AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

द्वेष पेरणाऱ्या आणि हिंसा भडकावणाऱ्या धर्माच्या राजकारणाचा भांडाफोड करावा : मुख्यमंत्री पिनरई

देशात द्वेष पेरणाऱ्या आणि हिंसा भडकावणाऱ्या धर्माच्या राजकारणाचा भांडोफोड करायला हवा, असं मत केरळचे मुख्यमंत्री विजयन पिनरई यांनी व्यक्त केलं आहे (Vijayan Pinarai on Communal Politics).

द्वेष पेरणाऱ्या आणि हिंसा भडकावणाऱ्या धर्माच्या राजकारणाचा भांडाफोड करावा : मुख्यमंत्री पिनरई
| Updated on: Feb 02, 2020 | 12:30 PM
Share

मुंबई : देशात द्वेष पेरणाऱ्या आणि हिंसा भडकावणाऱ्या धर्माच्या राजकारणाचा भांडोफोड करायला हवा, असं मत केरळचे मुख्यमंत्री विजयन पिनरई यांनी व्यक्त केलं आहे (Vijayan Pinarai on Communal Politics). ते मुंबईतील लोकशाही आणि संविधानवादी “मुंबई कलेक्टिव्ह” या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी देशभरात तयार होणाऱ्या धार्मिक द्वेषाच्या राजकारणाबद्दलही काळजी व्यक्त केली. त्यांच्यासोबत ‘द हिंदू’ वृत्तपत्राचे संपादक एन. राम हे देखील उपस्थित होते (Vijayan Pinarai on Communal Politics).

विजयन पिनरई म्हणाले, “देशात होणाऱ्या धार्मिक हल्ल्यांविषयी आपल्याला आपल्या घरात, कामाच्या ठिकाणी, शिक्षण संस्थांमध्ये आणि अगदी आपल्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये देखील चर्चा करायला हवी. आपल्याला धर्माचं राजकारण करणाऱ्यांना उघडं पाडलं पाहिजे. त्यांचा द्वेष पसरवण्यामागील आणि हिंसा भडकावण्यामागील खरा उद्देश लोकांसमोर आणला पाहिजे.”

हा संघर्ष धर्मनिरपेक्षतेचं संरक्षण करण्यासाठी आणि आपल्या देशाचं संविधान वाचवण्यासाठी आहे. एक झालेले लोक नेहमी जिंकतात. आपण लढू आणि जिंकू, असंही विजयन पिनरई म्हणाले.

“अमेरिकेत राज्ययंत्रणेकडून राष्ट्राध्यक्षांना आव्हान मिळतं, भारतात नाही”

मुंबई कलेक्टिव्हमध्ये द वायरचे संपादक सिद्धार्थ वरदराजन देखील सहभागी झाले होते. त्यांनी ‘इंडियाज डीप स्टेट’ या विषयावर मांडणी केली. ते म्हणाले, “अमेरिकेतील आणि भारतातील राज्ययंत्रणेत फरक आहे. अमेरिकेत सर्वोच्च पदावर असणारे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना तेथे आव्हान मिळत आहे. तेथील यंत्रणांकडून त्यांच्यावर नियंत्रण ठेवलं जातं. त्यांच्याविरोधात कारवाईची प्रक्रिया होते. मात्र, भारतात असं काहीही होत नाही. भारताच्या राज्ययंत्रणेत सर्वोच्च स्थानी असणाऱ्या लोकांच्या चुकीच्या कामावर नियंत्रण ठेवण्याची व्यवस्थाच दिसत नाही.”

Follow Us
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.