AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai | मुंबईत तब्बल 269 शाळा अनधिकृत, लाखो मुलांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात!

शाळा प्रशासानाने महापालिकेच्या नोटीसला केराची टोपली दाखवली आहे. मुंबईतील अनधिकृत शाळांवर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार राज्य सरकारकडे आहेत

Mumbai | मुंबईत तब्बल 269 शाळा अनधिकृत, लाखो मुलांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात!
धक्कादायक आकडेवारीImage Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: May 28, 2022 | 11:49 AM
Share

मुंबई : संपूर्ण राज्यामध्ये सध्या अनधिकृत शाळांचे (School) पेव फुटले असून यामध्ये आता मुंबई शहरही मागे नसल्याचे आकडेवारीवरून पुढे आले आहे. संपूर्ण राज्यभरामध्ये 674 शाळा अनधिकृत असल्याचे समोर आले आहे. तर त्यामध्ये 269 शाळा या फक्त मुंबईमधील (Mumbai) असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. शासनाची कोणतीही परवानगी न घेता या शाळा सुरू आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांची फसवणूक होत असून या शाळांवर कारवाई करण्याची मागणी सर्वच स्तरामधून केली जात आहे. मुंबई महापालिकेची मान्यता न घेता मुंबईत तब्बल 269 अनधिकृत शाळा सुरु असल्याची धक्कादायक (Shocking) माहिती पुढे आल्यापासून पालकांनी चांगलीच धस्ती घेतली आहे.

मुंबईत 269 शाळा अनधिकृत

विशेष म्हणजे या सर्व शाळांना महापालिकेने वारंवार नोटीसही पाठवली आहे. मात्र, शाळा प्रशासानाने महापालिकेच्या नोटीसला केराची टोपली दाखवली आहे. मुंबईतील अनधिकृत शाळांवर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार राज्य सरकारकडे आहेत. आता मुंबईतील या अनधिकृत शाळांवर राज्य सरकार नेमकी काय कारवाई करते हे पाहण्यासारखेच ठरणार आहे. मुंबईत नवीन शाळा सुरु करण्याआधी नियमानुसार पालिकेच्या शिक्षण विभागाची परवानगी बंधनकारक आहे, मात्र, 269 शाळांनी महापालिकेची कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नसल्याचे दिसून आले.

Video : ठिणगीमुळे चार घरं पेटली, संसाराची राखरांगोळी!

महापालिकेच्या नोटीसला केराची टोपली

अनधिकृत शाळांसंदर्भात एक महत्वाची माहिती देखील पुढे आली असून 269 पैकी काही शाळा या गेल्या दहा वर्षांपासून सुरू आहेत. मुंबईतील अनधिकृत शाळांना मुंबई महापालिका वारंवार नोटीस बजावते. मात्र, महापालिकेच्या नोटीसला कुठल्याही प्रकारची दाद ही शाळेंकडून देण्यात आली नाहीये. नोटीस बजावण्यात आलेल्या शाळांची यादी दरवर्षी राज्य सरकारकडे पाठवण्यात येते.

मात्र अशा शाळांवर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार राज्य सरकारकडे असल्यामुळे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना कोणत्याच प्रकारची कारवाई या शाळेंवर करता येत नाही. महापालिका प्रशासन फक्त या शाळेंना नोटीसच देऊ शकते.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.