AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आजही संकट कायम! भारतीय हवामान विभागाचा मोठा इशारा, पुढील 24 तासात..

1 जुलैपासून राज्यात धुव्वाधार पाऊस कोसळला. सर्वत्र पाणीच पाणी झाले. आजही भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला. पुढील काही दिवस राज्यात पाऊस कायम असणार आहे. नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे.

आजही संकट कायम! भारतीय हवामान विभागाचा मोठा इशारा, पुढील 24 तासात..
Heavy Rain
| Updated on: Jul 09, 2026 | 8:18 AM
Share

गेल्या काही दिवसांमध्ये पावसाने थैमान घातले. पूर्ण जून महिन्यात जेवढा पाऊस पडतो, तेवढा 6 दिवसांमध्येच कोसळला. अनेक भागात पाणी साचले. दरड कोसळल्या. काही भागात 5 दिवस पूर्ण होऊनही पाणी अजूनही साचलेले आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. ज्याचा लोकल सेवेवर थेट परिणाम झाला. राज्यात पावसाने 1 जुलैपासून धुमाकूळ घातला. आज कुठे पाऊस उघडला आहे. सूर्याचे दर्शनही होत नव्हते. यंदा 2 जून रोजी केरळमध्ये मॉन्सून दाखल झाला. त्यानंतर तब्बल काही दिवस हा मॉन्सून अरबी समुद्रातच रेंगाळत होता. जून महिना संपत आला तरीही मॉन्सूनचा पाऊस राज्यात दाखल झाला नव्हता. शेवटी जोरदार पावसाला सुरूवात झाली. 1 जुलैपासून राज्यात धुव्वाधार पाऊस झाला. आजही अनेक भागात भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला.

अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. काल पुण्यातील काही भागात पाऊस झाला. मुंबईतही रात्री पाऊस सुरू होता. अखेर सकाळी मुंबईत पावसाने विश्रांती घेतली. कोकणात पावसाचा जोर कमी झाला. सातारा आणि पुणे घाटमाथा परिसरात अतिमुसळधार पावसाचा आज अंदाज वर्तवण्यात आला. कोकणात पावसाचा आज येलो अलर्ट जारी करण्यात आला.

मॉन्सून संपूर्ण देशात दाखल झाला असून पोषक वातावरण मिळत आहे. गुजरात आणि केरळच्या किनाऱ्या लगत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, जळगाव, धुळे, नाशिक घाटमाथा या भागात आज पाऊस हजेरी लावेल. विदर्भ आणि मराठवाड्यात काही भागात विजांसह पाऊस होण्याचा अंदाज आहे.

मुसळधार पावसामुळे उल्हास नदीला पूर, मोहने जलशुद्धीकरण केंद्रातील पंपांमध्ये गाळ साचला. नदीच्या तीव्र प्रवाहात केडीएमसीची मुख्य जलवाहिनी फुटल्याने शहराचा पाणीपुरवठा 48 तासांपासून ठप्प. कल्याण-डोंबिवलीच्या पूर्व-पश्चिम भागातील हजारो कुटुंबांना तीव्र पाणीटंचाईचा फटका. बेतुरकर पाड्यात महिला बादल्या, टब आणि ड्रममध्ये पावसाचे पाणी साठवून गरज भागवत आहेत. काही नागरिक पावसाचे पाणी गाळून व उकळून पिण्यासाठी वापरण्याची वेळ आली. पावसाने ठाणे जिल्ह्यातही जोरदार हजेरी लावली.

Follow Us
बहुमतावेळी शिंदे शिवसेनेचे सदस्य... न्यायमुर्ती बागची यांची टिप्पणी
बहुमतावेळी शिंदे शिवसेनेचे सदस्य... न्यायमुर्ती बागची यांची महत्त्वाची टिप्पणी, सुनावणीदरम्यान मोठा ट्विस्ट
शिवसेना पक्षाचे चिन्ह गोठवा, धनुष्यबाणाबाबत सिब्बल यांची मोठी मागणी;
शिवसेना पक्षाचे चिन्ह गोठवा, धनुष्यबाणाबाबत सिब्बल यांची मोठी मागणी; सुनावणीत काय घडलं?
फडणवीस राज्यपालांना... कोर्टातील सुनावणीदरम्यान प्रथमच आलं फडणवीसांचं
फडणवीस राज्यपालांना... कोर्टातील सुनावणीदरम्यान प्रथमच आलं फडणवीसांचं नाव, फुटीच्या वेळी पडद्याआड काय काय घडलं होतं?
मोठी बातमी! सुप्रीम कोर्टाने मान्य केल्यानंतरही नार्वेकरांनी...
मोठी बातमी! प्रस्ताव सुप्रीम कोर्टाने मान्य केल्यानंतरही नार्वेकरांनी... कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद
त्या पत्रावर उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख म्हणून सही, मग...
त्या पत्रावर उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख म्हणून सही, मग... युक्तिवादाच्या अखेर ठाकरे गटाचा मोठा बॉम्ब, कोर्टात काय घडतंय?
मीरा भाईंदर महापालिकेकडून सार्वजनिक कुर्बानी, बकरा पाळण्यावर निर्बंध
मीरा भाईंदरमध्ये सार्वजनिक ठिकाणी बकरा पाळणे आणि कुर्बानीवर बंदी
राजकीय पक्षाचे नेतृत्व कोणाकडे, याची माहिती निवडणूक आयोगाला... सिब्बल
Shivsena Hearing | राजकीय पक्षाचे नेतृत्व कोणाकडे, याची माहिती निवडणूक आयोगाला... कपिल सिब्बल यांचा हा युक्तिवाद ठरणार गेम चेंजर?
धाराशिव: दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांच्या हालअपेष्टा, प्रशासनाचे...
धाराशिव: दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांच्या हालअपेष्टा, प्रशासनाचे दुर्लक्ष...काळीज पिळवटून टाकणारी दृश्य
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी: महागाई भत्त्यात २ टक्क्यांनी वाढ
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ: DA आता 60 टक्क्यांवर
एकच खळबळ! पुण्यात भरधाव वाहनांचा अपघात, एका पाठोपाठ एक 6 वाहनांची धडक
एकच खळबळ! पुण्यात भरधाव वाहनांचा अपघात, एका पाठोपाठ एक 6 वाहनांची धडक