AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आमदारांसाठी रुग्णवाहिका तयार ठेवा, हृदयविकाराचा झटका नाही आला म्हणजे झाले, संजय राऊत यांची कोपरखळी

आम्ही तुरुंगवास भोगले. रक्त सांडले. आता आम्ही सभ्य झालो आहोत. आम्हाला पुन्हा आवाहन देऊ नका, असे राऊत यांनी म्हटले आहे. मुंबईसाठी 105 हुतात्मे द्यायची तयारी उद्धव साहेबांची आहे. तेव्हा पाहिला हुतात्मा मी असेल.

आमदारांसाठी रुग्णवाहिका तयार ठेवा, हृदयविकाराचा झटका नाही आला म्हणजे झाले, संजय राऊत यांची कोपरखळी
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Dec 13, 2024 | 11:24 AM
Share

राज्यात देवेंद्र फडणवीस सरकारचा शपथविधी होऊन आठवडा पूर्ण झाला आहे. त्यानंतरही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यावर जोरदार टोलेबाजी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी केली आहे. मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्यास काही लोकांना हृदयविकाराचा झटका आला नाही म्हणजे झाले, अशी कोपरखळी राऊत यांनी केली.

काय म्हणाले संजय राऊत?

मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपावर एकनाथ शिंदे नाराज आहे? त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, शिंदे यांच्या नाराजीला कोण विचारते. त्यांचा आनंद किंवा त्यांची नाराजी हा विषय दिल्लीसाठी संपलेला आहे. हे सर्व कळसूत्री बाहुली आहेत. हे सर्व गुलाम आहेत. गुलामांना बंडाची भाषा शोभत नाही. त्यांनी बलिदानाची तयारी ठेवली पाहिजे. पण ते डरपोक लोक आहेत. काही लोकांना मंत्रिमंडळ विस्ताराच्या बदल्यात हृदयविकाराचा झटका आला नाही म्हणजे झाले. पण त्यांच्यासाठी रुग्ण वाहिका ठेवल्या पाहिजेत, असे राऊत यांनी म्हटले.

पहिला हुतात्मा मी असणार

आम्ही तुरुंगवास भोगले. रक्त सांडले. आता आम्ही सभ्य झालो आहोत. आम्हाला पुन्हा आवाहन देऊ नका, असे राऊत यांनी म्हटले आहे. मुंबईसाठी 105 हुतात्मे द्यायची तयारी उद्धव साहेबांची आहे. तेव्हा पाहिला हुतात्मा मी असेल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत संजय राऊत म्हणाले, आतापर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या युती किंवा आघाडीमध्ये लढल्या गेलेल्या नाहीत. आम्ही कोणताही निर्णय घेताना तीन पक्ष एकत्र बसून घेतो. आम्ही जो निर्णय घेऊ तो निर्णय घेताना उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि काँग्रेसचे नेते असतील. तीन पक्ष एकत्र बसून निर्णय घेतली.

राज्यातील प्रश्न वेगळे, राष्ट्रीय प्रश्न वेगळे आहेत. त्यानुसार विचारपूर्वक मतदान करायचे असते. तुम्ही मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आतापर्यंत घेऊ शकलेला नाहीत. कारण तुम्हाला हरण्याची भीती वाटत होती. एक देश एक निवडणूक हे बिल तुम्ही कॅबिनेटमध्ये मंजूर केले. पण मी जबाबदारीने बोलतो. 2019 ला वन नेशन वन इलेक्शन हा फंडा असताना नरेंद्र मोदी प्रधानमंत्री असतील का? असा मला प्रश्न आहे.

Follow Us
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही..
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही...
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी..
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्....
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?.
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात.....
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार.
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत....
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत.....
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात...
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात....
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत.