AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईकरांना दिलासा, पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव स्थायी समितीनं फेटाळला

पाणी वापरावर नियंत्रण आणण्याकरता दुरेक्ष दर पद्धतीनुसार होणाऱ्या पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव स्थायी समितीत फेटाळून लावल्यानं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

मुंबईकरांना दिलासा, पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव स्थायी समितीनं फेटाळला
खरंतर आपण सगळे हिवाळ्यापेक्षा उन्हाळ्यात जास्त पाणी पितो. पण हिवाळ्यामध्ये आपली रोगप्रतिकार शक्ती (Immune System) कमकुवत होते. म्हणूनच आपण बऱ्याचदा आजारी पडतो.
| Edited By: | Updated on: Oct 29, 2020 | 7:27 PM
Share

मुंबई : मुंबईकरांची पाण्याची उधळपट्टी रोखण्यासाठी मुंबई महापालिकेचा पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव स्थायी समितीनं फेटाळला आहे. पाणी वापरावर नियंत्रण आणण्याकरता दुरेक्ष दर पद्धतीनुसार होणाऱ्या पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव स्थायी समितीत फेटाळून लावल्यानं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. तसंच दरवर्षी पाणीदरात होणारी 8 टक्के वाढही कोरोनामुळं होणार नसल्याचं पालिका प्रशासनानं यापूर्वीच स्पष्ट केलं आहे. (good news Standing Committee rejects proposal to increase water tariff in mumbai)

पाणी पुरवठ्याच्या राष्ट्रीय प्रमाणकानुसार, प्रति व्यक्ती दररोज 150 लिटर इतका पाण्याचा वापर हवा होता. परंतु, मुंबईत अनेक इमारतींमध्ये दररोज दरोडोई पाणी वापर हा 150 लिटरपेक्षा जास्त होत आहे. त्यामुळे या जास्तीच्या पाण्याला दुरेक्ष दर पद्धतीनुसार जास्त दर लावण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीसमोर आणला होता. ओसी नसलेल्या इमारतींमध्येही पुरवठा होणाऱ्या पाणीदरातही याचप्रमाणे वाढ केली जाणार होती.

सध्या दरडोई 150 लिटर पाणी वापरणाऱ्यांना 1 हजार लिटरसाठी 5.22 रूपये दर आहे. तर 150 ते 200 लिटर पाणी वापरणाऱ्यांसाठी 10.44 रूपये इतका दर आहे. ज्याचा प्रस्तावीत दर 10.44 रूपये इतका होता. तर 200 ते 250 लिटरकरता 15.66 वरून 26.10 रूपये इतका आणि 250 हून अधिक लिटरकरता 20.88 वरून 31.32 रूपये इतका दर प्रस्तावित होता. परंतु स्थायी समितीत हा प्रस्ताव फेटाळून लावल्यानं ही दरवाढ होणार नाही.

दरम्यान, मुंबईकरांना पाणीपट्टी दरवाढीला सामोरे जावे लागण्याची जाण्याची शक्यता असताना भारतीय जनता पक्षाचे गटनेते प्रभाकर शिंदे, स्थायी समितीचे सदस्य भालचंद्र शिरसाट यांनी कडाडून विरोध केला होता. त्यामुळे मुंबईकरांवर महापालिका आयुक्तांनी लादलेली कंबरडे मोडणारी दरवाढ नामंजूर करण्याचा निर्णय स्थायी समितीच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे या दरवाढीपासून नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

इतर बातम्या –

सावधान! नोकरीच्या आमिषाने ऑनलाईन फसवणूक, वसईत दोन लाखांचा गंडा

‘उद्धव ठाकरे भेटण्यासाठी टाळटाळ करत आहेत’; अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात मुलीचा आरोप

(good news Standing Committee rejects proposal to increase water tariff in mumbai)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.