सीमाभागातील 865 गावांकडे महाराष्ट्र सरकारचच दुर्लक्ष; या नेत्याने सरकारचाच दुटप्पीपणा सांगितला

कर्नाटक महाराष्ट्र सीमाभागातील 865 गावांकडे अजूनपर्यंत दुर्लक्ष का झालं असा सवाल स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांनी राज्य सरकारला केला आहे.

सीमाभागातील 865 गावांकडे महाराष्ट्र सरकारचच दुर्लक्ष; या नेत्याने सरकारचाच दुटप्पीपणा सांगितला
Follow us
| Updated on: Dec 01, 2022 | 6:16 PM

मुंबईः महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील 865 गावांसह सांगली जिल्ह्यामधील जत तालुक्यातील 40 गावांवर आणि अक्कलकोट, पंढरपूरावर कर्नाटचे मुख्यमंत्री बसवराज बोमई यांनी दावा केल्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले. त्यानंतर कर्नाटकच्या सरकारवर राज्यसरकारसह विरोधकांनी जोरदार हल्लाबोल चढवला होता. त्यानंतर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी आता कर्नाटक सरकारऐवजी राज्य सरकारवरच दुटप्पीपणाचा ठपका ठेवत निशाणा साधला आहे.

कर्नाटक महाराष्ट्र सीमाभागातील 865 गावांकडे अजूनपर्यंत दुर्लक्ष का झालं असा सवाल स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांनी राज्य सरकारला केला आहे.

कर्नाटकात मराठी भाषिकांची गावं असतानाही आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहोत. एकीकडे आपली गावं बोलायची आणि दुर्लक्ष करायचं ही सरकारची दुटप्पी भूमिका आहे असा टोलाही त्यांनी राज्य सरकारला लगावला आहे.

सीमाभागातील मराठी भाषिक गावांविषयी एकीकडे सर्वोच्च न्यायालयात ही आमची गावं आहेत असं सांगायचं आणि दुसरीकडे मात्र या गावांकडे दुर्लक्ष करायचं असा दुटप्पीपणा सरकारकडून का केला जात आहे त्याचं आत्मपरिक्षण करणे गरजेचं आहे असंही त्यांनी स्पष्ट सांगितले.

सीमाभागातील मराठी भाषिकांच्या गावांना नावं ठेवण्यापेक्षा आणि त्यांना दोष देण्यापेक्षा या सीमाभागाकडे आपले अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. याचाही अतंमुर्ख होऊन राज्य सरकारने विचार केला पाहिजे अशी टीका त्यांनी राज्य सरकारवरही केली आहे.

मागील गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादावरून जोरदार वादळ उठले आहे. त्यातच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी थेट महाराष्ट्रातीलच गावांवर दावा केल्याने हा वाद आणखी चिघळला आहे.

त्यावर माजी खासदार राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, महाराष्ट्र सरकारनेच सीमाभागातील 865 गावांकडे दुर्लक्ष केले असल्याचे सांगितले आहे.

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.