद्रशेखर आझाद म्हणाले. नवीन वर्ष संघर्षानं सुरु होईल. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाचं रक्षण करण्याचं काम करण्याचा निर्धार केल्याचं चंद्रशेखर आझादआझाद यांनी सांगितले.

हेही वाचा:

एल्गार परिषद होणारच, बी जी कोळसे पाटलांची घोषणा, तारीखही जाहीर

कोरेगाव-भीमा शौर्य दिनानिमित्त पुणे-नगर महामार्ग 31 डिसेंबर रोजी बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

( Chandrashekhar Azad said he will go to Koregoan Bhima)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.