AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सीमाभागातील 865 गावांकडे महाराष्ट्र सरकारचच दुर्लक्ष; या नेत्याने सरकारचाच दुटप्पीपणा सांगितला

कर्नाटक महाराष्ट्र सीमाभागातील 865 गावांकडे अजूनपर्यंत दुर्लक्ष का झालं असा सवाल स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांनी राज्य सरकारला केला आहे.

सीमाभागातील 865 गावांकडे महाराष्ट्र सरकारचच दुर्लक्ष; या नेत्याने सरकारचाच दुटप्पीपणा सांगितला
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Dec 01, 2022 | 6:16 PM
Share

मुंबईः महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील 865 गावांसह सांगली जिल्ह्यामधील जत तालुक्यातील 40 गावांवर आणि अक्कलकोट, पंढरपूरावर कर्नाटचे मुख्यमंत्री बसवराज बोमई यांनी दावा केल्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले. त्यानंतर कर्नाटकच्या सरकारवर राज्यसरकारसह विरोधकांनी जोरदार हल्लाबोल चढवला होता. त्यानंतर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी आता कर्नाटक सरकारऐवजी राज्य सरकारवरच दुटप्पीपणाचा ठपका ठेवत निशाणा साधला आहे.

कर्नाटक महाराष्ट्र सीमाभागातील 865 गावांकडे अजूनपर्यंत दुर्लक्ष का झालं असा सवाल स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांनी राज्य सरकारला केला आहे.

कर्नाटकात मराठी भाषिकांची गावं असतानाही आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहोत. एकीकडे आपली गावं बोलायची आणि दुर्लक्ष करायचं ही सरकारची दुटप्पी भूमिका आहे असा टोलाही त्यांनी राज्य सरकारला लगावला आहे.

सीमाभागातील मराठी भाषिक गावांविषयी एकीकडे सर्वोच्च न्यायालयात ही आमची गावं आहेत असं सांगायचं आणि दुसरीकडे मात्र या गावांकडे दुर्लक्ष करायचं असा दुटप्पीपणा सरकारकडून का केला जात आहे त्याचं आत्मपरिक्षण करणे गरजेचं आहे असंही त्यांनी स्पष्ट सांगितले.

सीमाभागातील मराठी भाषिकांच्या गावांना नावं ठेवण्यापेक्षा आणि त्यांना दोष देण्यापेक्षा या सीमाभागाकडे आपले अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. याचाही अतंमुर्ख होऊन राज्य सरकारने विचार केला पाहिजे अशी टीका त्यांनी राज्य सरकारवरही केली आहे.

मागील गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादावरून जोरदार वादळ उठले आहे. त्यातच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी थेट महाराष्ट्रातीलच गावांवर दावा केल्याने हा वाद आणखी चिघळला आहे.

त्यावर माजी खासदार राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, महाराष्ट्र सरकारनेच सीमाभागातील 865 गावांकडे दुर्लक्ष केले असल्याचे सांगितले आहे.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...