AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CM Uddhav Thackeray: 2017मध्ये छुपं राजकारण काय चाललंय याची माहिती नव्हती; मुख्यमंत्र्यांनी युतीची ती चर्चा फेटाळली

CM Uddhav Thackeray: आम्ही तिघं एकत्रं आलो हे लोकांना आश्चर्य वाटतं. आता आम्ही तीन विचारधारेचे लोकं चांगले काम करतं आहोत.

CM Uddhav Thackeray: 2017मध्ये छुपं राजकारण काय चाललंय याची माहिती नव्हती; मुख्यमंत्र्यांनी युतीची ती चर्चा फेटाळली
2017मध्ये छुपं राजकारण काय चाललंय याची माहिती नव्हती; मुख्यमंत्र्यांनी युतीची ती चर्चा फेटाळलीImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 01, 2022 | 1:30 PM
Share

मुंबई: 2017मध्ये राज्यात नवं समीकरण होणार होतं. राष्ट्रवादी काँग्रेस भाजप-सेना युतीत यायला तयार होती. पण त्याला शिवसेनेने विरोध केला होता, असा दावा भाजप नेते आशिष शेलार (ashish shelar) यांनी केला होता. त्यावरून राजकीय प्रतक्रियांचं मोहोळ उठलं होतं. या चर्चांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी पहिल्यांदाच उत्तर दिलं आहे. 2017मध्ये छुपं काय चाललंय हे शिवसेनेला (shivsena) माहीत नव्हतं. तीन पक्षाची युती होण्याबाबत त्यावेळेला आम्हाला सांगितलं गेलं नव्हतं. मला खोटं बोलायचं नाही. माझ्या लोकांशी बोलायचं नाही. माझी राजकीय कारकिर्द युतीत झाली. 25 वर्ष हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच युती घट्ट झाली होती. त्यावेळी काँग्रेस किंवा राष्ट्रवादी हा पर्याय आलाच नव्हता. 2017 रोजी नेमकं काय होतं की त्यांना युती करावीशी वाटली? त्यावेळी महापालिका निवडणुका होत्या. त्यावेळी शिवसेना भाजपची युती तुटली होती. मग तीन पक्षाच्या युतीचा प्रश्न येतो कुठे? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला.

दैनिक लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी हा खुलासा केला. 2017मध्ये काय झालं यावर जे सांगितलं जात आहे, त्याला दंतकथा म्हटलं तर दाखवयाचे आणि खायचे दात वेगळे होते. त्यामुळे कुठल्या दाताची कुठली कथा असंच म्हणावे लागेल. ते बोलतात. तेच त्यांचे दाखवयाचे दात असू शकतील. त्यांची दंतकथा वेगळी असू शकेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

निवडणुकीनंतरही युती कायम राहील

आम्ही तिघं एकत्रं आलो हे लोकांना आश्चर्य वाटतं. आता आम्ही तीन विचारधारेचे लोकं चांगले काम करतं आहोत. याचं आश्चर्यही लोकांना वाटतं. हे सरकार निवडणुकीत आणि निवडणुकीतनंतरही कायम राहील. जोपर्यंत एकमेकांच्या मनात पाप येत नाही, मित्र म्हणायचा आणि पाठीत वार करायचं असं होत नाही तोपर्यंत आम्ही 25 -30 वर्ष भाजप सोबत राहिलो होतो. त्यावेळीही चटके फटके खाल्ले होते, असंही त्यांनी सांगितलं.

ते हिंदुत्वाचा खेळ करत आहेत

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून त्यांनी भाजप आणि मनसेवर टीका केली. आम्ही नव्या खेळाडूंकडे लक्ष देत नाही. हे खेळाडू कोणत्या मैदानात कोणते खेळ करतात आतापर्यंत लोकांनी अनुभवलं. कधी मराठी, कधी हिंदुत्वाचा खेळ… मी इतरांचा अपमान करत नाही. डोंबारी वगैरेंचा… मी असा खेळ पाहिला आहे. दोन वर्षाचा कालखंड मोठा होता. नाटक, सिनेमा बंद होते. त्यामुळे लोकांना करमणूक मिळत असेल तर का नाही पाहणार? असा टोला त्यांनी लगावला.

Follow Us
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी