AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“माणसांना रोबॉट नाही बनवायचंय, मोठी स्वप्न पाहा”; मोदींचं तरुण क्रिएटर्ससाठी काय आवाहन?

"तरुणांच्या काम करण्याच्या स्टाइलमध्ये कोणतेच अडथळे किंवा मर्यादा नसते. तुमची क्रिएटिव्हीटी फ्रि असते. भारताकडे जगातील सर्वात मोठी तरुण लोकसंख्या आहे", असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तरुणांना खास आवाहन केलं आहे.

माणसांना रोबॉट नाही बनवायचंय, मोठी स्वप्न पाहा; मोदींचं तरुण क्रिएटर्ससाठी काय आवाहन?
Narendra ModiImage Credit source: Instagram
| Updated on: May 01, 2025 | 1:35 PM
Share

भारताच्या पहिल्या ‘जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन’ (वेव्हज) शिखर परिषदेचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झालं. मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये या परिषदेचं आयोजन करण्यात आलं असून त्यात बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित होते. या परिषदेत बोलताना नरेंद्र मोदी यांनी तरुण क्रिएटर्सना खास आवाहन केलं. “आपल्याला माणसांना रोबॉट नाही बनवायचंय. आपल्याला माणसाला अधिकाधिक संवेदनशील आणि समृद्ध करायचं आहे”, असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी ‘क्रिएटिव्ह रिस्पॉन्सिबिलीटी’वर अधिक भर दिला. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात तंत्रज्ञानाची भूमिका वाढत असतानाच मानवी संवेदना कायम ठेवण्यासाठी अधिक प्रयत्नांची गरज असल्याचं त्यांनी नमूद केलं.

न्यूज 9 ने WAVES Edition ग्लोबल समिटचं आयोजन केलं आहे. जिओ कनव्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित या शिखर परिषदेत ते बोलत होते. “क्रिएटिव्हिटीच्या जगातील दिग्गजांसमोर मी आणखी एक विषय मांडतो. तो विषय आहे, क्रिएटिव्ह रिस्पॉन्सिबिलीटीचा. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात टेक्नॉलॉजीची भूमिका वाढत आहे. अशावेळी मानवी संवेदना कायम ठेवण्यासाठी एक्स्ट्रा एफर्टची (अधिक प्रयत्न) गरज आहे. ते क्रिएटिव्ह वर्ल्डच करेल. आपल्याला मनुष्याला रोबॉट नाही बनवायचंय. आपल्याला माणसाला अधिकाधिक संवेदनशील आणि समृद्ध करायचं आहे,” असं यावेळी मोदी म्हणाले.

कलेवर अधिक भर देण्याविषयी त्यांनी पुढे सांगितलं, “व्यक्तीची समृद्धी ही माहिती जगताच्या पर्वतातून येणार नाही, टेक्नॉलॉजीतून येणार नाही. त्यासाठी आपल्याला गीत, संगीत, कला, नृत्याला महत्त्व द्यावं लागेल. या गोष्टींनी हजारो वर्षांपासून मानवीय संवेदनाला जागृत ठेवलं आहे. आपल्याला ते अजून मजबूत करायचं आहे. आज आपल्या तरुण विचाराला मानवताविरोधी विचारांपासून वाचवलं पाहिजे. वेव्हज हे काम करू शकतं. या जबाबदारीपासून मागे हटलो तर युवा पिढीसाठी ते घातक ठरेल. ग्लोबल कोऑर्डिनेशनही (जागतिक समन्वय) आता तेवढंच महत्त्वाचं आहे. हा मंच आपल्या क्रिएटर्सना ग्लोबल स्टोरी टेलर्सशी कनेक्ट करेल. आपल्या एनिमेटर्सना ग्लोबल व्हिजनरीशी जोडेल. ग्लोबल चॅम्पियन बनवेल.”

“तुम्हाला एक असं प्लॅटफॉर्म देऊ, जिथे क्रिएटिव्ह आणि कोडिंग एकत्र होईल, सॉफ्टवेअर आणि स्टोरी टेलिंग एकत्र असेल. तुम्ही या प्लॅटफॉर्मचा वापर करा. मोठी स्वप्न पाहा. ते पूर्ण करण्यासाठी संपूर्ण ताकद लावा,” असं आवाहन मोदींनी केलंय. या परिषदेत नरेंद्र मोदींनी सर्व ग्लोबल इन्व्हेस्टर, ग्लोबल क्रिएटर्स यांना आमंत्रित केलं. “तुम्ही भारताला तुमचं कंटेंट प्लेग्राआऊंड बनवा,” असंही आवाहन त्यांनी केलंय. त्याचप्रमाणे पहिल्या वेव्हज समिटसाठी त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.