AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘तेव्हा महिलांवरचं प्रेम का उतू गेलं नाही?’, संजय गायकवाड यांचा उद्धव ठाकरे यांना खोचक सवाल

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यात पहिली महिला मुख्यमंत्री निवडून आणण्याचे संकेत दिल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलंय.

'तेव्हा महिलांवरचं प्रेम का उतू गेलं नाही?', संजय गायकवाड यांचा उद्धव ठाकरे यांना खोचक सवाल
| Edited By: | Updated on: Dec 01, 2022 | 8:34 PM
Share

बुलढाणा : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यात पहिली महिला मुख्यमंत्री निवडून आणण्याचे संकेत दिल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलंय. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या याबाबतच्या वक्तव्याला शिंदे गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आलंय. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी उद्धव ठाकरेंना तुम्ही मुख्यमंत्री होता तेव्हा पहिल्या मुख्यमंत्र्याबाबत का सूचलं ना? असा प्रश्न विचारलाय.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर बरसले आहेत. “तुम्ही मुख्यमंत्री झालात तेव्हा तुम्हाला का सूचलं नाही?”, असा सवाल त्यांनी केलाय. त्यामुळे या मुद्द्यावरुन राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे.

“ज्यावेळेला तुम्ही स्वत: मुख्यमंत्री झालात तेव्हा तुम्हाला का नाही सूचलं की राज्याला महिला मुख्यमंत्र्यांची आवश्यकता आहे म्हणून? तेव्हा महिलांवरचं आपलं प्रेम का उतू आलं नाही? तेव्हाच करायचं असतं”, असा घणाघात संजय गायकवाड यांनी केला. त्यांच्या या विधानावरुन ठाकरे गटाकडून काय प्रत्युत्तर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

दरम्यान, ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी शिंदे गटाच्या गुवाहाटी दौऱ्यावरुन पुन्हा एकदा निशाणा साधलाय. शिंदे गटाच्या आमदारांना भाजापकडून आणखी पाच कोटी देण्यात आल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केलाय. चंद्रकांत खैरे यांच्या या दाव्यावर शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय.

“ज्यावेळेस सत्तांतर झालं त्यावेळेसच नवस केला होता की शिवसेना-भाजप युतीचं सरकार येईल, त्यावेळेस पुन्हा देवीच्या दर्शनाला जाऊ. त्याअर्थाने सगळेजण दर्शन घ्यायला गेले. आता कुणी काही म्हणत असतील की, पाच कोटी घेतले का? तर मोजायला गेले असतील का ते मला माहिती नाही. माणूस ज्या देवाची श्रद्धा ठेवतो ती पूर्ण करतो ही आपली पद्धत आहे. त्यामुळे ते गेले होते”, असं प्रत्युत्तर गुलाबराव पाटील यांनी दिलंय.

Follow Us
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान.
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड.
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम.
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती.
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?.
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही.....
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही......
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?.
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके...
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके....
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं.
मोठं संकट? वैजापूरमध्ये संध्याकाळी अचानक विमानाच्या घिरट्या...
मोठं संकट? वैजापूरमध्ये संध्याकाळी अचानक विमानाच्या घिरट्या....