AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी : रेल्वेनं ठराविक स्टेशनवर प्लॅटफॉर्म तिकीट 5 पटीनं वाढवलं! आता मोजावे लागणार 50 रुपये

MMR रिजनमधील प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट तब्बल 5 पट वाढवलं आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता उन्हाळ्यात गर्दी रोखण्यासाठी मध्य रेल्वेनं हे पाऊल उचललं आहे.

मोठी बातमी : रेल्वेनं ठराविक स्टेशनवर प्लॅटफॉर्म तिकीट 5 पटीनं वाढवलं! आता मोजावे लागणार 50 रुपये
Railway Platform
| Updated on: Mar 02, 2021 | 3:02 PM
Share

मुंबई : मध्य रेल्वेनं प्लॅटफॉर्मवर होणारी गर्दी टाळण्यासाठी आता मुंबई मेट्रोपोलिटन रिजन म्हणजे MMR रिजनमधील प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट तब्बल 5 पट वाढवलं आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता उन्हाळ्यात गर्दी रोखण्यासाठी मध्य रेल्वेनं हे पाऊल उचललं आहे. मध्य रेल्वेनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पनवेल आणि भिवंडी रोड स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट आता 10 रुपयांवरुन 50 रुपये केली आहे.(Decision to increase platform ticket to Rs. 50 to avoid congestion at stations)

यापूर्वी मार्च 2020 मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारतीय रेल्वेनं प्लॅटफॉर्म तिकीट वाढवण्याचा निर्णय घेतला होता. मध्य रेल्वेनं मुंबई, पुणे, भुसावळ, आणि सोलापूर डिव्हिजनमध्ये प्लॅटफॉर्म तिकीत 10 रुपयांवरुन 50 रुपये केलं होतं.

नवे दर 15 जूनपर्यंत लागू राहतील

मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिलेल्या माहितीनुसार, उन्हाळ्यात रेल्वे स्थानकांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीटाचे दर 50 रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेचा हा निर्णय गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी घेण्यात आला आहे. रेल्वेने निश्चित केलेले नवे दर 24 फेब्रुवारीपासून लागू करण्यात आले आहेत. हे दर 15 जूनपर्यंत लागू असणार आहेत. उन्हाळ्यात अनेक लोक सुट्ट्यांसाठी जात असतात. तसंच यात्रांसाठी जाणाऱ्या प्रवाशांमुळे रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होते. ही गर्दी टाळण्यासाठी रेल्वेकडून प्लॅटफॉर्म तिकीटाचे दर वाढवण्यात आले आहेत.

राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव

गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना पाहायला मिळत आहे. कोरोनाची रुग्णसंख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशावेळी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारनं काही कठोर पावलं उचलली आहे. त्याचबरोबर स्थानिक जिल्हा प्रशासनही याबाबत वेळोवेळी निर्णय घेत आहे. लग्न समारंभ, सार्वजनिक कार्यक्रम, सभा, बैठका अशा गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांवर निर्बंध लादण्यात आले आहेत. लोकांच्या गर्दीमधूनच अनेक कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार विविध नियमावली जारी करत आहे.

संबंधित बातम्या :

Platform Ticket | रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट 10 वरुन 50 रुपये, गर्दी टाळण्यासाठी मोठा निर्णय

Covid19 vaccination in Maharashtra : ठाण्यात ‘या’ 15 ठिकाणी मिळणार कोरोना लस, हॉस्पिटल्सची यादी एका क्लिकवर

Decision to increase platform ticket to Rs. 50 to avoid congestion at stations

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.