AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोनोरेल सेवा तात्पुरती बंद करण्याचा निर्णय, सततच्या अपघातांमुळे घेतला निर्णय

मुंबई मोनोरेलला अलिकडे वारंवार तांत्रिक बिघाडाचा सामना करावा लागत आहे. सोमवारी ( १५ सप्टेंबर ) सकाळी वडाळा येथील एण्टॉप हिल आणि जीटीबीएन मोनोरेल स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाडामुळे मोनोरेल मध्येच अडकली होती. त्यानंतर त्यातील १७ प्रवाशांना रेस्क्यू ऑपरेशन राबवून सुखरुपणे बाहेर काढण्यात आले.

मोनोरेल सेवा तात्पुरती बंद करण्याचा निर्णय, सततच्या अपघातांमुळे घेतला निर्णय
mumbai monorail
| Updated on: Sep 16, 2025 | 7:37 PM
Share

मोनोरेलवर सातत्याने होत असलेल्या अपघातांमुळे मोनोरेल सेवा तात्पुरती बंद करण्याचा निर्णय एमएमआरडीने घेतला आहे. चेंबूर ते सात रस्ता अशी मोनोरेल सध्या चालवण्यात येत होती. या संपूर्ण भारतातील एकमेव असलेल्या मोनोरेलवर नादुरुस्त गाड्यांमुळे अलिकडे वारंवार अपघात होत आहेत. त्यामुळे अपग्रेडेशन साठी ही सेवा आता २० सप्टेंबर २०२५ पासून काही काळ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मोनोरेल अनेकवेळा अपघात झाले आहेत. अलिकडे १९ ऑगस्ट रोजी मोठा पाऊस पडल्याने सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास म्हैसूर कॉलनीजवळ मोनोरेल अडकली होती. यात ५८२ हून अधिक प्रवासी दोन ते तीन तास अडकले होते.अग्निशमन दलाने अखेर या प्रवाशांची सुटका केली. याच वेळी आचार्य अत्रे नगर स्थानकात आणखी एक मोनोरेल अडकली होती. त्यातून २०० प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. मोनोरेल भारताची एकमेव मोनोरेल प्रणाली असून १९.७४ किमी मार्गावर संत गाडगे महाराज चौक ते चेंबूरपर्यंत ती चालवण्यात येते.

अपग्रेडेशनसाठी बंद

मोनोरेल बंद केल्यानंतर या ब्लॉक काळात तिचे भविष्यातील संचलन योग्य प्रकारे होण्यासाठी अनेक तांत्रिक काम केली जाणार आहेत. या मार्गावर नव्या गाड्यांचे परिचलन योग्य प्रकारे होण्यासाठी CBTC सिग्नलिंग प्रणाली अपग्रेड करण्यात येणार आहे. सध्या गाड्यांची डागडुजी केली जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांची सुरक्षित आणि निर्धोकपणे वाहतू केली जाईल.

महत्वाचे बदल असे होणार –

हैदराबाद येथे विकसित केलेली कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल सिस्टीम (CBTC) या मोनोरेल मार्गावर प्रथमच बसवण्यात येणार आहे.

३२ जागांवर ५ इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग बसवण्यात आले असून त्यांची सध्या चाचणी सुरु आहे.

२६० वायफाय एक्सेस पाईंट, ५०० RFID Tags, ९० ट्रेन डिटेक्शन सिस्टीम आणि मल्टीपल WATC यापूर्वीच बसवले आहेत. वेसाईड सिग्नलिंगची कामे पूर्ण झाली असून एकात्मिक तपासणी सुरु आहे.

१० नवीन गाड्या येणार

एमएमआरडीने मेक इन इंडिया मोहिमे अंतर्गत मेधा कंपनीने SMH Rail च्या सहकार्याने तयार केलेल्या १० नव्या गाड्या खरेदी केल्या आहेत.

– त्यापैकी ८ गाड्या आल्या आहेत

– ९ वी गाडीचे इन्सपेक्शन होत आहे

– १० वी गाडीची निर्मिती अंतिम टप्प्यात आहे

Follow Us
पहिला वार करायचा असेल तर माझ्यावर करा', लांडगेंना सुळेंचं थेट आव्हान
Supriya Sule on Mahesh Landge :पहिला वार करायचा असेल तर माझ्यावर करा', लांडगेंना सुळेंचं थेट आव्हान
CM फडणवीसांचा जेन-झींशी संवाद, क्रिकेटपटू तिलक वर्मासह 10 हजार...
Devendra Fadnavis : CM फडणवीसांचा जेन-झींशी संवाद, क्रिकेटपटू तिलक वर्मासह 10 हजारांहून अधिक तरुणांची उपस्थिती
भाजप आमदार संजय उपाध्याय यांची मोठी घोषणा! गणेशोत्सवासाठी कोकण...
भाजप आमदार संजय उपाध्याय यांची मोठी घोषणा! यंदाही गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना मोफत बससेवा
राष्ट्रवादीचा अखेरचा पत्ता उलगडणार? कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक
राष्ट्रावादी अखेरचा पत्ता उलगडणार? एकाच आठवड्यात सलग बैठका, विलिनिकरणाबाबत....
आयकर विभागाची मोठी कारवाई! 16 नामांकित कंपन्यावर गुन्हा दाखल
आयकर विभागाची मोठी कारवाई! तब्बल 2143 कोटी... 16 नामांकित कंपन्यावर गुन्हा दाखल
तुकाराम मुंढेंच्या भीतीने जुनी परंपरा मोडली! पुण्यातील सुप्रिसिद्ध...
तुकाराम मुंढेंच्या भीतीने जुनी परंपरा मोडली! बऱ्याच काळापासूनची पुण्यातील प्रसिद्ध खाऊगल्ली बंद?
'सातारा जिल्हा बँकेची निवडणूक भाजप स्वबळावर लढणार' गोरेंचं विधान
सातारा जिल्हा बँकेची निवडणूक भाजप स्वबळावर लढणार- जयकुमार गोरे
उत्पादन घट आणि वाहतूक खर्च वाढल्याने सुकामेवा महागला...
उत्पादन घट आणि वाहतूक खर्च वाढल्याने सुकामेवा महागला; बदाम, पिस्त्याच्या दरात ३०० रुपयांपर्यंत वाढ
भोरमध्ये पुणे ट्रान्समिशन थ्री प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांचा रास्ता रोको
भोरमध्ये पुणे ट्रान्समिशन थ्री प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांचा रास्ता रोको
मनोज जरांगे पाटील यांची जालन्यात 130 गावांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची जालन्यात 130 गावांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा