AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरन्यायाधीशांसाठी काय असतो प्रोटोकॉल? मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांवर न्या. गवई का झाले नाराज?

भारतीय राज्य घटनेच्या कलम 142 नुसार सुप्रीम कोर्टाला न्यायालयीन कार्यवाहीत पूर्ण न्याय देण्यासाठी आवश्यक असलेले आदेश जारी करण्याचा अधिकार आहे. त्याचा उल्लेख सरन्यायाधीश गवई यांनी भाषणात केला.

सरन्यायाधीशांसाठी काय असतो प्रोटोकॉल? मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांवर न्या. गवई का झाले नाराज?
b r gavai
| Updated on: May 19, 2025 | 11:08 AM
Share

सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीस बी.आर.गवई रविवारी महाराष्ट्र दौऱ्यावर होते. या दौऱ्यात महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांना प्रोटोकॉलचे पालन न केल्याने सरन्यायाधीश गवई नाराज झाले. ते मुंबईत पोहचल्यावर राज्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, मुंबईचे पोलीस आयुक्त उपस्थित राहिले नाहीत, त्याबद्दलची नाराजी त्यांनी जाहीरपणे व्यक्त केली. त्यांच्याकडून नाराजी व्यक्त केल्यानंतर काही तासांत दुसऱ्या कार्यक्रमात तिन्ही अधिकारी उपस्थित राहिले.

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पदाची सूत्र घेतल्यानंतर भूषण गवई 18 मे रोजी पहिल्यांदाच महाराष्ट्रात आले होते. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिल राज्यस्तरीय वकील परिषदेच्यावतीने सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार केला गेला. या कार्यक्रमात भाषणाच्या शेवटी त्यांनी प्रोटोकॉलचा मुद्दा उपस्थित करत नाराजीही व्यक्त केली. महाराष्ट्र प्रशासन आणि पोलीस यंत्रणेचे प्रमुख उपस्थित राहिले नसल्याचे त्यांनी बोलून दाखवले. ते म्हणाले, राज्यातील कोणताही व्यक्ती सरन्यायाधीश झाल्यावर प्रथम महाराष्ट्रात येत आहे. त्यावेळी मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, मुंबईचे पोलीस उपायुक्त उपस्थित राहिले नाही. त्याबद्दल त्यांनी विचार करायला हवा.

सरन्यायाधीश म्हणाले, प्रोटोकॉल नवीन नाही. एक घटनात्मक पदाला दुसऱ्यास दिलेला हा आदर आहे. जेव्हा घटनात्मक पदावरील प्रमुख व्यक्ती राज्यात आल्यावर त्यांच्याबाबत जो विचार केला जातो, त्यावर पुनर्विचार करायला हवा. जर माझ्या जागी दुसरे कोणी असते तर कलम 142 बद्दल चर्चा झाली असती. या गोष्टी छोट्या वाटू शकतात, परंतु लोकांना त्याबद्दल माहिती दिली पाहिजे. मी प्रोटोकॉलसंदर्भात जास्त आग्रही नाही. परंतु त्याची माहिती लोकांना असणे गरजेचे आहे, असे सरन्याधीश यांनी सांगितले.

काय आहे कलम 142

भारतीय संविधानाच्या कलम 142 नुसार सर्वोच्च न्यायालयाला न्यायालयीन कार्यवाहीत पूर्ण न्याय देण्यासाठी आवश्यक असलेले आदेश जारी करण्याचा अधिकार आहे. तसेच याअंतर्गत एखाद्या व्यक्तीची उपस्थिती सुनिश्चित करण्यासाठी निर्देश जारी करण्याचा अधिकार देखील न्यायालयाला आहे.

सररन्यायाधीश गवाई यांनी यापूर्वी सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनवर नाराजी व्यक्त केली होती. बार असोसिएशनने सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांना निरोप समारंभ दिला नव्हता. त्यावर सरन्यायाधीश गवाई यांनी मतभेद असणे वेगळे आहे, परंतु आदर व्यक्त करण्यात कमतरता असू नये, असे मत व्यक्त केले होते.

लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?.
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न.
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप.
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर.
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान.
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद.
ठाकरे सेना अन् मनसेच्या युतीची घोषणा कधी? पुढील आठवड्यात मोठी घडामोड
ठाकरे सेना अन् मनसेच्या युतीची घोषणा कधी? पुढील आठवड्यात मोठी घडामोड.