AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बोरिवलीतील पुलाचा खर्च 300 टक्क्यांनी वाढला, स्थायी समितीनं प्रस्ताव फेटाळला

161 कोटी रुपयांचा खर्च तब्बल 651 कोटी रुपयांपर्यंत पोहचलाय. या वाढीव खर्चाला मंजूरी मिळण्याचा प्रस्ताव आज स्थायी समितीच्या पटलावर मांडण्यात आला होता.

बोरिवलीतील पुलाचा खर्च 300 टक्क्यांनी वाढला, स्थायी समितीनं प्रस्ताव फेटाळला
| Edited By: sagar joshi | Updated on: Jun 16, 2021 | 11:43 PM
Share

बोरिवली : स्वामी विवेकानंद मार्गावरील उड्डाण पुलाचा बांधकामाचा खर्च तब्बल 300 टक्क्यांनी वाढला आहे. 161 कोटी रुपयांचा खर्च तब्बल 651 कोटी रुपयांपर्यंत पोहचलाय. या वाढीव खर्चाला मंजूरी मिळण्याचा प्रस्ताव आज स्थायी समितीच्या पटलावर मांडण्यात आला होता. मात्र, स्थायी समितीने नव्याने निवीदा काढून हे काम करुन घेण्याचे निर्देश देत हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. (Construction cost of the flyover in Borivali has gone up by 300 percent)

बोरीवली कोराकेंद्र येथे आर.एम.भट्टड व स्वामी विवेकानंद मार्ग या जंक्शनवरील कल्पना चावला चौकात उड्डाण पुलाचे बांधकाम करण्यासाठी महानगर पालिकेने 2018 मध्ये मंजूरी दिली होती. नोव्हेंबर 2018 पासून हे काम सुरु करण्यात आलं. मात्र, त्यानंतर या पुलाच्या बांधणीत आणि लांबी वाढविण्याचा निर्णय महानगर पालिकेने घेतला. त्यासाठी निवीदा न मागवता त्याच कंत्राटदाराला काम देण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला. त्यामुळे हा खर्च 161 कोटी रुपयां वरुन 651 कोटी रुपयांवर जाणार होता. या वाढीव खर्चाला मंजूरी देण्याचा प्रस्ताव आज स्थायी समिती पुढे मांडण्यात आला होता.

पुलाचे बांधकाम सुरु असलेल्या भागात मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होत होती. त्यामुळे हा पूल बांधण्यात येणार होता. मात्र, 2 वर्षांत पालिका फक्त कागदी कार्यवाही करत बसली. आता स्थायी समितीने हा प्रस्ताव नाकारल्याने नव्याने निवीदा मागवाव्या लागणार आहेत. त्यात किमान चार ते पाच महिन्यांचा कालावधी खर्च होणार आहे. त्यामुळे पुलांच्या बांधकामाचा कालावधीही वाढणार आहे.

संबंधित बातम्या :

देशात आजपासून 256 जिल्ह्यात सोन्याचे हॉलमार्किंग अनिवार्य, महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यांचा समावेश? यादी एका क्लिकवर

नियम न पाळणे, गर्दी वाढल्यास तिसऱ्या लाटेला लवकर आमंत्रण : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Construction cost of the flyover in Borivali has gone up by 300 percent

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली