AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सीमाभागातील 865 गावांकडे महाराष्ट्र सरकारचच दुर्लक्ष; या नेत्याने सरकारचाच दुटप्पीपणा सांगितला

कर्नाटक महाराष्ट्र सीमाभागातील 865 गावांकडे अजूनपर्यंत दुर्लक्ष का झालं असा सवाल स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांनी राज्य सरकारला केला आहे.

सीमाभागातील 865 गावांकडे महाराष्ट्र सरकारचच दुर्लक्ष; या नेत्याने सरकारचाच दुटप्पीपणा सांगितला
| Updated on: Dec 01, 2022 | 6:16 PM
Share

मुंबईः महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील 865 गावांसह सांगली जिल्ह्यामधील जत तालुक्यातील 40 गावांवर आणि अक्कलकोट, पंढरपूरावर कर्नाटचे मुख्यमंत्री बसवराज बोमई यांनी दावा केल्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले. त्यानंतर कर्नाटकच्या सरकारवर राज्यसरकारसह विरोधकांनी जोरदार हल्लाबोल चढवला होता. त्यानंतर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी आता कर्नाटक सरकारऐवजी राज्य सरकारवरच दुटप्पीपणाचा ठपका ठेवत निशाणा साधला आहे.

कर्नाटक महाराष्ट्र सीमाभागातील 865 गावांकडे अजूनपर्यंत दुर्लक्ष का झालं असा सवाल स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांनी राज्य सरकारला केला आहे.

कर्नाटकात मराठी भाषिकांची गावं असतानाही आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहोत. एकीकडे आपली गावं बोलायची आणि दुर्लक्ष करायचं ही सरकारची दुटप्पी भूमिका आहे असा टोलाही त्यांनी राज्य सरकारला लगावला आहे.

सीमाभागातील मराठी भाषिक गावांविषयी एकीकडे सर्वोच्च न्यायालयात ही आमची गावं आहेत असं सांगायचं आणि दुसरीकडे मात्र या गावांकडे दुर्लक्ष करायचं असा दुटप्पीपणा सरकारकडून का केला जात आहे त्याचं आत्मपरिक्षण करणे गरजेचं आहे असंही त्यांनी स्पष्ट सांगितले.

सीमाभागातील मराठी भाषिकांच्या गावांना नावं ठेवण्यापेक्षा आणि त्यांना दोष देण्यापेक्षा या सीमाभागाकडे आपले अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. याचाही अतंमुर्ख होऊन राज्य सरकारने विचार केला पाहिजे अशी टीका त्यांनी राज्य सरकारवरही केली आहे.

मागील गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादावरून जोरदार वादळ उठले आहे. त्यातच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी थेट महाराष्ट्रातीलच गावांवर दावा केल्याने हा वाद आणखी चिघळला आहे.

त्यावर माजी खासदार राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, महाराष्ट्र सरकारनेच सीमाभागातील 865 गावांकडे दुर्लक्ष केले असल्याचे सांगितले आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.