AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल भाजप पदाधिकाऱ्याच्या वक्तव्यानंतर वाद पेटला, ‘माफी मागा, अन्यथा…’ शिवसेनेचा इशारा

ulhasnagar shiv sena and bjp: उल्हासनगरचे भाजपा जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याने शिवसेना आक्रमक झाली आहे. ज्यांना गद्दार बोलतात ते मुख्यमंत्री होतात, असे वक्तव्य जिल्हाध्यक्ष रामचंदानी यांनी केले होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल भाजप पदाधिकाऱ्याच्या वक्तव्यानंतर वाद पेटला, 'माफी मागा, अन्यथा...' शिवसेनेचा इशारा
Eknath Shinde
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Nov 03, 2024 | 11:31 AM
Share

maharashtra assembly election 2024: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा टप्पा महत्वाचा वळणावर आला आहे. ४ नोव्हेंबर रोजी जागा अर्ज मागे घेता येणार आहे. त्यानंतर प्रचाराची रणधुमाळी सुरु होणार आहे. परंतु त्यापूर्वीच महायुतीमधील वाद समोर आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासंदर्भात भाजप पदाधिकाऱ्याने वक्तव्य केले आहे. त्यानंतर शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेनेने “माफी मागा, अन्यथा भाजपचं काम करणार नाही!”, असा सरळ इशारा दिला आहे. उल्हासनगर भाजपा जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद पेटला आहे.

नेमका वाद कशामुळे

प्रदीप रामचंदीनी यांनी उल्हासनगरमधील भाषणात म्हटले होते की, ज्यांना गद्दार म्हटले जाते ते मुख्यमंत्री बनतात. आता राजकारणाची व्याख्या बदलली आहे. ज्यांनी विश्वासघात केला ते आमच्या पक्षात आले आहेत, असे आम्ही अभिमानानेच म्हणू.

भाजप जिल्हाध्यक्षांच्या वक्तव्यानंतर शिवसेना आक्रमक

उल्हासनगरचे भाजपा जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याने शिवसेना आक्रमक झाली आहे. ज्यांना गद्दार बोलतात ते मुख्यमंत्री होतात, असे वक्तव्य जिल्हाध्यक्ष रामचंदानी यांनी उल्हासनगरच्या एका कार्यक्रमात केले होते. या वक्तव्यानंतर उल्हासनगरमधील शिवसैनिक आक्रमक झाली आहेत. जोपर्यंत जिल्हाध्यक्ष रामचंदानी हे माफी मागणार नाहीत, तोपर्यंत शिवसेनेचा एकही कार्यकर्ता भाजप आमदार आणि उमेदवार कुमार आयलानी यांचे काम करणार नाही, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. शिवसेनेच्या या भूमिकेमुळे आमदार कुमार आयलानी अडचणीत येण्याची शक्यता आहे.

माहीम मतदार संघातही वाद

राज्यातील महायुतीमधील जागा वाटपाचा घोळ शेवटपर्यंत सुरु होता. काही मतदार संघातील वाद मिटत नव्हता. मुंबईतील माहीम मतदार संघाचा वाद सुरु आहे. या मतदार संघात शिवसेनेने माघार घ्यावी, अशी अपेक्षा भाजपची आहे. या ठिकाणी मनसे नेते राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणूक मैदानात आहे. त्यांना पाठिंबा देण्याची मागणी भाजप करत आहे. परंतु शिवसेनेचा त्याला विरोध आहे. त्यानंतर आता उल्हासनगरमध्येही वाद सुरु झाला आहे.

Follow Us
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची..
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक...
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक यांनी सांगितला भाजपचा खास प्लॅन
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्त
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्तिवाद काय? वाचा महत्त्वाचे मुद्दे
आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
Shivsena Hearing : आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं..
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं काय घडतंय?
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो...
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो’ अभियानाची तुफान चर्चा