AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सीमाभागातील 865 गावांकडे महाराष्ट्र सरकारचच दुर्लक्ष; या नेत्याने सरकारचाच दुटप्पीपणा सांगितला

कर्नाटक महाराष्ट्र सीमाभागातील 865 गावांकडे अजूनपर्यंत दुर्लक्ष का झालं असा सवाल स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांनी राज्य सरकारला केला आहे.

सीमाभागातील 865 गावांकडे महाराष्ट्र सरकारचच दुर्लक्ष; या नेत्याने सरकारचाच दुटप्पीपणा सांगितला
| Updated on: Dec 01, 2022 | 6:16 PM
Share

मुंबईः महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील 865 गावांसह सांगली जिल्ह्यामधील जत तालुक्यातील 40 गावांवर आणि अक्कलकोट, पंढरपूरावर कर्नाटचे मुख्यमंत्री बसवराज बोमई यांनी दावा केल्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले. त्यानंतर कर्नाटकच्या सरकारवर राज्यसरकारसह विरोधकांनी जोरदार हल्लाबोल चढवला होता. त्यानंतर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी आता कर्नाटक सरकारऐवजी राज्य सरकारवरच दुटप्पीपणाचा ठपका ठेवत निशाणा साधला आहे.

कर्नाटक महाराष्ट्र सीमाभागातील 865 गावांकडे अजूनपर्यंत दुर्लक्ष का झालं असा सवाल स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांनी राज्य सरकारला केला आहे.

कर्नाटकात मराठी भाषिकांची गावं असतानाही आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहोत. एकीकडे आपली गावं बोलायची आणि दुर्लक्ष करायचं ही सरकारची दुटप्पी भूमिका आहे असा टोलाही त्यांनी राज्य सरकारला लगावला आहे.

सीमाभागातील मराठी भाषिक गावांविषयी एकीकडे सर्वोच्च न्यायालयात ही आमची गावं आहेत असं सांगायचं आणि दुसरीकडे मात्र या गावांकडे दुर्लक्ष करायचं असा दुटप्पीपणा सरकारकडून का केला जात आहे त्याचं आत्मपरिक्षण करणे गरजेचं आहे असंही त्यांनी स्पष्ट सांगितले.

सीमाभागातील मराठी भाषिकांच्या गावांना नावं ठेवण्यापेक्षा आणि त्यांना दोष देण्यापेक्षा या सीमाभागाकडे आपले अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. याचाही अतंमुर्ख होऊन राज्य सरकारने विचार केला पाहिजे अशी टीका त्यांनी राज्य सरकारवरही केली आहे.

मागील गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादावरून जोरदार वादळ उठले आहे. त्यातच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी थेट महाराष्ट्रातीलच गावांवर दावा केल्याने हा वाद आणखी चिघळला आहे.

त्यावर माजी खासदार राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, महाराष्ट्र सरकारनेच सीमाभागातील 865 गावांकडे दुर्लक्ष केले असल्याचे सांगितले आहे.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.