AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis : राज्याच्या तिजोरीच्या चाव्या भाजपा आपल्याकडेच ठेवणार! गृह आणि अर्थ खातं देवेंद्र फडणवीसांकडे?

राज्य सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधी 11 जुलैपूर्वी होईल, अशी माहिती भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. यात भाजपाच्या जुन्या चेहऱ्यांसोबत नव्या चेहऱ्यांनाही मंत्रिमंडळात संधी दिली जाणार आहे. 11 जुलैपूर्वी मंत्रिमंडळ शपथविधी तर 18 जुलैपासून अधिवेशन सुरू होणार आहे.

Devendra Fadnavis : राज्याच्या तिजोरीच्या चाव्या भाजपा आपल्याकडेच ठेवणार! गृह आणि अर्थ खातं देवेंद्र फडणवीसांकडे?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसImage Credit source: Twitter
Pradeep Garad
Pradeep Garad | Updated on: Jul 02, 2022 | 9:32 PM
Share

मुंबई : राज्य सरकारमधील गृह आणि अर्थ खाते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे राहणार असल्याची माहिती टीव्ही 9ला सुत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाचा शपथविधी होण्यास अजून अवधी आहे. बहुमतदेखील अद्याप सिद्ध झालेले नाही. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आता कोणाला कोणते मंत्रीपद मिळणार याचे कयास बांधले जात आहेत. पक्षादेश मानून देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद (Deputy chief minister post) स्वीकारले खरे मात्र ते समाधानी नसल्याचे बोलले जात आहे. भाजपासोबत फुटलेल्या शिवसेनेचा मोठ गट आलेला असला तरी महत्त्वाची खाती आपल्याकडे ठेवण्यासाठी भाजपा प्रयत्नशील असणार आहे. पुढील दोन दिवसांत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

आधीच्या कार्यकाळातही गृहमंत्रीपद होते फडणवीसांकडे

अर्थ आणि गृह ही महत्त्वाची खाती देवेंद्र फडणवीस आपल्याकडे ठेवणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. त्या पार्श्वभूमीवर अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी सागर बंगल्याकडे वळत आहेत. मुंबई पोलीस आयुक्त आणि महासंचालकांनी काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर जाऊन भेट घेतली होती. राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आपल्याकडे ठेवण्याची भाजपाची ही रणनीती असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, भाजपा-शिवसेनेच्या मागील सत्ताकाळातदेखील (2014-19) गृहखाते फडणवीसांनी आपल्याकडेच ठेवले होते, तर अर्थखाते सुधीर मुनगंटीवार म्हणजे भाजपाकडेच होते.

नव्या चेहऱ्यांना संधी?

राज्य सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधी 11 जुलैपूर्वी होईल, अशी माहिती भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. यात भाजपाच्या जुन्या चेहऱ्यांसोबत नव्या चेहऱ्यांनाही मंत्रिमंडळात संधी दिली जाणार आहे. 11 जुलैपूर्वी मंत्रिमंडळ शपथविधी तर 18 जुलैपासून अधिवेशन सुरू होणार आहे. आता नव्या मंत्रिमंडळात शिंदे गटाच्या कोण आणि किती आमदारांना मंत्रिपदे मिळणार, याविषयी उत्सुकता आहे. तर आता केवळ औपचारिकता राहिली आहे. शिवसेना-भाजपा युतीचे राहुल नार्वेकर अध्यक्षपदी निवडून येतील, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. तर भाजपानेदेखीव विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.

Follow Us
हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! पवार संतापले
Rohit Pawar Tweet | हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या मृत्यूवर रोहित पवार संतापले
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं...
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं एका पाठोपाठ...
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल, म्हणाली, आम्ही फक्त...
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; सुषमा अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले;
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले; पंतप्रधानांच्या अगदी मागे उभा असलेल्या नेत्याला...
मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
Manoj Jarange | मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून ..
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून सवाल
वडापाव घ्यायला गेला अन्... पायाला धक्का लागल्याच्या वादातून मोठा घात,
मोठी खळबळ! वडापाव घ्यायला गेला अन् जीवाला मुकला... पुण्यात काय घडलं?
जेन-झीला खूश करण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन? मुंबई लोकलमध्ये...
Tejaswi Ghosalkar | जेन-झीला खूश करण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन? मुंबई लोकलमध्ये विद्यार्थ्यांसाठी 3 डबे राखीव ठेवण्याची मागणी!
मोहन भागवत 15 ऑगस्टला नागपुरात! तरुणांशी साधणार संवाद
Mohan Bhagwat | मोहन भागवत 15 ऑगस्टला नागपुरात! तरुणांशी साधणार संवाद; भारताच्या उज्ज्वल भविष्यावर मांडणार विचार