AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोकल सुरू, पण बस स्टॉपवरील गर्दी कायम; वाचा कारण काय?

राज्य सरकारने मुंबईची लोकल सेवा 15 ऑगस्टपासून सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू केली आहे. मात्र, तरीही लोकलपेक्षा बसलाच अधिक गर्दी होताना दिसत आहे. (Coronavirus: mumbai local start but rush on bus stop)

लोकल सुरू, पण बस स्टॉपवरील गर्दी कायम; वाचा कारण काय?
mumbai bus
| Edited By: | Updated on: Aug 17, 2021 | 10:23 AM
Share

मुंबई: राज्य सरकारने मुंबईची लोकल सेवा 15 ऑगस्टपासून सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू केली आहे. मात्र, तरीही लोकलपेक्षा बसलाच अधिक गर्दी होताना दिसत आहे. अनेक बस स्टॉपवर चाकरमान्यांची प्रचंड गर्दी कायम असल्याचं चित्रं आहे. केवळ दोन डोस घेतलेल्यांनाच लोकलमधून प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. शिवाय पासची प्रक्रिया किचकट आहे. त्यामुळे बस स्टॉपवर गर्दी होत असल्याचं सांगितलं जात आहे. (Coronavirus: mumbai local start but rush on bus stop)

कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या सर्वसामान्य नागरिकांना 15 ऑगस्टपासून लोकल प्रवासाची मुभा राज्यसरकारने दिलेली आहे. परंतु, तरी देखील लोकलमध्ये प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात दिसून येत नाही. कारण मुंबईमध्ये लसीकरणाचे दोन डोस पूर्ण केलेल्या लोकांच्या संख्येपेक्षा एक डोस घेतलेल्या लोकांची संख्या ही जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना लोकल प्रवास करता येत नाही. म्हणून हे सर्व सामान्य प्रवासी आजही बसने प्रवास करत आहेत. त्याचमुळे मुंबईमधील ठिकाणी बस स्टॉपवर लोकांची मोठी रांग दिसून येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. यासंदर्भात सामान्य मुंबईकरांनी प्रशासनाच्या विरोधात आपला रोष सुद्धा व्यक्त केलेला आहे.

प्रवाशांचा आक्रोश

मुंबईतल्या शासकीय रुग्णालयामध्ये लस उपलब्ध होत नसल्यामुळे मुंबईकरांचं लसीकरण मोठ्या प्रमाणात होत नाही. परंतु, खासगी रुग्णालयांमध्ये मात्र तीच लस कशी काय मिळते? असा सवाल देखील सामान्य नागरिकांनी उपस्थित केलेला आहे. त्यात सोबत कोव्हॅक्सीन लसीच्या दोन डोसच्या मधला जो वेळ आहे तो एक महिन्याचा आहे आणि कोव्हीशिल्ड मधील कालावधी हा 84 दिवसाचा का? या कारणामुळे देखील आमचं लसीकरण लवकर होत नाही. त्याचमुळे लोकलसेवे करता आम्ही मुकत आहोत. या सर्व संदर्भात प्रशासनाने योग्य असा निर्णय घ्यावा अशी आमची प्रशासनाला विनंती आहे, असं प्रवाशांचं म्हणणं आहे.

बोरिवली स्थानकात गर्दी नाही

दरम्यान, लसीचे दोन डोस घेतल्यानंतर 14 दिवसांनी नागरिकांसाठी 15 ऑगस्टपासून मुंबई लोकल सेवा सुरू करण्यात आली आहे. पण आज बोरिवली रेल्वे स्थानकावर गर्दी दिसत नाही. पूर्वीप्रमाणेच स्टेशनवर सामान्य गर्दी दिसून आली. रेल्वे प्लॅटफॉर्मपासून तिकीट खिडकीपर्यंत पूर्वीप्रमाणेच लोक दिसत होते. (Coronavirus: mumbai local start but rush on bus stop)

संबंधित बातम्या:

मुंबईकरांना लोकल प्रवासाची मुभा, पण ट्रेनला पहिल्यासारखी गर्दी नाही, कारण…

कोरोना लसीकरणात महाराष्ट्राची घोडदौड सुरुच, आतापर्यंत 5 कोटी डोस दिले

18 वर्षाखालील मुला-मुलींना मॉलमध्ये प्रवेशासाठी आधार-पॅनकार्ड, शाळा-महाविद्यालयाचे ओळखपत्र आवश्यक

(Coronavirus: mumbai local start but rush on bus stop)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.