AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निजामाच्या अत्याचाराचं काँग्रेस समर्थन करत आहेत का?; सावंतांच्या ट्विटवर नेटकऱ्यांचा सवाल

उस्मानाबादचे धाराशिव नामांतर करण्यास काँग्रेसने विरोध केला आहे. (congress praises nizam, people trolling)

निजामाच्या अत्याचाराचं काँग्रेस समर्थन करत आहेत का?; सावंतांच्या ट्विटवर नेटकऱ्यांचा सवाल
सचिन सावंत, काँग्रेस प्रवक्ते
| Updated on: Jan 15, 2021 | 6:37 PM
Share

मुंबई: उस्मानाबादचे धाराशिव नामांतर करण्यास काँग्रेसने विरोध केला आहे. मात्र, हा विरोध करताना काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी निजामांचा उदोउदो केला आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी काँग्रेसवर टीकेची झोड उठवली आहे. काँग्रेस निजामांच्या अत्याचाराचं समर्थन करत आहे का? असा सवाल नेटकऱ्यांनी केला आहे. तसेच सावंतच्या या ट्विटरून मराठवाड्यातील लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. (congress praises nizam, people trolling)

मुख्यमंत्र्यांचं ट्विट अन्….

मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून आधी औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा केला होता. त्यावर काँग्रेसने आक्षेप घेतला होता. या मुद्द्यावरून शिवेसनेनेही काँग्रेसवर निशाणा साधला होता. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगजेब धर्मनिरपेक्ष नव्हता अशा शब्दात काँग्रेसला सुनावले होते. हा वाद थांबत नाही तोच दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी उस्मानाबादचा उल्लेख धाराशिव केला आहे. त्याला उत्तर देताना काँग्रेस नेते सचिन सावंत यांचीच कोंडी झाली आहे.

सावंतांनी काय म्हटलं

सावंतांनी ट्विट करून उस्माबादच्या नामांतरावर पक्षाची भूमिका मांडली आहे. ‘उस्मानाबाद हे‌ नाव ७ वे निजाम नवाब मीर उस्मान अली खान बहादुर यांच्या नावावरून पडले. या निजामांनी आपली १४००० एकर जमीन आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीला दान केली. जी सामान्य गोरगरीबांच्या नावे करण्यात आली. तसेच १९६५ च्या भारत पाकिस्तान युद्धासाठी नॅशनल डिफेन्स फंडासाठी ५ टन सोने (ज्याची आजची किंमत ₹१६०० कोटी आहे) दान केले. हे जगाच्या इतिहासातील आजवरचे सर्वात मोठे दान आहे. अनेक इस्पितळे, विद्यापीठ, धरणे, रस्ते त्यांच्या दानातून उभे राहिले. शिवाजी विद्यापीठालाही त्यांची मदत झाली. इतिहास व ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व काळा पांढरा रंगात नसतात. परंतु, ध्रुवीकरणाचे राजकारण समाजावर दूरगामी दुष्परिणाम करत असते एवढं मात्र नक्की!,’ असं ट्विट सावंत यांनी केलं आहे.

इतिहास काय सांगतो

उस्मानाबादचे मूळ नाव धाराशिवच होते. उस्मानाबादचे धाराशिव हे सांस्कृतिक नाव आहे. त्यामुळे निजामांचं कौतुक करणं काँग्रेसला अडचणीचं ठरू शकतं. औरंगाबादचं संभाजीनगर करणं आणि उस्मानाबादचं धाराशिव करणं हे दोन वेगळे मुद्दे आहेत, असं जाणकारांनी सांगितलं. एदलाबादचे मुक्ताईनगर करण्यात आले. अंबेजोगाईचे मोमिनाबाद आणि पुन्हा अंबेजोगाई करण्यात आलं. कुलाबा, मुक्ताई नगर आणि अंबेजोगाई ही नावे काँग्रेसनेच बदलली. याकडेही जाणकारांनी लक्ष वेधलं आहे.

नेटकरी काय म्हणतात?

एका नेटकऱ्यांनी चुकीची माहिती पसरवू नका, असं आवाहन केलं आहे. तर निजामांनी जमीन आणि पैसा कुठून आणला? अफगाणिस्तानातून की सौदीतून? असा सवाल दुसऱ्या नेटकऱ्याने केला आहे. तुम्हाला मराठवाडा मुक्तीसंग्रमाचा लढा माहीत आहे का? निजामाने हिंदूंवर केलेले अत्याचार माहीत आहेत का?, असा सवाल काही नेटकऱ्यांनी केला आहे. एकाने तर धाराशिवचे उस्मानाबाद हे नाव कुणी व का बदलले? असा सवाल केला आहे. एका नेटकऱ्याने सावंतांचा दावा फेटाळून लावला आहे. निजामाकडे 5 हजार किलो नाही तर 425 किलो सोनं होतं. हे सर्व सोनं लुटलेलं होतं. शिवाय निजामाने हे सोनं दान केलं नव्हतं तर 6.5 टक्के व्याजाने दिलं होतं, असा दावा केला आहे.

एखाद्याने जमीन दिली म्हणून गौरव करायचा का?

उस्मानाबादच्या नामांतरावरून सुरू असलेल्या वादावर मराठावाड्यातील विचारवंत प्रा. डॉ. जी. के. डोंगरगावकर यांनी संताप व्यक्त केला आहे. हे सर्व विषय कालबाह्य आहेत. या भूतकालीन घटना बाहेर काढणं म्हणजे मराठवाड्यातील समाजिक सलोखा बिघडवण्यास आवतन देण्यासारखं आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम ज्यांच्या हाती आहे, त्यांनी हे मुद्दे उकरून काढणं योग्य नाही, असं सांगतानाच केवळ जमीन दिली म्हणून एखाद्याचा गौरव करायचा का?, निजाम जुलमी होता म्हणूनच मराठवाड्यातील लोक लढले ना? असा सवाल डॉ. जी. के. डोंगरगावकर यांनी केला आहे. (congress praises nizam, people trolling)

मग पोलीस अॅक्शन चुकीची होती का?

निजमाच्या अत्याचाराविरोधात मराठवाड्यातील जनता रस्त्यावर उतरली होती. स्वामी रामानंदतिर्थ यांच्या नेतृत्वात हा लढा उभारला. निजाम अन्यायी असल्यानेच लोक रस्त्यावर उतरले, असं सांगतानाच निजाम चांगला होता तर त्यावेळी पोलिसांनी घेतलेली अॅक्शन चुकीची होती का?, असा सवालही डोंगरगावकर यांनी केला. मराठवाड्यातील विद्यापीठं, गाव, शहरांची नावं बदलण्याचा मुद्दा पुढे रेटून मराठवाड्यातील समाजिक सलोखा बिघडवू नये, मराठवाड्यात अशा मुद्दयांनी दंगे भडकवू नये, असं सांगतानाच अहमदनगरच्या नामांतराचा मुद्दा का छेडला जात नाही? असा सवालही त्यांनी केला. (congress praises nizam, people trolling)

संबंधित बातम्या:

एकनाथ खडसेंची साडे सहातास चौकशी; तपासानंतर दिली ‘ही’ प्रतिक्रिया

अमोल मिटकरींना कोरोना लसीवर शंका, मोदींनी मीडियासमोर कोरोना लस घ्यावी, मिटकरींचे आवाहन

धनंजय मुंडे राजीनामा द्या, भाजप महिला मोर्चाचं सोमवारपासून राज्यव्यापी आंदोलन

(congress praises nizam, people trolling)

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!.

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ.

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण….

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण…

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं.

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं