कांजूरमधील 686 हेक्टर जागा राज्याची तर 92 हेक्टर केंद्राची! राज्य सरकारचा हायकोर्टात दावा

ऑक्टोबर 2020 साली मुंबई हायकोर्टाने कांजूरमार्ग परिसरातील सहा हजार एकरपेक्षा जास्त जमीन ही आदर्श वॉटर पार्क एन्ड रिसॉर्ट या खासगी कंपनीला देण्याचे आदेश दिलेले होते

कांजूरमधील 686 हेक्टर जागा राज्याची तर 92 हेक्टर केंद्राची! राज्य सरकारचा हायकोर्टात दावा
कारशेडच्या जागेचा वादImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 14, 2022 | 6:53 AM

मुंबई : मेट्रो कारशेड (Mumbai Metro car shed news) कांजूरमध्ये करण्यात यावं, यासाठी सरकार आग्रही आहे. पण यावरुन केंद्र आणि राज्य सरकारमधील (State vr centre) वाद हायकोर्टात प्रलंबित आहे. यावर सोमवारी हायकोर्टात (Mumbai High court News) सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान राज्य सरकारकडून युक्तिवाद करण्यात आला. मेट्रो कारशेडसाठी प्रस्तावित असलेल्या कांजूर मार्गच्या संपूर्ण जागेवर आपलाच मालकी हक्क असल्याचा दावा केंद्र सरकारने केला होता. तो राज्य सरकारने खोडून काढलाय. कांजूरच्या भूखंडावर केवळ केंद्राचाच नव्हे, तर राज्याचाही अधिकार असल्याचा युक्तिवाद हायकोर्टात महाविकास आघाडी सरकारच्या वतीने करण्यात आला. दरम्यान, आदर्श वॉटरपार्क एन्ड रिसॉर्ट या कंपनीने ही जागा बेकायदेशीररीच्या आपल्या नावावर करुन घेतली, असं देखील कोर्टात म्हटलंय.

ऑक्टोबर 2020 साली मुंबई हायकोर्टाने कांजूरमार्ग परिसरातील सहा हजार एकरपेक्षा जास्त जमीन ही आदर्श वॉटर पार्क एन्ड रिसॉर्ट या खासगी कंपनीला देण्याचे आदेश दिलेले होते. मात्र कोर्टाची दिशाभूर करुन हे आदेश मिळवल्याचा आरोप राज्य सरकारच्या वतीने करण्यात आलाय. याआधी देखील राज्य सरकारच्या वतीनं हाच आरोप करण्यात आला होता. दरम्यान, सोमवारी पुन्हा याप्रकरणी उच्च न्यायालयात युक्तिवाद करण्यात आला.

केंद्राकडे फक्त 92 हेक्टर जागेची मालकी?

न्यायमूर्ती ए के मेनन यांच्यासोबत सोमवारी कांजूर मार्गच्या जमीन मालकी प्रश्नाच्या वादावर सुनावणी झाली. त्यावेळी राज्य सरकारच्या वतीने हिमांशू टक्के यांनी कोर्टात युक्तिवाद केला. वकील हिमांशू टक्के यांनी केलेल्या युक्तिवादानुसार 686 हेक्टर जागा राज्य सरकारची असून 92 हेक्टर जागा केंद्राची असल्याचं त्यांनी कोर्टाला सांगितलं. तर 13 हेक्टर जागा महापालिकेची असल्याचाही युक्तिवाद त्यांनी यावेळी केला. तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि विभागीय आयुक्तांनी दिलेल्या आदेशाची तत्कालीन न्यायमूर्ती यांनी दखल घेतलेली.

हे सुद्धा वाचा

1972 साली या जमिनीवर हक्क करणाऱ्या एकानं खटला दाखल केला. त्याची चौकशी तहसीलदारांनी केल्याचीही माहिती वकील टक्के यांनी कोर्टात दिली. राज्य सरकारने केलेल्या या युक्तिवादावर केंद्र सरकारकडून आक्षेप घेत विरोध करण्यात आला. या युक्तिवादानंतर हायकोर्टातली सुनावणी तहकूब करण्यात आली. आता मंगळवारी पुन्हा याप्रकरणी सुनावणी होणार आहे.

मुंबई महानगरपालिकेचं कांजूरच्या जागेवर नेमकं म्हणणं काय?

कांजूपच्या जागेवर बीएमसीनेही दावा केलाय. अभियंता पी.यु. वैद्य यांनी तसं प्रतिज्ञापत्रही सादर केलंय. कांजूरमधील वादग्रस्त भूखंडावर डम्पिंग ग्राऊंड उभारण्यासाठी 141 हेक्टर भूखंड सर्वोच्च न्यायालयाने पालिकेच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले होते. तसे निर्देश राज्य आणि केंद्र सरकारलाही देण्यात आल्याचं बीएमसीने म्हटलंय. दरम्यान, या एकूण भूखंडापैकी 23 हेक्टर जागेवर कांदळवन असल्यानं ती जागा वनविभागाकडे आहे. दरम्यान, या जागेवरील मालकी हक्काचा आदेश खासगी कंपनीने न्यायालयाची फसवणीक करुन मिळवलाय. त्यामुळे हा व्यवहार बेकायदेशीर ठरवावा, अशीही मागणी प्रतिज्ञापत्राद्वारे हायकोर्टात करण्यात आली आहे.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.