AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचं केंद्रीय गृहसचिवांना पत्र; पत्रातील 10 महत्त्वाचे मुद्दे

राजकीय दबावामुळे पोलीस हल्लेखोर शिवसैनिकांवर कारवाई करत नाहीत, असा आरोप फडणवीस यांनी केलाय. केंद्र सरकारनं कडक पावलं उचलण्याची फडणवीसांनी पत्राद्वारे मागणी केली आहे.

Devendra Fadnavis | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचं केंद्रीय गृहसचिवांना पत्र; पत्रातील 10 महत्त्वाचे मुद्दे
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
| Updated on: Apr 25, 2022 | 12:31 PM
Share

नागपूर : महाराष्ट्रात ( Maharashtra) कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर आहेत. केंद्रानं कडक पावलं उचलावी, अशी मागणी करणारे पत्र देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहसचिवांना (Union Home Secretary) लिहिलंय. खार पोलीस स्टेशनसमोर ( Khar Police Station) किरीट सोमय्यांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. राजकीय दबावामुळे पोलीस हल्लेखोर शिवसैनिकांवर कारवाई करत नाहीत, असा आरोप फडणवीस यांनी केलाय. केंद्र सरकारनं कडक पावलं उचलण्याची फडणवीसांनी पत्राद्वारे मागणी केली आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. राणा दाम्पत्याला अटक करण्यात आली. भाजप नेते मोहित कंबोज आणि किरीट सोमय्या यांच्यावर यांच्यावरही हल्ले करण्यात आले. त्यामुळं विरोधी पक्षानं ही बाब पत्राच्या माध्यमातून वरिष्ठांना कळविली आहे. त्यामुळं केंद्र सरकार कोणती पाऊलं उचलते, हे पाहावं लागेल.

पत्रातील 10 महत्त्वाचे मुद्दे

  1. राणा दाम्पत्याच्या अटकेनंतर त्यांची विचारपूस करण्यास गेलेल्या सोमय्यांवर हल्ला
  2. खार पोलिसांच्या सुरक्षेतच शिवसैनिकांनी किरीट सोमय्यांवर हल्ला केला
  3. किरीट सोमय्यांच्या गाडीवर बॉटल, चप्पल आणि दगडफेक करण्यात आली
  4. दगडफेकीत सोमय्यांच्या गाडीची काच फुटली आणि सोमय्या जखमी झाले
  5. पोलीस स्टेशन समोर झालेला हल्ला गंभीर बाब
  6. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला
  7. किरीट सोमय्यांना केंद्राची सुरक्षा असताना हल्ला झाला, मुंबई पोलीस गंभीर नाहीत
  8. मुंबई पोलीस महाविकास आघाडी सरकारची नोकर असल्यासारखी काम करतेय
  9. राजकीय दबावामुळे मुंबई पोलीस हल्लेखोरांवर कारवाई करत नाहीत
  10. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात असल्यानं केंद्रानं कडक पावलं उचलावीत

MP Navneet Rana | खासदार नवनीत राणांचा बीपी वाढला? भायखळा कारागृहातील रुग्णालयात प्रकृती स्थिर असल्याची माहिती

Heat wave : विदर्भात उष्णतेची लाट, नागपूरचे तापमान 44 अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता

Breaking : समृद्धी महामार्ग संदर्भातली मोठी बातमी! 2 मे रोजीचा उद्घाटन सोहळा पुढे ढकलला- सूत्र

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.