आंतरधर्मीय लग्न केल्याने नवदाम्पत्यावर मुंबई सोडण्याची वेळ

सुधाकर काश्यप , टीव्ही 9 मराठी, मुंबई : अँटोप हिल येथे राहणाऱ्या नवदाम्पत्याने आंतरधर्मीय लग्न केल्याने त्यांच्यावर मुंबई सोडून जण्याची वेळ आली आहे. मुलीच्या घरचे सतत हल्ले करत असल्याने अखेर या नवदाम्पत्याने अखेर अॅड. आनंद जोंधळे यांच्यामार्फत मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली. त्याची दखल घेऊन हायकोर्टाने या नवदाम्पत्याला पोलीस संरक्षण देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र […]

आंतरधर्मीय लग्न केल्याने नवदाम्पत्यावर मुंबई सोडण्याची वेळ
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 5:02 PM

सुधाकर काश्यप , टीव्ही 9 मराठी, मुंबई : अँटोप हिल येथे राहणाऱ्या नवदाम्पत्याने आंतरधर्मीय लग्न केल्याने त्यांच्यावर मुंबई सोडून जण्याची वेळ आली आहे. मुलीच्या घरचे सतत हल्ले करत असल्याने अखेर या नवदाम्पत्याने अखेर अॅड. आनंद जोंधळे यांच्यामार्फत मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली. त्याची दखल घेऊन हायकोर्टाने या नवदाम्पत्याला पोलीस संरक्षण देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र त्यानंतरही त्यांना संरक्षण दिले गेले नाही.

विजय आणि नुसरत हे अँटोप हिल येथील एका वस्तीत शेजारी शेजारी राहायचे. अगदी लहानपणापासून एकमेकांना ओळखतात. लहानपणापासून त्यांची मैत्री होती. वयात आल्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले. नुसरतसाठी विजय आणि विजयसाठी नुसरत असं त्यांचं जग झालं. याची कुणकुण लागताच नुसरतच्या घरच्यांनी तिला गावी पाठवलं. मात्र काही दिवसातच नुसरत पुन्हा मुंबईत परतली.

नुसरत ज्या वस्तीत राहते, त्या वस्तीत तिच्या नातेवाईकांची 100 घरं आहेत, तर विजयच्या नातेवाईकांची केवळ तीन-चार घरं आहेत. त्यामुळे विजय आणि नुसरतच्या संबंधाची कुणकुण लागताच नुसरतचे शेकडो नातेवाईक विजयच्या घरावर चाल करुन यायचे. दोघे पळून गेल्यावर तर विजयच्या कुटुंबीयांवर आभाळ कोसळलं होतं. सतत हल्ले होऊ लागले.

त्यानंतर विजय आणि नुसरत यांनी पळून जाऊन लग्न केलं. काही महिने ते गायब झाले. कुणाच्याच संपर्कात नव्हते. इकडे मात्र विजय आणि त्याच्या नातेवाईकांना सतत त्रास होत होता. पोलिसात तक्रारी केल्या, पण काही कारवाई झाली नाही. यामुळे अखेर नुसरतने अॅड. आनंद जोंधळे यांच्यामार्फत मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली. कोर्टानेही त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन पोलीस आयुक्तांना संरक्षण देण्याचे आदेश दिलेत.

एकंदरीत दहशतीत वावरणाऱ्या विजय आणि नुसरत या दाम्पत्यावर मुंबई सोडून जाण्याची वेळ आली आहे. आता तरी पोलिस या प्रकरणाकडे गांभिर्याने पाहतील का, हा प्रश्न आहेच.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी या जागा लढवणार, अजित दांदानी थेट म्हटलं..
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी या जागा लढवणार, अजित दांदानी थेट म्हटलं...
छगन भुजबळ यांच्या जीवाला धोका? सलग आले १२ धमकीचे मॅसेज अन्...
छगन भुजबळ यांच्या जीवाला धोका? सलग आले १२ धमकीचे मॅसेज अन्....
मुख्यमंत्र्यांसंबंधित प्रकरणात दत्ता दळवींना जामीन, का झाली होती अटक?
मुख्यमंत्र्यांसंबंधित प्रकरणात दत्ता दळवींना जामीन, का झाली होती अटक?.
मोदी Vs गांधींची लढाई, ५ राज्यांच्या निकालाआधीचा Exit Poll काय सांगतो
मोदी Vs गांधींची लढाई, ५ राज्यांच्या निकालाआधीचा Exit Poll काय सांगतो.
छगन भुजबळ यांचा थेट शरद पवार यांनाच सवाल; थेट म्हणाले...
छगन भुजबळ यांचा थेट शरद पवार यांनाच सवाल; थेट म्हणाले....
असला बुके कधी पाहिलाय? अजितदादांना १,३६९ गुलाबांच्या फुलांचा गुच्छ खास
असला बुके कधी पाहिलाय? अजितदादांना १,३६९ गुलाबांच्या फुलांचा गुच्छ खास.
२०२४ ला भाजपपासून भारताला मुक्ती मिळणार, संजय राऊत यांची जहरी टीका काय
२०२४ ला भाजपपासून भारताला मुक्ती मिळणार, संजय राऊत यांची जहरी टीका काय.
जरांगेंच्या दौऱ्याचा चौथा टप्पा, सभेची जय्यत तयारी, अवघं जालना भगवंमय
जरांगेंच्या दौऱ्याचा चौथा टप्पा, सभेची जय्यत तयारी, अवघं जालना भगवंमय.
गुणरत्न सदावर्तेंना सर्वात मोठा झटका, ST कर्मचारी बँकेतील 17 संचालक...
गुणरत्न सदावर्तेंना सर्वात मोठा झटका, ST कर्मचारी बँकेतील 17 संचालक....
५ राज्यांचा एक्झिट पोल, कुठं कुणाची सत्ता येणार? बघा tv9 मराठीवर
५ राज्यांचा एक्झिट पोल, कुठं कुणाची सत्ता येणार? बघा tv9 मराठीवर.