AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात खालच्या पातळीवरचं राजकारण, काँग्रेसच्या नेत्याने राज्यपालांसह भाजपवर साधला निशाणा

भारत जोडो यात्रा महागाई विरोधात आहे, बेरोजगारी, शेतकरी आणि कामगारांच्या प्रश्नांच्या लढाई ही सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

राज्यात खालच्या पातळीवरचं राजकारण, काँग्रेसच्या नेत्याने राज्यपालांसह भाजपवर साधला निशाणा
| Updated on: Dec 04, 2022 | 9:08 PM
Share

मुंबईः काँग्रेसने भारत जोडो यात्रा काढल्यानंतर आणि ती यात्रा देशातील वेगवेगळ्या राज्यातून मार्गक्रमण करत असताना अनेक राज्यातील नागरिकांनी त्यामध्ये सहभाग दर्शविला. महाराष्टातही ही भारत जोडो यात्रा आल्यानंतर राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांसह काँग्रेसच्या मित्र पक्षांनी त्यामध्ये सहभाग घेतला. त्याच धर्तीवर आणि भारत जोडो यात्रेच्या समर्थनासाठी मुंबईतही भाई जगताप, संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा काढण्यात आली.

यावेळी आमदार भाई जगताप यांनी भारत जोडोला मिळणाऱ्या प्रतिसादाबरोबरच विरोधकांकडून करण्यात आलेली टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

यावेळी भाई जगताप यांनी सांगितले की, राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आता विरोधकांकडून नको त्या गोष्टीवर त्यांनी टीका केली असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी भाई जगता यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल भाजप नेत्यांकडून केल्या जाणाऱ्या वक्तव्याबद्दल मत विचारले असता, त्यांनी गेल्या चाळीस वर्षा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल असे वक्तव्य केले गेले नाही मात्र आता खालच्या पातळीवर जाऊन हे राजकारण भाजपकडून केले जात असल्याची टीका त्यांनी भाजपवर केली आहे.

तर भारत जोडो यात्रेबद्दल बोलताना ते म्हणाले की, नफरत छोडो, भारत जोडो अशा विचारांनी माणसं भारत जोडो यात्रेत सहभागी होत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.

यावेळी त्यांनी ही भारत जोडो यात्रा महागाई विरोधात आहे, बेरोजगारी, शेतकरी आणि कामगारांच्या प्रश्नांच्या लढाई ही सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

ज्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरून राज्यात जे राजकारण चालू आहे. जी व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले गेले आहे.

ते वक्तव्य त्या पदाला न शोभणारं आहे अशी टीकाही त्यांनी राज्यपालांच्या वक्तव्यावर केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी भाजपवरही निशाणा साधला.

Follow Us
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी.
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले.
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने.
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण..
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण...
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती....
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती.....
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी.
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा.
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं.
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर.
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त...
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त....