AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

समीर वानखेडेंनी आर्यन खानचं अपहरण केलं, नवाब मलिक यांच्या गंभीर आरोपाने खळबळ

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आज सकाळी सकाळीच गंभीर आरोप केला. समीर वानखेडेंनी आर्यन खानचं अपहरण केलं आहे. (Let's see who will expose Wankhede’s nefarious army: Nawab Malik)

समीर वानखेडेंनी आर्यन खानचं अपहरण केलं, नवाब मलिक यांच्या गंभीर आरोपाने खळबळ
नवाब मलिक, अल्पसंख्याक मंत्री
| Edited By: | Updated on: Nov 06, 2021 | 11:00 AM
Share

मुंबई: राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आज सकाळी सकाळीच गंभीर आरोप केला. समीर वानखेडेंनी आर्यन खानचं अपहरण केलं आहे, असा आरोपच नवाब मलिक यांनी केला आहे. मलिक यांच्या या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे.

नवाब मलिक यांनी आज सकाळी सकाळीच एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी हा गंभीर आणि खळबळजनक आरोप केला आहे. आर्यन खान प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मी मागणी केली होती. त्यानंतर एक नव्हे तर दोन एसआयटी स्थापन करण्यात आल्या आहेत. एक राज्य सरकारने आणि दुसरी केंद्र सरकारने स्थापन केली आहे. आता कोण वानखेडेंचा आणि त्यांच्या खासगी आर्मीचा पर्दाफाश करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, असं मलिक यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. मात्र, मलिक यांनी पहिल्यांदाच वानखेडेंवर आर्यन खानच्या अपहरणाचा आरोप केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

सहा प्रकरणाचा सहा अधिकारी तपास करणार

दरम्यान, आर्यन खान प्रकरणासह एकूण सहा प्रकरणाचा तपास समीर वानखेडेंकडून काढून घेण्यात आला आहे. दिल्लीहून आज सहा अधिकारी येणार असून प्रत्येक अधिकारी वेगवेगळ्या प्रकरणाचा तपास करणार आहे. दिल्लीतील एनसीबीचे अधिकारी संजय कुमार सिंग हे सुद्धा आज मुंबईत येणार आहेत. संजय सिंग हे आर्यन खान प्रकरणाचा तपास करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. तर, वानखेडे यांच्याकडून मलिक यांचे जावई समीर खान यांची केसही काढून घेतली नाही.

माझी बदली नाही

काल संध्याकाळी वानखेडे यांची बदली झाल्याची जोरदार चर्चा होती. वानखेडे यांची मुंबईतून दिल्लीत बदली करण्यात आल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, वानखेडे यांनी हे वृत्त फेटाळून लावलं आहे. मी मुंबई एनसीबीतच आहे. माझी दिल्लीत बदली करण्यात आलेली नाही, असं सांगतानाच मला तपास कामातून वगळण्यात आलेलं नाही, असं वानखेडे यांनी स्पष्ट केलं आहे.

कंबोज काय गौप्यस्फोट करणार

दरम्यान, भाजप नेते मोहित कंबोज आज नवाब मलिक यांची पोलखोल करणार आहेत. त्यापूर्वीच त्यांनी मलिक यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नवाब मलिक यांच्याकडे 3 हजार कोटींची बेनामी संपत्ती आहे. त्यांच्याकडे एकूण 22 संपत्ती आहेत. त्यांचं संपूर्ण कुटुंब फॅमिली ट्रस्टच्या नावाने जोडले गेले आहेत. भंगारवाला करोडपती कसा झाला हे राज्यातील जनतेला कळायला हवं, असं कंबोज यांनी म्हटलं आहे.

संबंधित बातम्या:

Video : सभा गाजवणारे मंत्री गुलाबराव पाटील जेव्हा कव्वाली गातात…!

सोनिया गांधींनी काँग्रेसशासित राज्यांना पेट्रोल-डिझलचे दर कमी करायला सांगावेत: भाजप

Maharashtra News LIVE Update | पोटनिवडणुकीत दणका, भाजपने राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक बोलावली

(Let’s see who will expose Wankhede’s nefarious army: Nawab Malik)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...